शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

‘त्या’ १२0 कलाकारांना अजून मानधन मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 00:29 IST

वृद्ध साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांपैकी १२0 जणांची गतवर्षी मानधनासाठी निवड झाली आहे. मात्र अद्याप त्यांच्या हाती छदामही पडला नाही. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : वृद्ध साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांपैकी १२0 जणांची गतवर्षी मानधनासाठी निवड झाली आहे. मात्र अद्याप त्यांच्या हाती छदामही पडला नाही. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार वृद्ध साहित्यिक तथा कलाकारांना जीवन जगण्यासाठी मदत म्हणून त्या-त्या श्रेणीनुसार अनुदान दिले जाते. जि.प.कडून दरवर्षी ६0 कलाकारांची या योजनेत निवड केली जाती. मात्र २0१६-१७ व २0१७-१८ या दोन वर्षांसाठी एकत्रितच १२0 कलाकारांची निवड गतवर्षी करण्यात आली. समितीने या कलाकारांची निवड केली असली तरीही त्यांना मानधन मात्र सुरू झाले नाही. राज्याच्या सांस्कृतिक विभागाकडे ही यादी वेळेत पोहोचल्याचेही सांगितले जाते. तरीही एकाही कलाकाराच्या खात्यावर रक्कम जमा झाली नाही. त्यामुळे ही कलाकार मंडळी समाजकल्याण विभागाचे खेटे घालत आहे. त्यांना मात्र मंत्रालय स्तरावरूनच मंजुरी मिळाली नसल्याचे ऐकायला मिळत आहे.यंदासाठी प्रस्ताव मागविलेयावर्षी आता पुन्हा ६0 कलाकारांची निवड मानधनासाठी करावी लागणार आहे. त्यासाठीचे प्रस्ताव मागविले आहेत. संबंधित पंचायत समितीकडे प्रस्ताव सादर करायचा आहे. ते जि.प.च्या समाजकल्याणकडे आल्यानंतर वृद्ध कलाकारांची निवड करण्यासाठी असलेल्या समितीसमोर सादर केले जाणार आहेत. आॅक्टोबरअखेरपर्यंत प्रस्ताव दाखल करता येतील,असे समाजकल्याणकडून सांगण्यात आले.

टॅग्स :HingoliहिंगोलीGovernmentसरकार