शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:37 IST

गावातील वीजपुरवठा वारंवार खंडित संतुक पिंपरी : हिंगोली तालुक्यातील संतुक पिंपरी गावाचा वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. दिवसातून कमीत ...

गावातील वीजपुरवठा वारंवार खंडित

संतुक पिंपरी : हिंगोली तालुक्यातील संतुक पिंपरी गावाचा वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. दिवसातून कमीत कमी पाच ते सहा वेळेस वीजपुरवठा खंडित होत आहे. तसेच रात्रीच्या वेळीही वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. यासाठी गावाचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी संतुक पिंपरी ग्रामस्थांतून होत आहे.

बसस्थानक परिसरात घाणीचे साम्राज्य

पुसेगाव : सेनगाव तालुक्यातील पुसेगाव बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर घाण पसरली आहे. बसस्थानक परिसरात घाण पसरल्यामुळे परिसरातील गावकरी व प्रवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. तसेच या दुर्गंधीमुळे अनेकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढला

डिग्रस कोंढूर : कळमनुरी तालुक्यातील डिग्रस कोंढूर गावासह शेतशिवारात वन्यप्राणी येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. गावातील हरभरा व गव्हाच्या पिकांत वन्यप्राणी येेवून नासधूस करीत आहेत. यामुळे शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण आहे. वन्यप्राण्यास हुसकावण्याचा प्रयत्न केला तर ते अंगावर धाव घेत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

स्वच्छतागृहाची दुरवस्था

हिंगोली : शहरात स्वच्छता मोहिमेतंर्गत जागोजागी लघुशंकेसाठी स्वच्छतागृह उभारण्यात आले आहे, पण अनेक ठिकाणच्या स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. तसेच अनेक नागरिक या स्वच्छतागृहात न जाता आजूबाजूला उघड्यावर लघुशंकेस बसत असल्याचे आढळून येत आहे. यासाठी या स्वच्छतागृहाची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

वातावरण बदलल्याने रुग्णसंख्या वाढली

वसमत : मागील काही दिवसांत कधी ऊन तर कधी ढगाळ वातावरण राहत आहे. या वातावरण बदलाचा परिणाम बालकांसह वयोवृद्धांवर होत आहे. शहरातील अनेक बालकांना ताप, हिवताप, थंडीताप व वयोवृद्धांचे हात-पाय दुखणे, दमा येणे, छाती दुखणे असे आजार वाढले आहे. यामुळे शहरातील शासकीय व खासगी रुग्णालयांत रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

बससेवा सुरू करण्याची मागणी

केंद्रा बु. : सेनगाव तालुक्यातील केंद्रा बु. ते गोरेगावपर्यंत धावणारी बससेवा बंद असल्यामुळे गावासह परिसरातील नागरिकांची मोठी अडचण होत आहे. सदरील बससेवा बंद असल्यामुळे अनेकांना खासगी वाहनांनी महागडा प्रवास करावा लागत आहे. त्याचबरोबर अपंग व वयोवृद्धांना कोणतीही सवलत खासगी वाहनात लागू नसल्यामुळे गावातील बससेवा सुरू करण्याची मागणी गावकरी करीत आहेत.