शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

निकालाच्या सूत्राने उडविली बारावीच्या विद्यार्थ्यांची झोप; दहावी-अकरावीच्या गुणांनी वाढविली चिंता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:21 IST

कोरोनामुळे शासनाला बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्यासोबतच बारावीचा निकाल जाहीर करण्यासाठी ३०-३०-४० चे सूत्र ठरविण्यात आले. ...

कोरोनामुळे शासनाला बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्यासोबतच बारावीचा निकाल जाहीर करण्यासाठी ३०-३०-४० चे सूत्र ठरविण्यात आले. या सूत्रानुसार दहावी व अकरावीत मिळालेल्या बेस्ट ऑफ थ्री विषयांतील गुण विचारात घेतले जाणार आहेत. तसेच बारावीचे अंतर्गत गुण विचारात घेऊनच बारावीचा अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे. अनेक विद्यार्थी अकरावीला रेस्ट इयर समजतात, तर काही विद्यार्थी अकरावीपासूनच बारावी अभ्यक्रमाच्या तयारीला लागतात. अकरावीचे वर्ष क्लासेसमध्ये घालतात. त्यामुळे अकरावीच्या गुणांकडे दुर्लक्ष होते. आता बारावीचा निकाल जाहीर करताना, अकरावीच्या गुणांचा विचार केला जाणार आहे. त्यात दहावीला कमी गुण मिळाले, तरी बारावीला चांगला अभ्यास करून चांगले क्षेत्र निवडण्याच्या तयारीत असलेल्या विद्यार्थ्यांनाही या सूत्राचा फटका बसणार आहे. बारावीच्या निकालाविषयी पालकांसह विद्यार्थ्यांमध्येही धाकधूक असल्याचे पाहावयास मिळत आहे.

३० टक्के सूत्र गणित बिघडविणार!

माझे बारावी सायन्स असल्याने वर्षभर अभ्यास केला. वर्षभराच्या अभ्यासावरच गुण घेऊन उत्तीर्ण होण्याची अपेक्षा होती. परंतु, मागील दोन वर्षांच्या गुणवत्तेवर बारावीचा निकाल जाहीर करणे म्हणजे अपेक्षाभांग आहे. बारावीच्या अभ्यासावरच बारावीचे गुण मिळावेत.

- सुनील शिवाजी खराटे, विद्यार्थी

इयत्ता १२ वी कला विषयाचा पूर्ण अभ्यास केला होता. परंतु परीक्षाच झाली नसल्याने वैयक्तिक गुणवत्तेवर परिणाम होणार आहे. त्यातच १० वी, ११ वीची गुणवत्ता बारावीसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. यामुळे बारावीत केलेल्या मेहनतीवर पाणी फेरले जाणार आहे.

- अनिल बाबूराव खराटे, विद्यार्थी

विद्यार्थ्यांनी पुढील परीक्षांवर फोकस ठेवावा

इयत्ता अकरावीचे वर्ष विश्रांतीचे समजून अकरावीला कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ३०-३०-४० या सूत्रामुळे काही प्रमाणात कमी होऊ शकते. मात्र विद्यार्थ्यांनी पुढील परीक्षांवर फोकस ठेवून आपला अभ्यास कायम ठेवावा.

- प्रा. गजानन आसोलेकर, जिल्हाध्यक्ष, जुक्टा संघटना, हिंगोली

सर्व राज्यभर काही प्रमाणात गुणांची टक्केवारी निश्चित वाढणार आहे. टक्केवारीच्या प्रमाणात गुणवत्ता वाढेल, याबाबत साशंकता आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासातील सातत्य कायम ठेवून यश मिळवावे.

- प्रा. विशाल साहू, कळमनुरी

जिल्ह्यातील बारावीतील विद्यार्थी

सीबीएसई एकूण विद्यार्थी ००

मुले - ००

मुली -००

स्टेट बोर्ड एकूण विद्यार्थी १४३८७

मुले ७९५०

मुली -६४३७