शहरं
Join us  
Trending Stories
1
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
2
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
3
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
4
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
5
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
6
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
7
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
8
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
9
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
10
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
11
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत पावसाचे ‘थैमान’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 22:19 IST

कानठळ्या बसविणाºया मेघगर्जनेसह बुधवारी दुपारनंतर पावसाने संपूर्ण औरंगाबाद शहराला जोरदार तडाखा दिला. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवत पावसाने तीन तास थैमान घातल्याने शहरातील बहुतांश सखल भागांत पाणी साचले. घरे आणि दुकानांमध्ये गुडघ्यापर्यंत पाणी शिरले.

ठळक मुद्देतीन तासांत ५३.२ मि.मी. पाऊस घरे-दुकानांमध्ये पाणी

औरंगाबाद : कानठळ्या बसविणाºया मेघगर्जनेसह बुधवारी दुपारनंतर पावसाने संपूर्ण औरंगाबाद शहराला जोरदार तडाखा दिला. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवत पावसाने तीन तास थैमान घातल्याने शहरातील बहुतांश सखल भागांत पाणी साचले. घरे आणि दुकानांमध्ये गुडघ्यापर्यंत पाणी शिरले. मुकुंदवाडी येथील अंबिकानगर भागात मुलगी वाहून गेल्याची घटना घडली तर अनेक ठिकाणी घराच्या भिंती कोसळल्या. चिकलठाणा वेधशाळेच्या आकडेवारीनुसार सायंकाळी ८.३० वाजेपर्यंत ५३.२ मि. मी. पावसाची नोंद झाली.साधारण ३.४५ वाजता विद्यापीठ आणि हर्सूल तलाव परिसरात पावसाला सुरुवात झाली. हळूहळू शहराकडे वाटचाल करीत साडेचार वाजेपर्यंत संपूर्ण शहराला जोरदार पावसाने घेरले. सुमारे तीन तास चाललेल्या पावसात संपूर्ण शहर धुवून निघाले. पावसाचा जोर एवढा जबरदस्त होता की, बघता बघता शहरातील बहुतांश सखल भागांत पाणी साचून गेल्या बुधवारची पुनरावृत्ती झाली. गारखेडा परिसर, सिडको परिसर,  नूर कॉलनी, टाऊन हॉल, चिश्तिया चौक, जळगाव रोडवरील काळा गणपती, जयभवानीनगर, प्रतापनगर, हर्सूल, विद्यापीठ, टाऊन हॉल, सिटीचौक, बुढीलेन, बेगमपुरा, पोलीस आयुक्तालय, मोतीकारंजा, अंगुरीबाग, सावरकर चौक, बंजारा कॉलनी, एमजीएम परिसर, रोशनगेट, सिल्लेखाना चौक, मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वेस्टेशन रोड, जिन्सी , सातारा परिसर, सिडको, लेबर कॉलनी, मयूर पार्क, उस्मानपुरा, औरंगपुरा, ज्योतीनगर, क्रीडा संकुल, मौलाना चौक, त्रिमूर्ती चौक, चेतक घोडा, बीड बायपास, अशा सर्वच भागांत पाण्याचे डोह तयार झाले.अग्निशमन विभागाला २५ फोनमुसळधार पावसामुळे सायंकाळपासून अग्निशमन विभागाचा फोन खणखणण्यास सुरुवात झाली. या तीन तासांमध्ये घरांमध्ये पाणी शिरले म्हणून मदतीसाठी सुमारे २५ पेक्षा जास्त फोन आले. विभागाने दिलेल्या माहितीनुसार शहरात सर्वत्र पावसाचा परिणाम जाणवला; परंतु टाऊन हॉल आणि नूर कॉलनी या परिसरात सर्वाधिक फटका बसला. तसेच दिवाण देवडी रस्त्यावर आणि जळगाव रोडवरील काळा गणपती परिसरात भिंत कोसळली. पथकाच्या सर्व गाड्या लोकांच्या मदतीसाठी पाठविण्यात आल्या.युरिया खताची शेकडो पोती भिजलीशहरात बुधवारी सायंकाळी कोसळलेल्या मुसळधार पावसात रेल्वेस्टेशनवरील मालधक्क्यावर युरिया खताची शेकडो पोती भिजली. पोती पावसाने भिजू नये म्हणून हमालांनी मोठी धावपळ केली. परंतु अनेक पोत्यांमधील युरियाचे पाणी झाल्याची भीती व्यक्त होत आहे.रेल्वेस्टेशनवर दोन मालगाड्यांद्वारे अनुक्रमे २५०० आणि १८०० टन युरियाची पोती मालधक्क्यावर दाखल झाली होती. ही पोती मालधक्क्याच्या परिसरात उतरविण्यात आली होती. पावसाचा अंदाज असूनही पोती ताडपत्रीने झाकण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. त्यामुळे सायंकाळी पावसाला सुरुवात होताच हमालांची एकच धावपळ सुरू झाली. पोत्यांच्या ढिगारावर ताडपत्री टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु तोपर्यंत अनेक पोती भिजली.