शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

विसर्जनाच्या दिवशी निघाले अडीच टन निर्माल्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:33 IST

हिंगोली : गणेश विसर्जनाच्या दिवशी शहरातील नागरिकांनी निर्माल्य ठरवून दिलेल्या ठिकाणी टाकल्यामुळे निर्माल्य गोळा करण्यास सोपे झाले. विसर्जनाच्या दिवशी ...

हिंगोली : गणेश विसर्जनाच्या दिवशी शहरातील नागरिकांनी निर्माल्य ठरवून दिलेल्या ठिकाणी टाकल्यामुळे निर्माल्य गोळा करण्यास सोपे झाले. विसर्जनाच्या दिवशी अडीच टन निर्माल्य निघाले असून ते गांडूळ खत तयार करण्यासाठी प्रकल्पाकडे पाठविल्याची माहिती नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाने दिली.

औंढा रस्त्यावर नगरपरिषदेच्यावतीने खत प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. दररोज ओला व सुका कचराही वेगळा करुन प्रकल्पाकडे पाठविला जातो. १० सप्टेंबरला शहरात श्री गणेशाची स्थापना केल्यानंतर निर्माल्य एकत्र करून ठेवा, इतरत्र कुठेही निर्माल्य टाकू नका, अशा सूचना गणेश मंडळांंच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या होत्या. शेवटच्या दिवशी म्हणजे श्री गणेश विसर्जनाच्या दिवशी शहरात आदर्श महाविद्यालयाजवळील पाण्याची टाकी, शिवाजीनगर येथील दत्त मंदिर, एनटीसी मिल परिसर, अग्निशमन कार्यालय, नगरपरिषदेची नवी इमारत अशा ६ ठिकाणी कृत्रिम तलाव करण्यात आले होते. जे नागरिक कृत्रिम तलावाच्या ठिकाणी येऊ शकत नाहीत, अशांसाठी २ फिरते कुंड तयार करण्यात आले होते. या फिरत्या कुंडावर ठराविक स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. शहरातील प्रत्येक वाॅर्डात जावून नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांनी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांकडून निर्माल्य गोळा केले. काही नागरिकांनी चिरागशहाबाबा, कयाधू नदी, जलेश्वर तलाव या ठिकाणी गणेश विसर्जन केले. तेथील निर्माल्य नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी एकत्र करून निर्माल्य खत प्रकल्पाकडे पाठविले आहे.

स्वच्छता विभागाला सहकार्य करा...

शहरात स्वच्छता रहावी, कुठेही कचरा पडू नये यासाठी नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाने मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक वॉर्डात घंटागाडीची व्यवस्था केली आहे. रोज सकाळ, दुपार नियमितपणे घंटागाडी वॉर्डात जाते. तेव्हा नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगळा करून तो घंटागाडीमध्ये टाकावा आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांंना सहकार्य करावे.

-बाळू बांगर, स्वच्छता निरीक्षक