शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

 ‘मातृवंदना’साठी दोन हजार अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 00:25 IST

केंद्र शासनाच्य महिला व बालविकास मंत्रालयाने यावर्षीपासून ‘प्रधानमंत्री मातृ वंदना’ योजना सुरू केली आहे. सदृढ व निरोगी बालक जन्माला यावे, तसेच गरोदरमाता व बालमृत्यूच्या वाढत्या संख्येत घट व्हावी यासाठी सदर योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. जिल्हा आरोग्य विभागातर्फे २ हजार १९३ आॅनलाईन अर्ज स्वीकारण्यात आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : केंद्र शासनाच्य महिला व बालविकास मंत्रालयाने यावर्षीपासून ‘प्रधानमंत्री मातृ वंदना’ योजना सुरू केली आहे. सदृढ व निरोगी बालक जन्माला यावे, तसेच गरोदरमाता व बालमृत्यूच्या वाढत्या संख्येत घट व्हावी यासाठी सदर योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. जिल्हा आरोग्य विभागातर्फे २ हजार १९३ आॅनलाईन अर्ज स्वीकारण्यात आले आहेत.माता व बालमृत्यू रोखण्यासाठी शासनस्तरावर विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. त्या अनुषंगाने शासना तर्फे प्रधानमंत्री मातृ वंदना ही योजना सुरू करण्यात आली आहे. योजनेच्या लाभासाठी गरोदर मातांची शासकीय रूग्णालय किंवा शासनमान्य खासगी रूग्णालयात नाव नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे. मातृ वंदना योजनेमध्ये केंद्र शासनाचा ६० तर ४० टक्के राज्य शासनाचा सहभाग आहे. लभार्थी महिलेस एकूण तीन टप्यात योजनेची रक्कम बँक खात्यावर जमा केली जाणार आहे.योजनेच्या लाभासाठी महिलांचे बँकखाते आधारलिंक असणे गरजेच आहे. त्यामुळे गरोदर मातांनी योजनेचा लाभासाठी बँकेत खाते आधारला जोडून घेण्याचे आवाहन आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गिते यांनी केले. स्वत:चे व लाभधारक गरोदर मातेच्या पतीचे आधार कार्ड, माता बाल संगोपन कार्ड, बँक खाते तेही आधार संलग्नित असावे, ज्यामुळे लाभधारक गरोदर मातांना अनुदानाची रक्कम थेट खात्यावर जमा करता येणे सोपे होईल. सध्या आॅनलाईनद्वारे गरोदर मातांची अर्ज प्रक्रिया सुरू असल्याची माहिती डॉ. गिते यांनी दिली. शासनाच्या योजनेचा जास्तीत जास्त गरोदर मातांनी लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची रक्कम एकूण तीन टप्प्यात लाभधारकाच्या बँक खात्यावर जमा केली जाईल.दारिद्र्य रेषेखालील व दारिद्र्य रेषेवरील लाभार्थ्यांचा समावेश योजनेत असला तरी वेतनासह मातृत्व रजा मिळविणाऱ्यांना योजनेचा लाभ दिला जाणार नाही. तसेच सदर योजने अंतर्गत पहिल्या अपत्यासाठी व शासनाने अधिसूचित केलेल्या संस्थेत नोंदणी झालेल्या महिलांना लागू आहे.तसेच लाभाची ५ हजार रुपये रक्कम तीन टप्प्यात संबंधित लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यावर जमा केली जाईल. नैसर्गिक गर्भपात झाल्यास किंवा मृत बालक जन्मल्यास त्या टप्प्यापुरताच लाभ एकदाच देण्याची तरतूद आहे.रूग्णालयातील प्रसूतीचे प्रमाण वाढावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्या अनुषंगाने विविध योजना राबविण्यात येत असून आता माता व बालमृत्यू थांबविण्यासाठी प्रधानमंत्री मातृ वंदना योजना राबविली जात आहे.