शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

दुष्काळी मदतीसाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 23:30 IST

हमीभावाची खात्री, नांगरणी ते कापणीची कामे मग्रारोहयोतून करावी, शेतमजूरांना पेन्शन द्यावे आणि दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना भरीव मदत करावी, असे ठराव घेण्यात आल्याची माहिती भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष ज्ञानोबा मुंढे यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : हमीभावाची खात्री, नांगरणी ते कापणीची कामे मग्रारोहयोतून करावी, शेतमजूरांना पेन्शन द्यावे आणि दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना भरीव मदत करावी, असे ठराव घेण्यात आल्याची माहिती भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष ज्ञानोबा मुंढे यांनी दिली.हिंगोली येथील केमिस्ट भवनात २० आॅक्टोबर रोजी भाजपच्या किसान मोर्चाची कार्यकारिणी बैठक झाली. आज विश्रामगृहावर मुंढे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी आ. तान्हाजी मुटकुळे, माजी खा. शिवाजी माने, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, गणेश बांगर, फुलाजी शिंदे आदी उपस्थित होते.मुंढे म्हणाले, राज्यात दुष्काळाचे चित्र गंभीर आहे. किसान मोर्चातर्फे शासनाकडे विविा उपाययोजनांसाठी मागणी करण्यात येणार आहे. यंदा शेतकºयांना लावडखर्च निघेल एवढेही उत्पादन झाले नाही. शिवाय भविष्यात लागवड करणेही अवघड आहे. त्यामुळे शेतीतील नांगरणी, कोळपणीसह कापणीपर्यंतच्या सर्व कामांना मग्रारोहयोतून मजूरी देण्याची मागणी करणार आहोत. शेतीमाल हमीभावाने खरेदीची सक्ती अथवा शासकीय खरेदी केंद्र सुरु करावेत, शेतमजूरांना पेन्शन द्यावी, अशी मागणीही करणार असल्याचे सांगितले. यावेळी सिंचन प्रश्नाचा मुद्दाही पत्रकांरानी विचारला. त्यावर आ. मुटकुळे यांनी १५ हजार हेक्टरच्या अनुशेषातील कामे होणार असल्याचे सांगितले. तर याला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण विरोध करीत असल्याने त्यांचा निषेध व्यक्त केला. चव्हाण हे माजी मुख्यमंत्री राहिले. त्यांनी लहान जिल्ह्यांचाही विचार केला पाहिजे, असे सांगून जयप्रकाश दांडेगावकर यांच्याशीही यावर चर्चा केल्याचेही सांगितले.

टॅग्स :HingoliहिंगोलीPoliticsराजकारण