शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा इच्छुकांत पडतेय भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 00:35 IST

लोकसभा निवडणुकीला अवघा सहा महिन्यांचा काळ उरल्याने आता सर्वच पक्षांत नवे इच्छुकही डोके वर काढू लागले आहेत. आतापर्यंत ज्या इच्छुकांच्या नावाची चर्चा होती. त्यापैकी अनेकजण आधीच गारद झाल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : लोकसभा निवडणुकीला अवघा सहा महिन्यांचा काळ उरल्याने आता सर्वच पक्षांत नवे इच्छुकही डोके वर काढू लागले आहेत. आतापर्यंत ज्या इच्छुकांच्या नावाची चर्चा होती. त्यापैकी अनेकजण आधीच गारद झाल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर आता पक्ष पातळीवर तयारी सुरू झाल्याचे चित्र आहे. काँग्रेसचे विद्यमान खा.राजीव सातव हा एक चेहरा समोर आहे. मात्र त्यांच्यासमोर कोण राहणार? याची निश्चिती काही होत नाही. या पक्षाचे उत्तर भाजप, सेना या दोन्ही पक्षांना सापडले नसल्याचे दिसत आहे. इच्छुकांच्या रांगा लावून ठेवल्या. मात्र आपल्यालाच उमेदवारी मिळेल याची काय खात्री असा विचार करून तेही आता थंड पडल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी काही जणांनी मतदारसंघात चाचपणी करून पाहिली. त्याचे निष्कर्ष काय आले? त्यांनाच माहिती. त्यानंतर ही मंडळी त्यादृष्टिने कोणतेच कार्य करताना दिसत नाही. शिवसेनेलाच ही जागा पुन्हा सोडली जाईल, असे विश्वासाने सांगितले जाते. यात माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा यांना मैदानात उतरविले जाण्याची शक्यता आहे. त्यांनी चाचपणीही केली. मात्र आता नांदेड दक्षिणचे आ.हेमंत पाटील यांच्या नावाचीही चर्चा रंगू लागली आहे. दिग्गज उमेदवार रिंगणात आणण्यासाठी सेनेकडून प्रयत्न असल्याचे सांगितले जाते. कदाचित यामुळे यापूर्वी प्रयत्न करणारी मंडळी अचानक गायब झाली. भाजपकडूनही या जागेवर दावा सांगितला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सूर्यकांता पाटील, अ‍ॅड.शिवाजी माने व सुभाष वानखेडे या दिग्गजांनी या जागेसाठीच भाजपचा उंबरा चढला होता. यापैकी माने यांनीही काही काळ फेऱ्या मारल्या. इतर दोघांची कोणतीच तयारी दिसत नाही. आता भाजप हिंगोलीत मतदारसंघात येणाºया तीन जिल्ह्यांतील पदाधिकाºयांचा वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत मेळावा घेणार आहे. या पार्श्वभूमिवर हिंगोलीचे नगराध्यक्ष बाबाराव बांगर हेही लोकसभेच्या रिंगणात उतरण्यास तयार असल्याचे समोर येत आहेत. विधानसभेसाठी इच्छा व्यक्त करणारे बांगर यांनी अचानकच लोकसभेची कास धरली आहे. त्यामुळे जशी निवडणूक जवळ येत आहे, तसा नव्या इच्छुकांचा चेहरा समोर येत आहे.निवडणूक येईपर्यंत अनेकांची नावे समोर येतीलही. मात्र ज्याला खरोखरच तयारी करायची आहे, त्याने आतापासूनच कामाला लागणेही तेवढेच अपरिहार्य आहे. नेमका याच बाबीचा अभाव दिसत आहे. तर दुसरीकडे खा.राजीव सातव निवडणूक लढवायची की नाही, हे पक्ष ठरवणार हे सांगत असले तरीही पायाला भिंगरी बांधून फिरू लागले आहेत. त्यांना टक्कर द्यायची तर विरोधकांना गाफिल राहून चालणार नाही.

टॅग्स :PoliticsराजकारणHingoliहिंगोली