शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शहरात विरुद्ध दिशेने वाहतूक सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:27 IST

बसस्थानकात पिण्याच्या पाण्याची सोय करावी हिंगोली: शहरातील बसस्थानकात मागील काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे प्रवाशांना पिण्याचे पाणी ...

बसस्थानकात पिण्याच्या पाण्याची सोय करावी

हिंगोली: शहरातील बसस्थानकात मागील काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे प्रवाशांना पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. एस. टी. महामंडळाच्या आगारप्रमुखांनी याची दखल घेऊन प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

वीजपुरवठा खंडित : शेतकरी त्रस्त

कळमनुरी: तालुक्यातील ग्रामीण भागात १५ दिवसांपासून वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. विहिरींना सद्य:स्थितीत भरपूर प्रमाणात पाणी असतानाही वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे पिकांना पाणी देता येत नाही. त्यामुळे पिके वाळून जात आहेत. महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरळीत करणे गरजेचे आहे.

वळण रस्ते बनले खड्डेमय

आखाडा बाळापूर: कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर परिसरातील वळण रस्ते मागील काही दिवसांपासून खड्डेमय बनले आहेत. खड्ड्यामुळे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. वेळोवेळी संंबंधित विभागाला सांगण्यात आले, परंतु, अद्यापतरी कोणीही लक्ष देण्यास तयार होत नाही. संबंधित विभागाने वळण रस्त्यावरील खड्डे डांबरमिश्रीत गिट्टी टाकून बुजवावेत, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.

शिरडशहापूर येथे दिवसाही पथदिवे सुरु

शिरडशहापूर: औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथील बाजारगल्ली, रजा मोहल्ला, मारोती मंदिर आदी परिसरात दिवे सुरू आहेत.

याबाबत वेळोवेळी ग्रामपंचायतला कळविले. परंतु, कोणीही अद्यापतरी लक्ष दिले नाही. ग्रामपंचायतच्या संबंधित विभागाने याची दखल घेऊन दिवसा सुरू असलेले पथदिवे बंद करावेत, अशी मागणी होत आहे.

वानरांचा बंदोबस्त करा ; नागरिकांची मागणी

हिंगोली: शहरातील कापडगल्ली, शास्त्रीनगर, गंगानगर, शिवाजीनगर, जिजामातानगर, तोफखाना आदी भागात वानरे छतावरून उड्या मारत आहेत. अंगणात ठेवलेल्या वस्तूंची नासाडी करीत करीत आहेत. वानरांना हाकलण्याचा प्रयत्न केल्यास अंगावर धावून येत आहेत. वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन वानरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.