शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

कोरोनाचे तीन नवे रुग्ण ; दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:20 IST

जिल्ह्यात रॅपिड अँटिजन टेस्टमध्ये एकही रुग्ण आढळून आला नाही. यावेळी हिंगोली परिसरात ११३, वसमत ११५, सेनगाव ५२, औंढा १०० ...

जिल्ह्यात रॅपिड अँटिजन टेस्टमध्ये एकही रुग्ण आढळून आला नाही. यावेळी हिंगोली परिसरात ११३, वसमत ११५, सेनगाव ५२, औंढा १०० तर कळमनुरी परिसरात ९२ जणांची तपासणी केली होती, यात एकही रुग्ण निघाला नाही. आरटीपीसीआर टेस्टमध्ये हिंगोली परिसरात ६५ जणांची तपासणी केली असता, यात आनंदनगर व एसआरपीएफ कॅम्पमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला. वसमत परिसरात १७९ जणांची तपासणी केली असता, वसमत येथे एक रुग्ण आढळून आला. औंढा परिसरात ४६ जणांची आरटीपीसीआर टेस्ट केली असता, एकही रुग्ण आढळला नाही. दरम्यान, बुधवारी २५ रुग्ण बरे झाले असून, यामध्ये जिल्हा रुग्णालयातील १२, सेनगाव तीन, लिंबाळा एक, कळमनुरी सात तर, औंढा येथील दोन बरे झालेल्या रुग्णांचा समावेश आहे.

आजपर्यंत १५ हजार ८२६ रुग्ण आढळले असून, यापैकी १५ हजार ३१८ रुग्ण बरे झाले आहेत. आढळलेल्या १३७ रुग्णांवर उपचार सुरू असून, यातील ६५ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजनवर तर, १० रुग्णांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे.

आजपर्यंत ३७१ रुग्णांचा मृत्यू

जिल्ह्यात आजपर्यंत ३७१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. बुधवारी दोघांचा मृत्यू झाला असून, यात हिंगोली येथील आयसोलेशन वॉर्डात उपचार घेणाऱ्या कळमकोंडा (ता. कळमनुरी) येथील ५० वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे. तसेच द्वारका हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या कळमनुरी येथील ७० वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.