शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
3
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
4
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
5
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
6
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
7
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
8
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
9
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
10
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
11
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
12
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
13
लोकांची उष्टी भांडी घासून गरीब वडिलांनी शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; आता होणार डॉक्टर
14
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
15
Jaipur Couple Video: रोमान्समध्ये इतके झाले तल्लीन की..., जयपूरमधील कपलचा हॉटेलमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल
16
ENG vs IND : मॅच आधी एक मिनिटाचे मौन! टीम इंडियासह इंग्लंडचे खेळाडू काळी पट्टी बांधून उतरले मैदानात (VIDEO)
17
Mumbai Local Fight: मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
18
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
19
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
20
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं

शहरातील भाजी मंडईत शेवगा, कारल्याला आला भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:26 IST

जिल्ह्यात या वर्षी पाऊस चांगला झाल्याने सद्य:स्थितीत तरी विहिरींना चांगले पाणी आहे. त्यामुळे भाजीपाला मोठ्या प्रमाणात पिकविला जात आहे. ...

जिल्ह्यात या वर्षी पाऊस चांगला झाल्याने सद्य:स्थितीत तरी विहिरींना चांगले पाणी आहे. त्यामुळे भाजीपाला मोठ्या प्रमाणात पिकविला जात आहे. भाजीपाल्यांना भाव कमी मिळू लागल्याने उत्पादकांना मात्र आर्थिक फटका बसू लागला आहे. रविवारी मंडईत भाज्यांची आवक कमी झाल्याने, रविवारी हिरवी मिरची ४० रुपये किलो, शेवगा ५० रुपये किलो, सिमला मिरची ४० रुपये किलो, कारले ५५ रुपये किलोने विक्री झाले. आलू, फुलकोबी, पानकोबी, गाजर, टोमॅटो, काकडी, कडीपत्ता, दोडके आदी भाज्यांची आवक जास्त होती. त्यामुळे या भाज्या स्वस्त दरात ग्राहकांना मिळाल्या. यामुळे ग्राहकवर्ग समाधानी असल्याचे पाहायला मिळाले.

भाज्यांची आवक गत दोन-तीन आठवड्यांपासून वाढलेली आहे. त्यामुळे भाज्या स्वस्त दरात मिळू लागल्या आहेत. २० रुपये पाव किलो मिळणारे आलू आता सहा रुपये किलोने मिळू लागले आहेत.

- बाबाराव सुरुशे, ग्राहक

सद्य:स्थितीत सर्वच फळांची आवक कमीच आहे, दुसरीकडे ग्राहकांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. फळांची आवक वाढल्यास त्याचे दरही कमी होतील.

- अ.खदीर बागवान, फळविक्रेते, हिंगोली

गत महिनाभरापासून भाज्यांची आवक वाढलेली पाहायला मिळत आहे. काही भाज्यांची आवक कमी झाल्याने त्या महागल्या आहेत. सध्यातरी पाणी भरपूर आहे.

- मुरलीधर कदम, भाजीपाला विक्रेता, हिंगोली

शहरातील किराणा बाजारात चढ-उतार कमी-जास्त होत आहे. चणाडाळ ६० रुपये किलो, तूरडाळ १२० रुपये, मसूरडाळ ८० रुपये किलो, तांदूळ ५५, गूळ ४० रुपये किलो, साखर ३८ रुपये किलोने विक्री झाली असल्याचे किराणा व्यापारी फैजान शेख यांनी सांगितले.

गत आठवड्यापासून शहरात फळांची आवक कमी झाली आहे. सफरचंद १४० रुपये किलो, संत्रा ५० रुपये किलो, अननस ६० रुपये नग, केळी ३० रुपये डझन, स्ट्राॅबेरी ६० रुपये या प्रमाणे विक्री झाले. आवक वाढल्यास फळे स्वस्त होतील, असे फळ विक्रेत्यांनी सांगितले.