शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

पार्डीमोड वळणावर ट्रक उलटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:27 IST

कळमनुरी : तालुक्यातील पार्डीमोड वळणावर एक मालवाहू ट्रक उलटल्याची घटना दि. ११ फेब्रुवारी रोजी घडली यामध्ये काही जीवितहानी झाली ...

कळमनुरी : तालुक्यातील पार्डीमोड वळणावर एक मालवाहू ट्रक उलटल्याची घटना दि. ११ फेब्रुवारी रोजी घडली यामध्ये काही जीवितहानी झाली नसल्याचे सांगितले जात आहे. मालवाहू ट्रकमध्ये टॉवरला वापरण्यात येणारी अँगल होते. अपघातानंतर लोखंडी अँगल ट्रकच्या बाहेर जाऊन पडले. काही दिवसांपूर्वी आखाडा बाळापूर परिसरात असाच टाॅवरच्या अँगलची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात होऊन त्यात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.

तुरीच्या उत्पादनात घट

आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी तुरीचे पीक घेतले होते. आता बहुतांश शेतकऱ्यांनी तुरीची काढणी केली आहे. मात्र तुरीच्या उत्पादनात घट होत असल्याचे पहावयास मिळत आहे. यामुळे तुरीच्या पेरणीसाठी केलेला खर्चही निघत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. यापूर्वी कापसाने दगा दिल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

सावरगाव परिसरात खड्डे

हिंगोली : तालुक्यातील सावरगाव परिसरात हिंगोली ते नांदेडरोडवर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. सावरगावाजवळ पुलाचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे पुलाजवळ सुरक्षेसाठी कठडे तयार करण्यात आले आहेत. त्यात हे खड्डे पडल्याने रस्ता धोकादायक ठरत आहे. या रस्त्यावरून होत असलेली वाहतुकीची वर्दळ लक्षात घेता सावरगाव परिसरातील खड्डे बुजवावेत, अशी मागणी होत आहे.

नवीन खांब बसवा

कळमनुरी : तालुक्यातील शेतकऱ्यांना वीजपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी ग्रामीण भागात विजेचे खांब बसवून त्यांना वीजजोडणी देण्यात आली आहे. वीज उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांनी सिंचनाची पिके घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र अनेक ठिकाणी विजेचे खांब वाकलेले आहेत. परिणामी वीजतारा लोंबकाळून एकमेकांना घासत आहेत. यातून वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे वाकलेले विजेचे खांब काढून त्या ठिकाणी नवीन खांब बसवावेत, अशी मागणी होत आहे.

रस्त्यावरच उभी करताहेत खासगी बस

वारंगा फाटा : कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथून हदगाव, नांदेड, हिंगोलीकडे मार्ग जातो. त्यामुळे वाहनांची वर्दळ कायम असते. मात्र अनेकवेळा खासगी बसेस मुख्य रस्त्यावरच उभी केली जात आहेत. रस्त्यावर वाहने उभी केली जात असल्याने इतर वाहनचालकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच याचा फटका रुग्णवाहिकेलाही बसत आहे. याकडे लक्ष देऊन रस्त्यावर वाहने उभी करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

रोहयोची कामे सुरू करा

हिंगोली : ग्रामीण भागातील बहुतांश कामे आता उरकत आले आहेत. आणखी १५ ते २० दिवस मजुरांना शेतातील कामे मिळतील, अशी परिस्थिती आहे. १५ ते २० दिवसांनंतर कामे उपलब्ध होणार नसल्याने अनेक मजूर आता मोठ्या शहराकडे स्थलांतर करण्याच्या तयारीत आहेत. तसेच यापूर्वीही काही मजुरांनी स्थलांतर केले आहे. स्थलांतर रोखण्यासाठी गावातच कामे उपलब्ध करून देण्यासाठी रोहयोची कामे सुरू करावीत, अशी मागणी होत आहे.

तळीरामांचा वावर वाढला

आखाडा बळापूर : कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील बसस्थानकात सायंकाळच्या वेळी तळीरामांचा वावर वाढत आहे. रात्री उशिरापर्यंत तळीराम थांबत असल्याने येथून प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे लक्ष देऊन तळीरामांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

गतिरोधक ठरताहेत धोकादायक

कळमनुरी : कळमनुरी तालुक्यातील माळेगाव हे मुख्य मार्गावरील गाव आहे. सुरक्षितरीत्या रस्ता ओलांडता यावा, यासाठी गावाच्या दोन्ही बाजूंनी हिंगोली ते नांदेडमार्गावर गतिरोधक बसविण्यात आले आहेत. मात्र कळमनुरीच्या बाजूने असलेला गतिरोधक धोकादाय ठरत आहे. हा गतिरोधक रस्त्याच्या मध्यापर्यंतच असल्याने नांदेडकडून येणारी वाहनेही विरुद्ध दिशेने चालविली जात आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण होत आहे. याकडे लक्ष देऊन एक तर गतिरोधक काढून टाकावा किंवा गतिरोधक पूर्ण रस्त्यावर बसवावा, अशी मागणी होत आहे.