शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

 ‘मातृवंदना’साठी दोन हजार अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 00:25 IST

केंद्र शासनाच्य महिला व बालविकास मंत्रालयाने यावर्षीपासून ‘प्रधानमंत्री मातृ वंदना’ योजना सुरू केली आहे. सदृढ व निरोगी बालक जन्माला यावे, तसेच गरोदरमाता व बालमृत्यूच्या वाढत्या संख्येत घट व्हावी यासाठी सदर योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. जिल्हा आरोग्य विभागातर्फे २ हजार १९३ आॅनलाईन अर्ज स्वीकारण्यात आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : केंद्र शासनाच्य महिला व बालविकास मंत्रालयाने यावर्षीपासून ‘प्रधानमंत्री मातृ वंदना’ योजना सुरू केली आहे. सदृढ व निरोगी बालक जन्माला यावे, तसेच गरोदरमाता व बालमृत्यूच्या वाढत्या संख्येत घट व्हावी यासाठी सदर योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. जिल्हा आरोग्य विभागातर्फे २ हजार १९३ आॅनलाईन अर्ज स्वीकारण्यात आले आहेत.माता व बालमृत्यू रोखण्यासाठी शासनस्तरावर विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. त्या अनुषंगाने शासना तर्फे प्रधानमंत्री मातृ वंदना ही योजना सुरू करण्यात आली आहे. योजनेच्या लाभासाठी गरोदर मातांची शासकीय रूग्णालय किंवा शासनमान्य खासगी रूग्णालयात नाव नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे. मातृ वंदना योजनेमध्ये केंद्र शासनाचा ६० तर ४० टक्के राज्य शासनाचा सहभाग आहे. लभार्थी महिलेस एकूण तीन टप्यात योजनेची रक्कम बँक खात्यावर जमा केली जाणार आहे.योजनेच्या लाभासाठी महिलांचे बँकखाते आधारलिंक असणे गरजेच आहे. त्यामुळे गरोदर मातांनी योजनेचा लाभासाठी बँकेत खाते आधारला जोडून घेण्याचे आवाहन आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गिते यांनी केले. स्वत:चे व लाभधारक गरोदर मातेच्या पतीचे आधार कार्ड, माता बाल संगोपन कार्ड, बँक खाते तेही आधार संलग्नित असावे, ज्यामुळे लाभधारक गरोदर मातांना अनुदानाची रक्कम थेट खात्यावर जमा करता येणे सोपे होईल. सध्या आॅनलाईनद्वारे गरोदर मातांची अर्ज प्रक्रिया सुरू असल्याची माहिती डॉ. गिते यांनी दिली. शासनाच्या योजनेचा जास्तीत जास्त गरोदर मातांनी लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची रक्कम एकूण तीन टप्प्यात लाभधारकाच्या बँक खात्यावर जमा केली जाईल.दारिद्र्य रेषेखालील व दारिद्र्य रेषेवरील लाभार्थ्यांचा समावेश योजनेत असला तरी वेतनासह मातृत्व रजा मिळविणाऱ्यांना योजनेचा लाभ दिला जाणार नाही. तसेच सदर योजने अंतर्गत पहिल्या अपत्यासाठी व शासनाने अधिसूचित केलेल्या संस्थेत नोंदणी झालेल्या महिलांना लागू आहे.तसेच लाभाची ५ हजार रुपये रक्कम तीन टप्प्यात संबंधित लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यावर जमा केली जाईल. नैसर्गिक गर्भपात झाल्यास किंवा मृत बालक जन्मल्यास त्या टप्प्यापुरताच लाभ एकदाच देण्याची तरतूद आहे.रूग्णालयातील प्रसूतीचे प्रमाण वाढावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्या अनुषंगाने विविध योजना राबविण्यात येत असून आता माता व बालमृत्यू थांबविण्यासाठी प्रधानमंत्री मातृ वंदना योजना राबविली जात आहे.