शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

‘मी पाॅझिटिव्ह’ म्हणणारे फिरताहेत बिनधास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:28 IST

हिंगोली : कोरोना महामारी जेवढी ज्येष्ठांना समजली तेवढी तरुण मंडळींना अजूनही समजलेली दिसत नाही. ‘अरे मी पॉझिटिव्ह निघालो’ असे ...

हिंगोली : कोरोना महामारी जेवढी ज्येष्ठांना समजली तेवढी तरुण मंडळींना अजूनही समजलेली दिसत नाही. ‘अरे मी पॉझिटिव्ह निघालो’ असे गौरवाने सांगत सोबत आलेल्या मित्रांसोबत हस्तांदोलन करताना काही पॉझिटिव्ह पहायला मिळत आहेत.

२३ मार्च २०२० पासून कोरोना महामारीने सर्वत्र कहर माजविला आहे. दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. परंतु अजूनही कोराना महामारीला तरुण मंडळी सहजरित्या घेताना दिसत आहेत. कोरोना महामारीचा नायनाट करण्यासाठी शासन कोट्यवधी रुपये खर्च करीत असताना मात्र तरुणांना त्याचे काहीच कसे वाटत नाही? हा प्रश्न पडत आहे. कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाने सर्व उपाययोजना करीत मास्कचा वापर करा, विनाकारण बाजारात फिरू नका, सॅनिटायझरचा वापर करा अशा सूचना दिल्या आहेत. पण या सूचनांकडेही काही तरुण मंडळी डोळेझाक करताना दिसत आहेत.

जिल्हा प्रशासनाने शहरातील बसस्थानक, रेल्वेस्टेशनवर अँटीजेन चाचण्या सुरू केलेल्या आहेत. काही जण तर हौसेखातर अँटीजेन चाचणीच्या ठिकाणी फिरताना आढळून येत आहेत. तपासणीनंतर पॉझिटिव्ह आल्यावर ‘मी पाॅझिटिव्ह आलो आहे’ असे म्हणत २४ दिवस आता बिनफिकीर झालो, असे म्हणत कोरोनाची चेष्टा उडवित आहेत.

दुसरीकडे परजिल्ह्यातून आलेल्या प्रवाशांची तपासणी व्हायला पाहिजे. परंतु, ती तपासणीही होताना दिसत नाही. काही प्रवासी शक्कल लढवित शहरातील बसथांब्यावर उतरत घर गाठत आहेत. काही जण तर अँटीजेन चाचणी काय असते हे पहायला येत आहेत. तपासणी ठिकाणी नेमलेल्या पोलिसांनी काम नसताना आलेल्या प्रवाशांची विचारपूस करणे गरजेचे आहे. पण पोलीस कर्मचारी त्यांना थोपवत नाहीत. एवढेच काय महामंडळाचे कर्मचारी विनामास्क असलेल्या प्रवाशांशी गप्पाही मारत आहेत. आगार प्रमुखांनी काही कर्मचाऱ्यांना अँटीजेन तपासणीच्या ठिकाणी मदत करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. पण नेमलेले कर्मचारी वेळ निभावून नेत असल्याचे पहायला मिळत आहे.

कोरोना बाधितांना अटकाव होणे गरजेचे

ज्या ठिकाणी अँटीजेन, आरटीपीसीआर चाचण्या होत आहेत तेथील डॉक्टर मंडळी व इतर कर्मचाऱ्यांनी कोरोना बाधितांना उशीर न लावता कोरोना सेंटरवरील गाडी बोलवायला पाहिजे. पण एवढे असताना सेंटरवरील गाडी उशिरा येत आहे. त्यामुळे कोरोना बाधितांचे चांगलेच फावत आहे. मग काय? काही जण तर वेळेचा दुरूपयोग करून घेत आहे. कोरोना सेंटरची गाडी वेळेवर आल्यास कोरोना बाधित लवकर सेंटरवर पोहोचू शकतो, एवढे मात्र नक्की.