शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले; 350 टक्के शुल्काची धमकी देऊन भारत-पाक युद्ध थांबवल्याचा केला दावा
2
ताम्हिणी घाटात थार दरीत कोसळली; ६ जणांचा मृत्यू, ३ दिवसांनंतर अपघात झाल्याचे समजले
3
'गुंडांना जामीन, नेत्यांना जमीन', व्हिडीओ शेअर करत रोहित पवारांचा सीएम देवेंद्र फडणवीस यांना सवाल
4
शाह-शिंदेंची दिल्लीत भेट, चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “महायुती...”
5
'पीएम किसान' योजनेचे फिल्टर थांबेनात; २१ व्या हप्त्यासाठी ६.१० लाख लाभार्थी झाले बाद
6
'ही' मोठी बँक भारतातील व्यवसाय बंद करण्याच्या विचारात, खरेदीसाठी दोन दिग्गज बँका शर्यतीत
7
ते जीव वाचवण्यासाठी तडफडले पण कुणाला कळलंही नाही; थंडी लागू नये म्हणून शेकोटीसाठी कोळसा घेऊन आले अन्…
8
"कोणीतरी दिल्लीला गेलंय, बाबा मारलं म्हणून रडत"; अमित शाहांच्या भेटीवरुन उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला
9
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टरने अडीच वर्षीय मुलाच्या डोळ्याजवळील जखमेवर लावलं फेविक्विक
10
"महाराष्ट्रातील घडामोडींवर माझं लक्ष, तुमचा…’’, तक्रार घेऊन आलेल्या एकनाथ  शिंदेनां अमित शाहांचं मोठं आश्वासन
11
देशाचा 'नंबर १' ब्रँड TCS नव्हे तर HDFC बँक! ब्रँडझेड रिपोर्टमध्ये मोठा उलटाफेर; 'या' कारणामुळे सर्वात मौल्यवान!
12
ऐतिहासिक! नितीश कुमार यांनी 10 व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; पाहा मंत्र्यांची संपूर्ण यादी
13
Pharmacy Colleges: फार्मसी कॉलेजांना 'नो ॲडमिशन'! प्रवेशाविना १५ हजारांहून अधिक जागा रिकाम्या
14
राज्यपालांवर वेळेची मर्यादा घालता येणार नाही; राष्ट्रपतींच्या 'त्या' प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
15
अल फलाह युनिव्हर्सिटीचे चेअरमन जावेद सिद्दीकी यांच्या अडचणी वाढल्या; आता घरावर चालणार बुलडोझर 
16
“डिसेंबर अखेरपर्यंत महामेट्रो मीरा-भाईंदरकरांच्या सेवेत येणार”: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
17
Mumbai: कापूर पडलेल्या तेलात तळलेला समोसा खाल्याने विद्यार्थ्यांना विषबाधा, शाळांना अन्न सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे निर्देश!
18
एक 'अशी' शूटर बनली नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये मंत्री; जिनं भारताबाहेर कायम ठेवलाय दबदबा
19
फातिमा सना शेखने फेमिनझमवर केलं भाष्य; म्हणाली, "पुरुषांना कमी दाखवणं म्हणजे..."
20
भारतीय लष्कराला बूस्ट! अमेरिकेने जेव्हलिन क्षेपणास्त्र विक्रीला दिली मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

उदमांजराने मळणीयंत्रात दिला पाच पिल्लांना जन्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:30 IST

हिंगोली : अवघं वीस दिवसांचं वय, ट्रॅक्टरच्या मळणीयंत्रात त्यांचा जन्म झाला अन् शेतातील हे मळणीयंत्र दुरुस्तीला शहरात आले. त्यात ...

हिंगोली : अवघं वीस दिवसांचं वय, ट्रॅक्टरच्या मळणीयंत्रात त्यांचा जन्म झाला अन् शेतातील हे मळणीयंत्र दुरुस्तीला शहरात आले. त्यात अडकलेली उदमांजराची पाच पिल्लं सुखरूप बाहेर काढली. तिकडे पिल्लांसाठी आई सैरभैर. पिल्ले त्याच ठिकाणी नेल्यावर धावत येऊन तिने पिल्लांना कुशीत घेतलं आणि उपस्थितांचेही डोळे आनंदाने पाणावले.

हिंगोली तालुक्यातील बासंबा शिवारात एका शेतात ट्रॅक्टरला जोडलेल्या मळणीयंत्रात प्राण्यांमधील उदमांजरीने पिल्लं दिली. अतिशय दुर्मीळ होत असलेल्या या प्राण्याची गोंडस अशी पाच पिल्ले जन्मली. पावसाळ्याचे दिवस असल्याने सुरक्षित जागा म्हणून उदमांजरीने बहुधा ही जागा निवडली असावी. मात्र हीच सुरक्षित जागा तिच्या पिल्लांना एक दिवस तिच्यापासून कोसो दूर घेऊन जाईल, याची किंचितही कल्पना तिला नव्हती. आगामी काळात खरिपातील उडीद, मुगासारखी पिके काढणीला येणार आहेत. त्यासाठी प्रत्येक शेतकरी आपल्या मळणीयंत्राला दुरुस्त करून सज्ज ठेवतो अथवा ते चालू आहे की बंद याची तरी चाचणी घेतली जाते. सुदैवाने हे मळणीयंत्र नादुरुस्त असल्याने शेतकरी पंडित थोरात यांनी ते वर्षभरापासून शेतात अडगळीच्या ठिकाणी लावून ठेवले होते. ते दुरुस्त असते तर चालू करताच या पिल्लांना जिवास मुकावे लागले असते. पेरणीयंत्र ट्रॅक्टरला लावून गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आणले, मात्र या दरम्यान पिल्ले यंत्रामधील घट्ट जागेत गेली. त्यांना काढता येणे अवघड होते. त्यामुळे काम करणारे कारागीर अचानक थांबले. ही पिल्ले नेमकी कोणत्या प्राण्याची आहेत, हेही त्यांना माहीत नव्हते. त्यांनी तत्काळ प्राणिमित्र अमोलकुमार घांगडे यांना बोलावले. त्यांनी मग सर्पमित्र मुरलीधर कल्याणकर यांना बोलावून घेतले. कल्याणकर यांनी मळणीयंत्रात किंचाळत असलेल्या पिल्लांना अलगद बाहेर काढून पाहिले असता ती उदमांजराची असल्याचे निष्पन्न झाले. कल्याणकर यांनी या पिल्लांना दूध व मांसाहार खाऊ घातला. मात्र ही पिल्ले केवळ पंधरा ते वीस दिवसांची असल्याने त्यांना सोडायचे कुठे असा प्रश्न पडला अन् सुरू झाला त्यांच्या आईचा शोध. कल्याणकर यांनी याबाबत वन विभागाला माहिती देऊन, पिल्लांच्या आईचा शोध घेण्याचे ठरविले. ज्या बासंबा शिवारातील शेतकऱ्याच्या शेतात ही पिल्ले आढळली, तिथेच त्यांना सोडून त्यांच्या आईची भेट घडवायचे निश्चित झाले आणि अखेर आठ तासांच्या प्रयत्नांनंतर या पिल्लांना आईचा संचार असलेल्या ठिकाणी सोडले. काही वेळातच पिल्लांच्या किंचाळण्याचा आवाज ऐकताच आईने, पिल्लांकडे धाव घेत त्यांना कुशीत घेतले. काळजाचा तुकडा असलेली पिल्ले दुरावल्याने सैरभैर झालेली आई आपल्या पाचही पिल्लांची भेट झाल्यानंतरच शांत झाली.