शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

निकालाच्या सूत्राने उडविली बारावीच्या विद्यार्थ्यांची झोप; दहावी-अकरावीच्या गुणांनी वाढविली चिंता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:21 IST

कोरोनामुळे शासनाला बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्यासोबतच बारावीचा निकाल जाहीर करण्यासाठी ३०-३०-४० चे सूत्र ठरविण्यात आले. ...

कोरोनामुळे शासनाला बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्यासोबतच बारावीचा निकाल जाहीर करण्यासाठी ३०-३०-४० चे सूत्र ठरविण्यात आले. या सूत्रानुसार दहावी व अकरावीत मिळालेल्या बेस्ट ऑफ थ्री विषयांतील गुण विचारात घेतले जाणार आहेत. तसेच बारावीचे अंतर्गत गुण विचारात घेऊनच बारावीचा अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे. अनेक विद्यार्थी अकरावीला रेस्ट इयर समजतात, तर काही विद्यार्थी अकरावीपासूनच बारावी अभ्यक्रमाच्या तयारीला लागतात. अकरावीचे वर्ष क्लासेसमध्ये घालतात. त्यामुळे अकरावीच्या गुणांकडे दुर्लक्ष होते. आता बारावीचा निकाल जाहीर करताना, अकरावीच्या गुणांचा विचार केला जाणार आहे. त्यात दहावीला कमी गुण मिळाले, तरी बारावीला चांगला अभ्यास करून चांगले क्षेत्र निवडण्याच्या तयारीत असलेल्या विद्यार्थ्यांनाही या सूत्राचा फटका बसणार आहे. बारावीच्या निकालाविषयी पालकांसह विद्यार्थ्यांमध्येही धाकधूक असल्याचे पाहावयास मिळत आहे.

३० टक्के सूत्र गणित बिघडविणार!

माझे बारावी सायन्स असल्याने वर्षभर अभ्यास केला. वर्षभराच्या अभ्यासावरच गुण घेऊन उत्तीर्ण होण्याची अपेक्षा होती. परंतु, मागील दोन वर्षांच्या गुणवत्तेवर बारावीचा निकाल जाहीर करणे म्हणजे अपेक्षाभांग आहे. बारावीच्या अभ्यासावरच बारावीचे गुण मिळावेत.

- सुनील शिवाजी खराटे, विद्यार्थी

इयत्ता १२ वी कला विषयाचा पूर्ण अभ्यास केला होता. परंतु परीक्षाच झाली नसल्याने वैयक्तिक गुणवत्तेवर परिणाम होणार आहे. त्यातच १० वी, ११ वीची गुणवत्ता बारावीसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. यामुळे बारावीत केलेल्या मेहनतीवर पाणी फेरले जाणार आहे.

- अनिल बाबूराव खराटे, विद्यार्थी

विद्यार्थ्यांनी पुढील परीक्षांवर फोकस ठेवावा

इयत्ता अकरावीचे वर्ष विश्रांतीचे समजून अकरावीला कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ३०-३०-४० या सूत्रामुळे काही प्रमाणात कमी होऊ शकते. मात्र विद्यार्थ्यांनी पुढील परीक्षांवर फोकस ठेवून आपला अभ्यास कायम ठेवावा.

- प्रा. गजानन आसोलेकर, जिल्हाध्यक्ष, जुक्टा संघटना, हिंगोली

सर्व राज्यभर काही प्रमाणात गुणांची टक्केवारी निश्चित वाढणार आहे. टक्केवारीच्या प्रमाणात गुणवत्ता वाढेल, याबाबत साशंकता आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासातील सातत्य कायम ठेवून यश मिळवावे.

- प्रा. विशाल साहू, कळमनुरी

जिल्ह्यातील बारावीतील विद्यार्थी

सीबीएसई एकूण विद्यार्थी ००

मुले - ००

मुली -००

स्टेट बोर्ड एकूण विद्यार्थी १४३८७

मुले ७९५०

मुली -६४३७