शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

शौचालय बांधकाम; ३९ कोटी रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 00:52 IST

जिल्ह्यात संपूर्ण स्वच्छता अभियानाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मागील सहा महिन्यांतच मोठ्या प्रमाणात शौचालय बांधकाम झाले. मात्र त्यासाठीच्या प्रोत्साहन अनुदानाची बोंब अजूनही संपली नसून सर्व लाभार्थ्यांची देयके अदा करण्यास अजून ३९ कोटी रुपये लागणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात संपूर्ण स्वच्छता अभियानाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मागील सहा महिन्यांतच मोठ्या प्रमाणात शौचालय बांधकाम झाले. मात्र त्यासाठीच्या प्रोत्साहन अनुदानाची बोंब अजूनही संपली नसून सर्व लाभार्थ्यांची देयके अदा करण्यास अजून ३९ कोटी रुपये लागणार आहेत.हिंगोली जिल्ह्यात मागील सहा महिन्यांत संपूर्ण स्वच्छता अभियानात शौचालय बांधकामास मोठी गती आली होती. त्यामुळे एकाचवेळी मोठ्या संख्येने झालेल्या कामांमुळे प्रोत्साहन अनुदानाच्या बारा हजारांच्या रक्कमेचा पेच निर्माण झाला होता. झालेल्या कामांप्रमाणे देयके सादर होत असली तरीही ती अदा होण्यास निधीची अडचण होती. यात ५९.८४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता. यापैकी ५५.२१ कोटी रुपये तालुका स्तरावर वितरित झालेले आहेत. तालुका स्तरावर यापैकी ११.२४ कोटी रुपयांचे वाटप सुरू आहे. तर जिल्हा स्तरावर ४.९४ कोटी रुपये शिल्लक आहेत.जानेवारी २0१८ पर्यंत जिल्हा हागणदारीमुक्त घोषित करण्यासाठी प्रशासनाने मोठी लगबग चालविली होती. त्यामुळे औंढ्यात ११९२४, वसमतला १७२३१, हिंगोलीत १२८११, कळमनुरीत १८११५, सेनगावात १७७५२ अशा एकूण ७७८३३ शौचालयांचे काम पूर्ण झाले. त्यांना प्रत्येकी १२ हजार रुपये याप्रमाणे ९३.३९ कोटी रुपये एवढा निधी लागणार होता. ५४ कोटीच मिळालेले असल्याने उर्वरित ३९ कोटींचा प्रश्न आहे. यापैकी ४ कोटी रुपये नुकतेच प्राप्त झाले असल्याचे सांगितले जाते. जिल्हा नियोजन समितीकडूनही एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी देणे शक्य नाही. तर केंद्र शासनाकडून निधी येत नाही.या योजनेत औंढा तालुक्यास ४.८८ कोटी, वसमतला ७.७६ कोटी, हिंगोलीला ५.४४ कोटी, कळमनुरीत १0.५१ कोटी तर सेनगावला १0.४७ कोटी रुपये निधी लागणार आहे. एवढी रक्कम मिळाल्यास सर्व लाभार्थ्यांना प्रोत्साहन अनुदान देणे शक्य होणार आहे. मात्र ही रक्कमच शासनाकडूनदिली जात नसल्याचे चित्र आहे. जि.प.स्तरावरून याचा पाठपुरावाही सुरू आहे. लाभार्थी मात्र यासाठी गावात सरपंच, ग्रामसेवक अथवा बांधकामास प्रवृत्त करणाऱ्यांच्या मागे तगादा लावत आहेत. ही मंडळी जि.प.त चौकशी करून हैराण आहे.संपूर्ण स्वच्छता अभियानाचा दुसरा टप्पा म्हणून घनकचरा व्यवस्थापन व बांधकाम झालेल्या शौचालयांचा वापर करण्यासाठी स्वच्छताग्रही नेमण्याचा असून लवकरच सुरू होणार आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान