शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
4
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
5
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
6
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
7
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
8
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
9
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
10
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
11
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
13
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
14
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
15
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
16
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
17
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
18
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!
19
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
20
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य

दीडशे रुपयांसाठी काढावे लागणार हजारांचे बँकेत खाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:20 IST

हिंगोली : २०२१ मधील उन्हाळ्यातील शालेय पोषण आहाराच्या बदल्यात विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात पोषण आहाराच्या किमतीएवढी रक्कम जमा करण्याचा निर्णय ...

हिंगोली : २०२१ मधील उन्हाळ्यातील शालेय पोषण आहाराच्या बदल्यात विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात पोषण आहाराच्या किमतीएवढी रक्कम जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यातून केवळ दीडशे ते सव्वादोनशे रुपयेच खात्यात जमा होणार असले तरी पालकांना मात्र हजार रुपयांचे खाते काढावे लागणार आहे. त्यामुळे पालकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यातील बँकांतून विविध योजनेतील लाभार्थींना रक्कम वाटपाचे काम सुरू आहे. शेतकरीही पीक कर्जासाठी बँकात चकरा मारीत आहेत. त्यामुळे बँकांत गर्दी पहावयास मिळत आहे. शिक्षण विभागानेही विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडण्याच्या सूचना शाळांना दिल्या आहेत. जमा झालेल्या बँक खात्याचा तपशील जिल्हास्तरावर ९ जुलैपर्यंत द्यायचा आहे. विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात उन्हाळ्यातील ३५ दिवसांचे शालेय पोषण आहाराच्या किमतीएवढी रक्कम जमा होणार आहे. ही रक्कम दीडशे ते सव्वा दोनशेपर्यंत जाते. २०१९-२० नुसार जिल्ह्यात १ लाख ६० हजार १६३ एवढे लाभार्थी विद्यार्थी आहेत. यातील बहुतांश विद्यार्थ्यांचे यापूर्वी खाते उघडण्यात आले असले तरी पहिली, दुसरीतील विद्यार्थ्यांचे खाते नव्याने उघडावे लागणार आहे. त्यात दीडशे ते सव्वा दोनशे रुपयांसाठी पालकांना बँक खाते उघडण्यासाठी खात्यावर हजार रुपये जमा करावे लागणार आहे. त्यात खाते काढण्यासाठी विद्यार्थ्यांनाही बँकेत न्यावे लागणार आहे. त्यामुळे पालकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.

बँक खाते उघडण्यासाठी लागणार हजार रुपये

शालेय पोषण आहाराच्या किमतीएवढी रक्कम बँक खात्यात जमा होणार आहे. पहिली ते पाचवीसाठी ३५ दिवसांचे केवळ १५६ रुपये तर सहावी ते आठवीतील विद्यार्थ्यांच्या खात्यावर २३४ रुपये जमा होणार असल्याचे सांगितले जात आहे. एवढी रक्कम घेण्यासाठी हजार रुपयांचे बँक खाते काढावे लागणार आहे. झीरो बॅलन्सवर खाते काढण्याचे सांगण्यात आले आहे. परंतु, बँका झीरो बॅलन्स खाते उघडण्यासाठी फारशा उत्सुक नसतात.

पालकांची वाढली डोकेदुखी

शालेय पोषण आहारासाठीची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याचा निर्णय चांगला आहे. मात्र खाते उघडण्यासाठी खात्यात हजार रुपये जमा करावे लागणार आहेत. कोरोनामुळे अडचणीत असलेल्या पालकांनी ही रक्कम कोठून आणावी ?

- प्रकाश काशीदे, वसमत

कोरोनामुळे अगोदरच अनेक पालकांच्या हातचा रोजगार हिरावला आहे. त्यात दीडशे रुपयांसाठी हजार रुपयांचे बँक खाते उघडावे लागणार आहे. त्यापेक्षा पालकांच्या खात्यातच ही रक्कम जमा झाल्यास खर्चही वाचेल.

- संभाजी पुलाते, सापळी

पालकांच्या खात्यात रक्कम जमा करावी

सध्या कोरोनामुळे बँक खाते उघडण्यासाठी विविध अडचणी उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ही रक्कम पालकांच्या खात्यात जमा झाल्यास योग्य होईल, असे मतही काही शिक्षकांतून व्यक्त होत आहे. बहुतांश पालकांचे खाते काढलेले असते.

कोणत्या तालुक्यात किती विद्यार्थी (२०१९-२० नुसार)

हिंगोली - ३३३७५

वसमत - ४३२६४

कळमनुरी - २९७२७

औंढा ना. २३१२८

सेनगाव - ३०६६९

पहिली ते पाचवीतील विद्यार्थ्यांना मिळणार - १५६

सहावी ते आठवीतील विद्यार्थ्यांना मिळणार - २३४