शहरं
Join us  
Trending Stories
1
ताम्हिणी घाटात थार दरीत कोसळली; ६ जणांचा मृत्यू, ३ दिवसांनंतर अपघात झाल्याचे समजले
2
ऐतिहासिक! नितीश कुमार यांनी 10 व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; पाहा मंत्र्यांची संपूर्ण यादी
3
'ही' मोठी बँक भारतातील व्यवसाय बंद करण्याच्या विचारात, खरेदीसाठी दोन दिग्गज बँका शर्यतीत
4
"महाराष्ट्रातील घडामोडींवर माझं लक्ष, तुमचा…’’, तक्रार घेऊन आलेल्या एकनाथ  शिंदेनां अमित शाहांचं मोठं आश्वासन
5
देशाचा 'नंबर १' ब्रँड TCS नव्हे तर HDFC बँक! ब्रँडझेड रिपोर्टमध्ये मोठा उलटाफेर; 'या' कारणामुळे सर्वात मौल्यवान!
6
राज्यपालांवर वेळेची मर्यादा घालता येणार नाही; राष्ट्रपतींच्या 'त्या' प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
7
अल फलाह युनिव्हर्सिटीचे चेअरमन जावेद सिद्दीकी यांच्या अडचणी वाढल्या; आता घरावर चालणार बुलडोझर 
8
“डिसेंबर अखेरपर्यंत महामेट्रो मीरा-भाईंदरकरांच्या सेवेत येणार”: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
9
Mumbai: कापूर पडलेल्या तेलात तळलेला समोसा खाल्याने विद्यार्थ्यांना विषबाधा, शाळांना अन्न सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे निर्देश!
10
एक 'अशी' शूटर बनली नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये मंत्री; जिनं भारताबाहेर कायम ठेवलाय दबदबा
11
फातिमा सना शेखने फेमिनझमवर केलं भाष्य; म्हणाली, "पुरुषांना कमी दाखवणं म्हणजे..."
12
भारतीय लष्कराला बूस्ट! अमेरिकेने जेव्हलिन क्षेपणास्त्र विक्रीला दिली मंजुरी
13
प्रवाशांसाठी गुड न्यूज! कोकण रेल्वेवरील ‘या’ एक्स्प्रेसचा वेग वाढला; ४० मिनिटे लवकर पोहोचेल
14
Kandivali: कांदिवलीत भरदिवसा तिघांचा दुचाकीने येत इस्टेट एजंटवर गोळीबार!
15
सांगलीकर काळजी घ्या! ऊसाच्या शेतामध्ये बिबट्याची चार पिल्लं सापडली, एकच खळबळ
16
१७० खोल्या, क्रिकेट ग्राऊंड, गोल्फ कोर्स... बकिंघम पॅलेसपेक्षाही चार पट मोठं आहे भारतातील हे घर
17
"तुम्हाला भाजप आवडत आहे, तर तुम्ही काँग्रेसमध्ये कशाला थांबलात?"; माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाने शशी थरूर यांना सुनावले
18
ऐन निवडणुकीत शिंदेसेनेच्या २ उमेदवारांनी अर्ज घेतला मागे; उपजिल्हाप्रमुखांसह भाजपात केला प्रवेश
19
"ठाकरेंवर आरोप करणारी भाजपा २० वर्ष BMC मध्ये उपमहापौरपदी होती हे सोयीस्करपणे विसरते"
20
खंडोबा नवरात्र २०२५: खंडोबाचे षडरात्रोत्सव हा केवळ उत्सव नाही तर कुळाचार; पाहा पूजा साहित्य आणि व्रतविधी
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील भाजी मंडईत शेवगा, कारल्याला आला भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:26 IST

जिल्ह्यात या वर्षी पाऊस चांगला झाल्याने सद्य:स्थितीत तरी विहिरींना चांगले पाणी आहे. त्यामुळे भाजीपाला मोठ्या प्रमाणात पिकविला जात आहे. ...

जिल्ह्यात या वर्षी पाऊस चांगला झाल्याने सद्य:स्थितीत तरी विहिरींना चांगले पाणी आहे. त्यामुळे भाजीपाला मोठ्या प्रमाणात पिकविला जात आहे. भाजीपाल्यांना भाव कमी मिळू लागल्याने उत्पादकांना मात्र आर्थिक फटका बसू लागला आहे. रविवारी मंडईत भाज्यांची आवक कमी झाल्याने, रविवारी हिरवी मिरची ४० रुपये किलो, शेवगा ५० रुपये किलो, सिमला मिरची ४० रुपये किलो, कारले ५५ रुपये किलोने विक्री झाले. आलू, फुलकोबी, पानकोबी, गाजर, टोमॅटो, काकडी, कडीपत्ता, दोडके आदी भाज्यांची आवक जास्त होती. त्यामुळे या भाज्या स्वस्त दरात ग्राहकांना मिळाल्या. यामुळे ग्राहकवर्ग समाधानी असल्याचे पाहायला मिळाले.

भाज्यांची आवक गत दोन-तीन आठवड्यांपासून वाढलेली आहे. त्यामुळे भाज्या स्वस्त दरात मिळू लागल्या आहेत. २० रुपये पाव किलो मिळणारे आलू आता सहा रुपये किलोने मिळू लागले आहेत.

- बाबाराव सुरुशे, ग्राहक

सद्य:स्थितीत सर्वच फळांची आवक कमीच आहे, दुसरीकडे ग्राहकांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. फळांची आवक वाढल्यास त्याचे दरही कमी होतील.

- अ.खदीर बागवान, फळविक्रेते, हिंगोली

गत महिनाभरापासून भाज्यांची आवक वाढलेली पाहायला मिळत आहे. काही भाज्यांची आवक कमी झाल्याने त्या महागल्या आहेत. सध्यातरी पाणी भरपूर आहे.

- मुरलीधर कदम, भाजीपाला विक्रेता, हिंगोली

शहरातील किराणा बाजारात चढ-उतार कमी-जास्त होत आहे. चणाडाळ ६० रुपये किलो, तूरडाळ १२० रुपये, मसूरडाळ ८० रुपये किलो, तांदूळ ५५, गूळ ४० रुपये किलो, साखर ३८ रुपये किलोने विक्री झाली असल्याचे किराणा व्यापारी फैजान शेख यांनी सांगितले.

गत आठवड्यापासून शहरात फळांची आवक कमी झाली आहे. सफरचंद १४० रुपये किलो, संत्रा ५० रुपये किलो, अननस ६० रुपये नग, केळी ३० रुपये डझन, स्ट्राॅबेरी ६० रुपये या प्रमाणे विक्री झाले. आवक वाढल्यास फळे स्वस्त होतील, असे फळ विक्रेत्यांनी सांगितले.