शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
3
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
4
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
5
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
6
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
7
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
8
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
9
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
10
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
11
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
12
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
13
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
14
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
15
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
16
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
17
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
18
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
19
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
20
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?

पार्डीमोड वळणावर ट्रक उलटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:27 IST

कळमनुरी : तालुक्यातील पार्डीमोड वळणावर एक मालवाहू ट्रक उलटल्याची घटना दि. ११ फेब्रुवारी रोजी घडली यामध्ये काही जीवितहानी झाली ...

कळमनुरी : तालुक्यातील पार्डीमोड वळणावर एक मालवाहू ट्रक उलटल्याची घटना दि. ११ फेब्रुवारी रोजी घडली यामध्ये काही जीवितहानी झाली नसल्याचे सांगितले जात आहे. मालवाहू ट्रकमध्ये टॉवरला वापरण्यात येणारी अँगल होते. अपघातानंतर लोखंडी अँगल ट्रकच्या बाहेर जाऊन पडले. काही दिवसांपूर्वी आखाडा बाळापूर परिसरात असाच टाॅवरच्या अँगलची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात होऊन त्यात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.

तुरीच्या उत्पादनात घट

आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी तुरीचे पीक घेतले होते. आता बहुतांश शेतकऱ्यांनी तुरीची काढणी केली आहे. मात्र तुरीच्या उत्पादनात घट होत असल्याचे पहावयास मिळत आहे. यामुळे तुरीच्या पेरणीसाठी केलेला खर्चही निघत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. यापूर्वी कापसाने दगा दिल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

सावरगाव परिसरात खड्डे

हिंगोली : तालुक्यातील सावरगाव परिसरात हिंगोली ते नांदेडरोडवर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. सावरगावाजवळ पुलाचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे पुलाजवळ सुरक्षेसाठी कठडे तयार करण्यात आले आहेत. त्यात हे खड्डे पडल्याने रस्ता धोकादायक ठरत आहे. या रस्त्यावरून होत असलेली वाहतुकीची वर्दळ लक्षात घेता सावरगाव परिसरातील खड्डे बुजवावेत, अशी मागणी होत आहे.

नवीन खांब बसवा

कळमनुरी : तालुक्यातील शेतकऱ्यांना वीजपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी ग्रामीण भागात विजेचे खांब बसवून त्यांना वीजजोडणी देण्यात आली आहे. वीज उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांनी सिंचनाची पिके घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र अनेक ठिकाणी विजेचे खांब वाकलेले आहेत. परिणामी वीजतारा लोंबकाळून एकमेकांना घासत आहेत. यातून वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे वाकलेले विजेचे खांब काढून त्या ठिकाणी नवीन खांब बसवावेत, अशी मागणी होत आहे.

रस्त्यावरच उभी करताहेत खासगी बस

वारंगा फाटा : कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथून हदगाव, नांदेड, हिंगोलीकडे मार्ग जातो. त्यामुळे वाहनांची वर्दळ कायम असते. मात्र अनेकवेळा खासगी बसेस मुख्य रस्त्यावरच उभी केली जात आहेत. रस्त्यावर वाहने उभी केली जात असल्याने इतर वाहनचालकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच याचा फटका रुग्णवाहिकेलाही बसत आहे. याकडे लक्ष देऊन रस्त्यावर वाहने उभी करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

रोहयोची कामे सुरू करा

हिंगोली : ग्रामीण भागातील बहुतांश कामे आता उरकत आले आहेत. आणखी १५ ते २० दिवस मजुरांना शेतातील कामे मिळतील, अशी परिस्थिती आहे. १५ ते २० दिवसांनंतर कामे उपलब्ध होणार नसल्याने अनेक मजूर आता मोठ्या शहराकडे स्थलांतर करण्याच्या तयारीत आहेत. तसेच यापूर्वीही काही मजुरांनी स्थलांतर केले आहे. स्थलांतर रोखण्यासाठी गावातच कामे उपलब्ध करून देण्यासाठी रोहयोची कामे सुरू करावीत, अशी मागणी होत आहे.

तळीरामांचा वावर वाढला

आखाडा बळापूर : कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील बसस्थानकात सायंकाळच्या वेळी तळीरामांचा वावर वाढत आहे. रात्री उशिरापर्यंत तळीराम थांबत असल्याने येथून प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे लक्ष देऊन तळीरामांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

गतिरोधक ठरताहेत धोकादायक

कळमनुरी : कळमनुरी तालुक्यातील माळेगाव हे मुख्य मार्गावरील गाव आहे. सुरक्षितरीत्या रस्ता ओलांडता यावा, यासाठी गावाच्या दोन्ही बाजूंनी हिंगोली ते नांदेडमार्गावर गतिरोधक बसविण्यात आले आहेत. मात्र कळमनुरीच्या बाजूने असलेला गतिरोधक धोकादाय ठरत आहे. हा गतिरोधक रस्त्याच्या मध्यापर्यंतच असल्याने नांदेडकडून येणारी वाहनेही विरुद्ध दिशेने चालविली जात आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण होत आहे. याकडे लक्ष देऊन एक तर गतिरोधक काढून टाकावा किंवा गतिरोधक पूर्ण रस्त्यावर बसवावा, अशी मागणी होत आहे.