शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

‘मातोश्री’भेट ठरतेय चर्चेचा विषय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 00:52 IST

लोकसभेची जागा शिवसेनेला सुटणार हे नक्की झाल्यानंतर शिवसेनेसह इतर पक्षातीलही काहींनी मुंबईत मातोश्रीवर भेट देत उमेदवारीची मागणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : लोकसभेची जागा शिवसेनेला सुटणार हे नक्की झाल्यानंतर शिवसेनेसह इतर पक्षातीलही काहींनी मुंबईत मातोश्रीवर भेट देत उमेदवारीची मागणी केली. दररोज घडणाऱ्या या घडामोडींची तर चर्चा होतेच. मात्र शिवसेनेच्या नेत्यांची प्रत्येक भेटही वादंगाला तोंड देणारी अथवा नवी चर्चा निर्माण करणारी ठरत आहे. आज पुन्हा उमेदवारी जाहीर झाल्याच्या वावड्या उठल्यानंतर शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली होती.समाजमाध्यमांवर होणाऱ्या चर्चा आता प्रत्येकच पक्षाला डोकेदुखी ठरत आहेत. शिवसेनेचे डॉ.जयप्रकाश मुंदडा यांना उमेदवारी मिळाल्याने वसमतमध्ये आतषबाजी झाल्याचे फोटो व्हायरल झाल्याने हा चर्चेचा विषय ठरला. तर दुसरीकडे डॉ.जयप्रकाश मुंदडा, आ.हेमंत पाटील, आ.नागेश पाटील, जिल्हाप्रमुख संतोष बांगर, अंकुश आहेर आदी मंडळी मात्र मुंबईत मातोश्रीवर गेली होती. त्यांनी तेथे पक्षप्रमुखांशी चर्चा केली. तेथे अजूनही कोणालाच अंतिम उमेदवारीचा शब्द मिळाला नाही. फक्त तेथे सर्वांनी एकत्र काढलेल्या छायाचित्रावरूनच अनुमान लावत उमेदवारीच्या वाºयावरील गप्पांना ऊत आला होता. त्यामुळे पुन्हा एकदा उमेदवारी अजून निश्चित नाही. केवळ दिलेल्या उमेदवाराचे काम करण्याचे आदेशच मिळाल्याचे सांगताना शिवसेना नेत्यांना कसरत करावी लागली.या सर्व बाबींमध्ये आ.मुंदडा यांचे नाव मात्र अंतिम मानले जात आहे. काही शिवसैनिक तर जणू उमेदवारी जाहीर झाल्याप्रमाणेच सांगत आहेत. मात्र मुंदडा यांचा गट अजूनही सावध भूमिकेतच आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच कळेल, असे सांगत आहे.सेनाच लक्ष्यसमाजमाध्यमांवर शिवसेनाच वारंवार का लक्ष्य ठरत आहे, हे कळायला मार्ग नाही. यामध्ये सेनेतील अंतर्गत गटबाजी कारणीभूत आहे की, वाढलेली इच्छुकांची संख्या, हे कळायला मार्ग नाही. मात्र सेनेच्या बाबतीतच अफवांचा बाजार कायम गरम राहत असल्याने ही बाब चिंतेची बनली आहे.आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी शिष्टमंडळ गेले होते. त्यात हिंगोली लोकसभेच्या उमेदवारीच्या इच्छुकांबाबत चर्चा झाली. तर जो उमेदवार दिला जाईल, त्याचे काम करा असा आदेश त्यांनी दिला. अजून उमेदवारी अंतिम झाली नाही, असे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी सांगितले.अफवा पसरविल्या जाताहेत-आहेरसेनेची उमेदवारी जाहीर झाल्याच्या अफवा पसरविल्या जात आहेत. अजून उमेदवारी निश्चित झाली नाही, असे औंढा तालुकाप्रमुख अंकुश आहेर यांनी सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणShiv Senaशिवसेना