शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

औरंगाबादेत पावसाचे ‘थैमान’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 22:19 IST

कानठळ्या बसविणाºया मेघगर्जनेसह बुधवारी दुपारनंतर पावसाने संपूर्ण औरंगाबाद शहराला जोरदार तडाखा दिला. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवत पावसाने तीन तास थैमान घातल्याने शहरातील बहुतांश सखल भागांत पाणी साचले. घरे आणि दुकानांमध्ये गुडघ्यापर्यंत पाणी शिरले.

ठळक मुद्देतीन तासांत ५३.२ मि.मी. पाऊस घरे-दुकानांमध्ये पाणी

औरंगाबाद : कानठळ्या बसविणाºया मेघगर्जनेसह बुधवारी दुपारनंतर पावसाने संपूर्ण औरंगाबाद शहराला जोरदार तडाखा दिला. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवत पावसाने तीन तास थैमान घातल्याने शहरातील बहुतांश सखल भागांत पाणी साचले. घरे आणि दुकानांमध्ये गुडघ्यापर्यंत पाणी शिरले. मुकुंदवाडी येथील अंबिकानगर भागात मुलगी वाहून गेल्याची घटना घडली तर अनेक ठिकाणी घराच्या भिंती कोसळल्या. चिकलठाणा वेधशाळेच्या आकडेवारीनुसार सायंकाळी ८.३० वाजेपर्यंत ५३.२ मि. मी. पावसाची नोंद झाली.साधारण ३.४५ वाजता विद्यापीठ आणि हर्सूल तलाव परिसरात पावसाला सुरुवात झाली. हळूहळू शहराकडे वाटचाल करीत साडेचार वाजेपर्यंत संपूर्ण शहराला जोरदार पावसाने घेरले. सुमारे तीन तास चाललेल्या पावसात संपूर्ण शहर धुवून निघाले. पावसाचा जोर एवढा जबरदस्त होता की, बघता बघता शहरातील बहुतांश सखल भागांत पाणी साचून गेल्या बुधवारची पुनरावृत्ती झाली. गारखेडा परिसर, सिडको परिसर,  नूर कॉलनी, टाऊन हॉल, चिश्तिया चौक, जळगाव रोडवरील काळा गणपती, जयभवानीनगर, प्रतापनगर, हर्सूल, विद्यापीठ, टाऊन हॉल, सिटीचौक, बुढीलेन, बेगमपुरा, पोलीस आयुक्तालय, मोतीकारंजा, अंगुरीबाग, सावरकर चौक, बंजारा कॉलनी, एमजीएम परिसर, रोशनगेट, सिल्लेखाना चौक, मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वेस्टेशन रोड, जिन्सी , सातारा परिसर, सिडको, लेबर कॉलनी, मयूर पार्क, उस्मानपुरा, औरंगपुरा, ज्योतीनगर, क्रीडा संकुल, मौलाना चौक, त्रिमूर्ती चौक, चेतक घोडा, बीड बायपास, अशा सर्वच भागांत पाण्याचे डोह तयार झाले.अग्निशमन विभागाला २५ फोनमुसळधार पावसामुळे सायंकाळपासून अग्निशमन विभागाचा फोन खणखणण्यास सुरुवात झाली. या तीन तासांमध्ये घरांमध्ये पाणी शिरले म्हणून मदतीसाठी सुमारे २५ पेक्षा जास्त फोन आले. विभागाने दिलेल्या माहितीनुसार शहरात सर्वत्र पावसाचा परिणाम जाणवला; परंतु टाऊन हॉल आणि नूर कॉलनी या परिसरात सर्वाधिक फटका बसला. तसेच दिवाण देवडी रस्त्यावर आणि जळगाव रोडवरील काळा गणपती परिसरात भिंत कोसळली. पथकाच्या सर्व गाड्या लोकांच्या मदतीसाठी पाठविण्यात आल्या.युरिया खताची शेकडो पोती भिजलीशहरात बुधवारी सायंकाळी कोसळलेल्या मुसळधार पावसात रेल्वेस्टेशनवरील मालधक्क्यावर युरिया खताची शेकडो पोती भिजली. पोती पावसाने भिजू नये म्हणून हमालांनी मोठी धावपळ केली. परंतु अनेक पोत्यांमधील युरियाचे पाणी झाल्याची भीती व्यक्त होत आहे.रेल्वेस्टेशनवर दोन मालगाड्यांद्वारे अनुक्रमे २५०० आणि १८०० टन युरियाची पोती मालधक्क्यावर दाखल झाली होती. ही पोती मालधक्क्याच्या परिसरात उतरविण्यात आली होती. पावसाचा अंदाज असूनही पोती ताडपत्रीने झाकण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. त्यामुळे सायंकाळी पावसाला सुरुवात होताच हमालांची एकच धावपळ सुरू झाली. पोत्यांच्या ढिगारावर ताडपत्री टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु तोपर्यंत अनेक पोती भिजली.