शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
5
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
6
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
7
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
8
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
9
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
10
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
11
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
12
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
13
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
14
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
15
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
16
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
17
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
18
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
19
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
20
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
Daily Top 2Weekly Top 5

माहिती अधिकार जनहितासाठी वापरावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 01:11 IST

लोकशाहीमध्ये माहितीचा अधिकार हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्याबद्दल समज-गैरसमज असले तरीही सर्वसामान्यांना त्यामुळे मोठा दिलासा व न्याय मिळत आहे. माहिती अधिकार व्यापक जनहितासाठी वापरला पाहिजे, असे मत माहिती आयुक्त दिलीप धारूरकर यांनी व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : लोकशाहीमध्ये माहितीचा अधिकार हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्याबद्दल समज-गैरसमज असले तरीही सर्वसामान्यांना त्यामुळे मोठा दिलासा व न्याय मिळत आहे. माहिती अधिकार व्यापक जनहितासाठी वापरला पाहिजे, असे मत माहिती आयुक्त दिलीप धारूरकर यांनी व्यक्त केले.हिंगोली जिल्ह्यातील माहिती अधिकारातील ४०० अपीलांचा निपटारा करण्यासाठी औरंगाबादचे माहिती आयुक्त धारूरकर मंगळवारी आले होते. त्यांनी शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, विविध विभागातील अपीलांचा निपटारा केला जाणार आहे. समाजसेवक अण्णा हजारे यांनी माहितीच्या अधिकाराची अंमलबजावणी व्हावी यासाठी आंदोलने केली. माहिती आयुक्तांच्या नियुक्त्या झाल्या. सध्या राज्यात माहितीच्या अधिकारातील अपीलांचा निपटारा करण्यासाठी आता माहिती आयोग खंडपीठ आपल्या दारी हा उपक्रम सुरू झाल्याचे सांगितले. या माध्यमातून संबंधित विभाग आणि अपीलार्थी यांची सुनावणी खंडपीठासमोर होत असून सर्वसामान्य माणसाला न्याय मिळत आहे. अनेक प्रकरणे ही व्यापक जनहित असलेली असतात. अशा प्रकरणांवर माहिती आयोग गांभीर्याने विचार करीत आहे. त्यावर तत्काळ निर्णय होत असल्याने लोकही समाधानी आहेत. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांचीही त्यांनी उत्तरे दिली. तर माहिती अधिकाराकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहण्याची गरज आहे. आयोगाच्या सुनावणीदरम्यान अपीलार्थीचे मागणी कोणत्या स्वरूपाची आहे. ती व्यापक जनहिताशी संबंधित आहे काय यासह सर्व बाजूंनी अभ्यास केला जातो आणि त्यानंतरच निर्णय होतो, असे ते म्हणाले.

टॅग्स :HingoliहिंगोलीInformation & broadcasting ministryमाहिती व प्रसारण मंत्रालय