शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
5
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
6
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
7
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
8
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
9
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
10
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
11
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
12
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
13
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
14
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
15
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
16
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
17
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
18
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
19
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
20
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल

वसमत नगरपालिकेचे प्राथमिक आरोग्य केंद्र चालते औषधीविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 19:16 IST

. पालिका आरोग्य विभाग सुविधा पुरविण्यास सपशेल अपयशी ठरल्याचे चित्र दिसत आहे. 

वसमत (हिंगोली ) : शहरात नगरपालिकेतर्फे शुक्रवारपेठ भागात सुरु केलेले नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र औषधीविनाच चालविले जात असल्याने गोर-गरीब  जनतेची मोठी अडचण झाली आहे. पालिका आरोग्य विभाग सुविधा पुरविण्यास सपशेल अपयशी ठरल्याचे चित्र दिसत आहे. 

शासनाने गोरगरीब जनतेला आरोग्याच्या मोफत सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने राष्ट्रीय शहरी अरोग्य अभियानांतर्गत पालिकेने सन २०१३-१४ यावर्षी शहरातील शुक्रवारपेठेत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू केले. परंतु काही काळानंतर हे केंद्र  अधिकारी कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे बंद पडले. त्यानंतर मुख्याधिकारी अशोक साबळे, आरोग्यकेंद्र व्यवस्थापक मोहम्मद नवाज कुरेशी यांनी रुग्णालयास भेट दिली.

डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना बजावून आरोग्य केंद्र नियमित चालवण्याचे आदेश दिले. त्यानंतर दररोज ४० ते ५० रुग्ण ‘ओपीडी’मध्ये प्राथमिक तपासणीसाठी येतात. परंतु आरोग्य केंद्रात रुग्णांना देण्यासाठी औषधीच उपलब्ध नसल्याने तपासणी करुन औषधांची चिठ्ठी रुग्णांच्या हातात दिली जाते. पालिका आरोग्य विभागाची ही बेजबाबदार वृत्ती शासनाच्या आरोग्य सुविधांपासून नागरिकांना वंचित ठेवत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन तत्काळ औषधी पुरवठ्याची मागणी जनतेतून होत आहे.

रुग्णांची तपासणी करुन हातात देतात चिठ्ठीशासनाच्या ई-टेंडरिंगमुळे कुठलेही औषध उपलब्ध करून देण्यात आले नाही. रोजमजुरी करून आपली उपजीविका भागवणाऱ्या अनेक कुटुंबीयांच्या आरोग्यासाठी वरदान म्हणून या रुग्णालयाकडे पाहिले जाते. मात्र केवळ आरोग्य तपासणी करून औषधांची चिठ्ठी रुग्णांच्या हातात देण्याचेच काम येथे होत आहे. त्यामुळे गोरगरीब रुग्णांची प्रचंड हेळसांड होत असून रुग्णालयात कशासाठी जावे? असा संतप्त प्रश्न व्याकूळतेने रुग्ण विचारताना दिसत आहेत.

योजना नावालाचएकीकडे केंद ्रसरकार आरोग्य योजनांचा ढिंडोरा पिटते तर दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांना आरोग्याच्या सुविधांपासून वंचित रहावे लागते. आरोग्याच्या सुविधा तळागाळापर्यंत पोहोचतच नसल्याचे दिसत आहे.

टॅग्स :Hingoliहिंगोलीmedicineऔषधंhospitalहॉस्पिटल