शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

मकरसंक्रांतीला भाजीपाला झाला स्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:25 IST

हिंगोली : यावर्षी जिल्ह्यात पाण्याची मुबलकता जास्त असल्याने मागील दोन-तीन आठवड्यांपासून पालेभाज्यांची आवक वाढली आहे. संक्रांतीला पालेभाज्यांचे भाव उतरल्याने ...

हिंगोली : यावर्षी जिल्ह्यात पाण्याची मुबलकता जास्त असल्याने मागील दोन-तीन आठवड्यांपासून पालेभाज्यांची आवक वाढली आहे. संक्रांतीला पालेभाज्यांचे भाव उतरल्याने ग्राहकांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.

यावर्षी जिल्ह्यात सुरुवातीपासून पाण्याची मुबलकता आहे. मागील दोन-तीन आठवड्यांपासून पालेभाज्यांची आवकही वाढली आहे. मकरसंक्रांतीला पालेभाज्यांचे भाव वाढतील असे वाटले होते; परंतु, आवक जास्त झाल्याने मकरसंक्रांतीला भाज्यांचे भाव उतरले. मात्र वांगे २५ रुपये किलो, हिरवी मिरची ३० रुपये किलो तर लिंबू ३० रुपये किलो दराने विक्री झाले. संक्रांतीला वांगे, हरवी मिरची, लिंबाची आवक एकदम कमी झाली आहे. शहरातील मंडईत भेंडी १० रुपये किलो, कार्ले १० रुपये किलो, टोमॅटो १० रुपये, चवळी १० रुपये किलो, गवार १० रुपये किलो, पान कोबी १० रुपये किलो, फूल कोबी १० रुपये किलो, सीमला मिरची २० रुपये किलो, आलू २० रुपये किलो, मुळा ५ रुपयास एक, मेथी ५ रुपयास जुडी, कोथिंबीर ५ रुपयास जुडी या प्रकारे विक्री झाल्याचे हरुण चौधरी यांनी सांगितले.

मकरसंक्रांतीला तिळगुळात स्थिरता

मकरसंक्रांतीला तीळ, गूळ आणि साखरेचा भाव वाढेल असे वाटले होते; परंतु, तीळ, गूळ आणि साखरेचे भाव स्थिर असल्याचे पहायला मिळाले. बाजारात तीळ १३० रुपये किलो, गूळ ३५ रुपये किलो, साखर ३६ रुपये किलो, सोयाबीन तेल १२५ रुपये किलो, सूर्यफूल तेल १३० रुपये किलो, तर शेंगदाणा तेल ९० रुपये किलो दराने विक्री झाल्याचे विजयकुमार गुंडेवार यांनी सांगितले.