शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
4
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
5
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
6
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
7
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
8
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
9
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
10
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
11
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
12
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
13
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
14
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
15
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
16
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
17
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
18
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
19
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
20
अजितदादांना शह देण्यासाठी पार्थ पवार प्रकरण काढलं गेलं का?; चंद्रकांत पाटील म्हणाले...

माहिती अधिकार जनहितासाठी वापरावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 01:11 IST

लोकशाहीमध्ये माहितीचा अधिकार हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्याबद्दल समज-गैरसमज असले तरीही सर्वसामान्यांना त्यामुळे मोठा दिलासा व न्याय मिळत आहे. माहिती अधिकार व्यापक जनहितासाठी वापरला पाहिजे, असे मत माहिती आयुक्त दिलीप धारूरकर यांनी व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : लोकशाहीमध्ये माहितीचा अधिकार हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्याबद्दल समज-गैरसमज असले तरीही सर्वसामान्यांना त्यामुळे मोठा दिलासा व न्याय मिळत आहे. माहिती अधिकार व्यापक जनहितासाठी वापरला पाहिजे, असे मत माहिती आयुक्त दिलीप धारूरकर यांनी व्यक्त केले.हिंगोली जिल्ह्यातील माहिती अधिकारातील ४०० अपीलांचा निपटारा करण्यासाठी औरंगाबादचे माहिती आयुक्त धारूरकर मंगळवारी आले होते. त्यांनी शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, विविध विभागातील अपीलांचा निपटारा केला जाणार आहे. समाजसेवक अण्णा हजारे यांनी माहितीच्या अधिकाराची अंमलबजावणी व्हावी यासाठी आंदोलने केली. माहिती आयुक्तांच्या नियुक्त्या झाल्या. सध्या राज्यात माहितीच्या अधिकारातील अपीलांचा निपटारा करण्यासाठी आता माहिती आयोग खंडपीठ आपल्या दारी हा उपक्रम सुरू झाल्याचे सांगितले. या माध्यमातून संबंधित विभाग आणि अपीलार्थी यांची सुनावणी खंडपीठासमोर होत असून सर्वसामान्य माणसाला न्याय मिळत आहे. अनेक प्रकरणे ही व्यापक जनहित असलेली असतात. अशा प्रकरणांवर माहिती आयोग गांभीर्याने विचार करीत आहे. त्यावर तत्काळ निर्णय होत असल्याने लोकही समाधानी आहेत. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांचीही त्यांनी उत्तरे दिली. तर माहिती अधिकाराकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहण्याची गरज आहे. आयोगाच्या सुनावणीदरम्यान अपीलार्थीचे मागणी कोणत्या स्वरूपाची आहे. ती व्यापक जनहिताशी संबंधित आहे काय यासह सर्व बाजूंनी अभ्यास केला जातो आणि त्यानंतरच निर्णय होतो, असे ते म्हणाले.

टॅग्स :HingoliहिंगोलीInformation & broadcasting ministryमाहिती व प्रसारण मंत्रालय