शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
4
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
5
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
6
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
7
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
8
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
9
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
10
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
11
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
12
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
13
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
14
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
15
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
16
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
17
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
18
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

घरात बसून कंटाळलोय; फिरण्यासाठी हवाय ई-पास...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:37 IST

हिंगोली: कोरोना काळात लग्न, अंत्यविधी, दवाखान्यात जाण्यासाठी नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून शासनाने ई-पास बंधनकारक केले आहे. मात्र ई-पास ...

हिंगोली: कोरोना काळात लग्न, अंत्यविधी, दवाखान्यात जाण्यासाठी नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून शासनाने ई-पास बंधनकारक केले आहे. मात्र ई-पास घेताना काही नागरिक अफलातूर कारणे देत आहेत. घरात बसून कंटाळा आलाय, बाहेर जाण्यासाठी ई-पास हवाय , मुलीला बघण्यासाठी जायचे आहे आदी कारणे ई-पास घेताना दिली जात आहेत.

जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत गेली. अशीच स्थिती राज्यभरातील होती. त्यामुळे संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने कडक निर्बंध लागू केले होते. नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडण्यास निर्बंध घालण्यात आले होते. एकीकडे कोरोना संसर्ग रोखण्याची जबाबदारी तर दुसरीकडे अंत्यसंस्कार, दवाखान्यात जाण्यासाठी नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून शासनाने ई-पास देण्यास सुरुवात केली. दवाखाना, अंत्यविधी यासह अत्यवश्यक सेवेसाठी दुसऱ्या जिल्ह्यात जायचे असल्यास ऑनलाईन अर्ज करुन ई-पास मिळविला जात होता. आताही ई-पास दिला जात आहे. मात्र ई-पास घेताना काही नागरिक केवळ गंमत म्हणून ऑनलाईन अर्ज करीत आहेत.

जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी काहीही

कोरोना काळात केवळ अंत्यविधी, उपचारास जाण्यासाठी पास दिला जातो. मात्र केवळ घराबाहेर जायचे म्हणून काही जणांनी विविध कारणे देवून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्याचे कसब पूर्ण केले. केवळ दवाखान्यातील कागदपत्रे दाखवून दुसऱ्या जिल्ह्यात अनेकजण गेले आहेत. काही जणांनी केवळ आधारकार्ड अपलोड करुन ई-पासची मागणी केली. मला घरात बसून कंटाळा आलाय, लग्नासाठी मुलगी पाहण्यास जायचे आहे. आताच लग्न झाले आहे, फिरायला जायचे आहे. मित्राला भेटायला जायचे आहे आदी कारणे अर्जात नमूद करत आहेत. काही महाभागांनी तर कोरे पेज अपलोड करण्याची गंमत केली आहे.

सर्वाचीच मेडिकल इमर्जन्सी कशी?

जिल्ह्यात मागील एक ते दीड महिन्यांत तब्बल ७ हजार १९१ जणांनी ई-पाससाठी ऑनलाईन अर्ज केले आहेत. त्यापैकी २ हजार ७५२ जणांनी दवाखान्यात, अंत्यविधीला जाण्याचे कारण सांगितले आहे. काही जणांनी तर तीन ते चार वर्षापूर्वीचे तपासणीचे कागदपत्रे दाखवून आता मला तपासणीसाठी जायचे आहे, असे सांगून ई-पास मिळविण्याचा प्रयत्न केला. सर्वानाच मेडिकल इमर्जन्सी कशी काय असू शकते, अशी शंकाही काहीजण उपस्थित करीत आहेत.

काही वेळातच मिळतोय ई-पासयेथील पोलीस अधीक्षक कार्यालयात ई-पास देण्यासाठी स्वतंत्र विभाग स्थापन केला आहे. पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहायक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, पोलीस निरीक्षक प्रकाश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली ई-पास देण्यासाठी कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती केली आहे.ऑनलाईन अर्ज केल्यानंतर या विभागातून अर्जाची तपासणी करुन अर्ज तत्काळ निकाली काढला जात आहे.

ई-पाससाठी अर्ज ७१९१

मंजूर अर्ज २७५२

नामंजूर अर्ज ४४२८