शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

लोकसभा इच्छुकांत पडतेय भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 00:35 IST

लोकसभा निवडणुकीला अवघा सहा महिन्यांचा काळ उरल्याने आता सर्वच पक्षांत नवे इच्छुकही डोके वर काढू लागले आहेत. आतापर्यंत ज्या इच्छुकांच्या नावाची चर्चा होती. त्यापैकी अनेकजण आधीच गारद झाल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : लोकसभा निवडणुकीला अवघा सहा महिन्यांचा काळ उरल्याने आता सर्वच पक्षांत नवे इच्छुकही डोके वर काढू लागले आहेत. आतापर्यंत ज्या इच्छुकांच्या नावाची चर्चा होती. त्यापैकी अनेकजण आधीच गारद झाल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर आता पक्ष पातळीवर तयारी सुरू झाल्याचे चित्र आहे. काँग्रेसचे विद्यमान खा.राजीव सातव हा एक चेहरा समोर आहे. मात्र त्यांच्यासमोर कोण राहणार? याची निश्चिती काही होत नाही. या पक्षाचे उत्तर भाजप, सेना या दोन्ही पक्षांना सापडले नसल्याचे दिसत आहे. इच्छुकांच्या रांगा लावून ठेवल्या. मात्र आपल्यालाच उमेदवारी मिळेल याची काय खात्री असा विचार करून तेही आता थंड पडल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी काही जणांनी मतदारसंघात चाचपणी करून पाहिली. त्याचे निष्कर्ष काय आले? त्यांनाच माहिती. त्यानंतर ही मंडळी त्यादृष्टिने कोणतेच कार्य करताना दिसत नाही. शिवसेनेलाच ही जागा पुन्हा सोडली जाईल, असे विश्वासाने सांगितले जाते. यात माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा यांना मैदानात उतरविले जाण्याची शक्यता आहे. त्यांनी चाचपणीही केली. मात्र आता नांदेड दक्षिणचे आ.हेमंत पाटील यांच्या नावाचीही चर्चा रंगू लागली आहे. दिग्गज उमेदवार रिंगणात आणण्यासाठी सेनेकडून प्रयत्न असल्याचे सांगितले जाते. कदाचित यामुळे यापूर्वी प्रयत्न करणारी मंडळी अचानक गायब झाली. भाजपकडूनही या जागेवर दावा सांगितला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सूर्यकांता पाटील, अ‍ॅड.शिवाजी माने व सुभाष वानखेडे या दिग्गजांनी या जागेसाठीच भाजपचा उंबरा चढला होता. यापैकी माने यांनीही काही काळ फेऱ्या मारल्या. इतर दोघांची कोणतीच तयारी दिसत नाही. आता भाजप हिंगोलीत मतदारसंघात येणाºया तीन जिल्ह्यांतील पदाधिकाºयांचा वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत मेळावा घेणार आहे. या पार्श्वभूमिवर हिंगोलीचे नगराध्यक्ष बाबाराव बांगर हेही लोकसभेच्या रिंगणात उतरण्यास तयार असल्याचे समोर येत आहेत. विधानसभेसाठी इच्छा व्यक्त करणारे बांगर यांनी अचानकच लोकसभेची कास धरली आहे. त्यामुळे जशी निवडणूक जवळ येत आहे, तसा नव्या इच्छुकांचा चेहरा समोर येत आहे.निवडणूक येईपर्यंत अनेकांची नावे समोर येतीलही. मात्र ज्याला खरोखरच तयारी करायची आहे, त्याने आतापासूनच कामाला लागणेही तेवढेच अपरिहार्य आहे. नेमका याच बाबीचा अभाव दिसत आहे. तर दुसरीकडे खा.राजीव सातव निवडणूक लढवायची की नाही, हे पक्ष ठरवणार हे सांगत असले तरीही पायाला भिंगरी बांधून फिरू लागले आहेत. त्यांना टक्कर द्यायची तर विरोधकांना गाफिल राहून चालणार नाही.

टॅग्स :PoliticsराजकारणHingoliहिंगोली