शहरं
Join us  
Trending Stories
1
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
2
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
3
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
4
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
5
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
6
सिंह राशीसाठी नवीन वर्ष 2026 स्वप्नपूर्तीचे वर्ष; आश्चर्याचे धक्के आणि परदेश प्रवासाचे योग!
7
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
8
अदानी ग्रुपकडून मिळाली ₹3400 कोटींची ऑर्डर, झटक्यात ५% नं वधारला शेअर; आता खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड
9
गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
10
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
11
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
12
बापरे! हिवाळ्यात 'या' छोट्या चुकांमुळे वेगाने गळू लागतात केस, टक्कल पडण्याची वाटते भीती
13
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
14
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
15
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
16
अबरारची दहशत अन् रहमान डकैतचा स्वॅग! पडद्यावरच्या 'बॅड बॉईज'ने कशी लुटली लाइमलाइट?
17
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
18
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
19
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
20
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

शौचालय बांधकाम; ३९ कोटी रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 00:52 IST

जिल्ह्यात संपूर्ण स्वच्छता अभियानाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मागील सहा महिन्यांतच मोठ्या प्रमाणात शौचालय बांधकाम झाले. मात्र त्यासाठीच्या प्रोत्साहन अनुदानाची बोंब अजूनही संपली नसून सर्व लाभार्थ्यांची देयके अदा करण्यास अजून ३९ कोटी रुपये लागणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात संपूर्ण स्वच्छता अभियानाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मागील सहा महिन्यांतच मोठ्या प्रमाणात शौचालय बांधकाम झाले. मात्र त्यासाठीच्या प्रोत्साहन अनुदानाची बोंब अजूनही संपली नसून सर्व लाभार्थ्यांची देयके अदा करण्यास अजून ३९ कोटी रुपये लागणार आहेत.हिंगोली जिल्ह्यात मागील सहा महिन्यांत संपूर्ण स्वच्छता अभियानात शौचालय बांधकामास मोठी गती आली होती. त्यामुळे एकाचवेळी मोठ्या संख्येने झालेल्या कामांमुळे प्रोत्साहन अनुदानाच्या बारा हजारांच्या रक्कमेचा पेच निर्माण झाला होता. झालेल्या कामांप्रमाणे देयके सादर होत असली तरीही ती अदा होण्यास निधीची अडचण होती. यात ५९.८४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता. यापैकी ५५.२१ कोटी रुपये तालुका स्तरावर वितरित झालेले आहेत. तालुका स्तरावर यापैकी ११.२४ कोटी रुपयांचे वाटप सुरू आहे. तर जिल्हा स्तरावर ४.९४ कोटी रुपये शिल्लक आहेत.जानेवारी २0१८ पर्यंत जिल्हा हागणदारीमुक्त घोषित करण्यासाठी प्रशासनाने मोठी लगबग चालविली होती. त्यामुळे औंढ्यात ११९२४, वसमतला १७२३१, हिंगोलीत १२८११, कळमनुरीत १८११५, सेनगावात १७७५२ अशा एकूण ७७८३३ शौचालयांचे काम पूर्ण झाले. त्यांना प्रत्येकी १२ हजार रुपये याप्रमाणे ९३.३९ कोटी रुपये एवढा निधी लागणार होता. ५४ कोटीच मिळालेले असल्याने उर्वरित ३९ कोटींचा प्रश्न आहे. यापैकी ४ कोटी रुपये नुकतेच प्राप्त झाले असल्याचे सांगितले जाते. जिल्हा नियोजन समितीकडूनही एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी देणे शक्य नाही. तर केंद्र शासनाकडून निधी येत नाही.या योजनेत औंढा तालुक्यास ४.८८ कोटी, वसमतला ७.७६ कोटी, हिंगोलीला ५.४४ कोटी, कळमनुरीत १0.५१ कोटी तर सेनगावला १0.४७ कोटी रुपये निधी लागणार आहे. एवढी रक्कम मिळाल्यास सर्व लाभार्थ्यांना प्रोत्साहन अनुदान देणे शक्य होणार आहे. मात्र ही रक्कमच शासनाकडूनदिली जात नसल्याचे चित्र आहे. जि.प.स्तरावरून याचा पाठपुरावाही सुरू आहे. लाभार्थी मात्र यासाठी गावात सरपंच, ग्रामसेवक अथवा बांधकामास प्रवृत्त करणाऱ्यांच्या मागे तगादा लावत आहेत. ही मंडळी जि.प.त चौकशी करून हैराण आहे.संपूर्ण स्वच्छता अभियानाचा दुसरा टप्पा म्हणून घनकचरा व्यवस्थापन व बांधकाम झालेल्या शौचालयांचा वापर करण्यासाठी स्वच्छताग्रही नेमण्याचा असून लवकरच सुरू होणार आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान