शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
3
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
4
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
5
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
6
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
7
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
8
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
9
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
10
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
11
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
12
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
13
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
14
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
15
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
16
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
17
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
18
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
19
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
20
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी

सर्पमित्रांनी पकडले एकाच दिवसात बारा साप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:20 IST

हिंगोली : पावसाळ्याचे दिवस आणि वातावरणातील बदलामुळे साप बाहेर येऊ लागले आहेत. मंगळवारी शहरातील ६ नगरांमध्ये सर्पमित्रांनी १२ साप ...

हिंगोली : पावसाळ्याचे दिवस आणि वातावरणातील बदलामुळे साप बाहेर येऊ लागले आहेत. मंगळवारी शहरातील ६ नगरांमध्ये सर्पमित्रांनी १२ साप पकडून वन विभागाकडे सुपूर्द केले.

दोन-तीन दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून, पाऊसही चांगला पडत आहे. गर्मी जास्त प्रमाणात झाल्यामुळे साप बिळातून बाहेर येऊ लागले आहेत. १५ जून रोजी शहरातील ६ नगरांमधून सर्पमित्रांना कॉल येताच सर्पमित्रांनी क्षणाचाही विलंब न लावता त्या नगरांकडे धाव घेतली. शहरातील यशवंतनगर येथे २ मणियार, १ दिवड, आदर्श महाविद्यालय परिसर १ धामण, १ मणियार, सावरकरनगर २ दिवड, सरस्वतीनगर २ दिवड, नारायणनगर १ दिवड, विद्यानगर १ दिवड, १ कुकरी असे साप पकडले. या पकडलेल्या सापांबाबत वन विभागाला कळविले असून, त्यांच्या सल्ल्यानुसार साप जंगलात नेवून सोडण्यात येणार असल्याचे सर्पमित्रांनी सांगितले.

सापांना मारू नये...

पावसाळ्याचे दिवस असल्याने साप बाहेर येणे साहजिक आहे. तेव्हा नागरिकांनी लहान - मोठ्या सापांना मारू नये. लगेच सर्पमित्रांना किंवा वन विभागाला कळवावे, असे आवाहन सर्पमित्र मुरलीधर कल्याणकर, ओम जाधव यांनी केले आहे. फाेटाे आहे.