शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

दहावीचे मूल्यांकन शाळांनी दिले, आता निकालाची लागली प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:21 IST

हिंगोली जिल्ह्यात १५३ शाळांतील जवळपास १८४०७ विद्यार्थी दहावीला होते. यात मुले १०२१४, तर मुली ९१९३ होत्या. या सर्व विद्यार्थ्यांना ...

हिंगोली जिल्ह्यात १५३ शाळांतील जवळपास १८४०७ विद्यार्थी दहावीला होते. यात मुले १०२१४, तर मुली ९१९३ होत्या. या सर्व विद्यार्थ्यांना यंदा बोर्डाची परीक्षा कोरोनामुळे देता आली नाही. ऑनलाईन परीक्षेसाठीही बोर्डाने नियोजनाची तयारी केली होती, मात्र ते प्रत्यक्षात उतरले नाही. शाळांवरच निकालाची जबाबदारी दिली, तर ते काम जिल्ह्याने पूर्ण केले असले तरीही, इतरत्र झाले नसल्याने निकाल रखडला आहे.

जिल्ह्यातील दहावीचे विद्यार्थी १९४०७

एकूण मुले १०२९४

मुली ९१९३

जिल्ह्यातील शाळा १५३

मूल्यांकन झालेल्या शाळा १५३

जुनी गुणपत्रके मिळत नसल्याने अनेक शाळांना मूल्यांकन करताना अडचणीचे गेले. मात्र यासाठी मुलांना वारंवार संपर्क साधून त्यांच्याकडून ही माहिती मिळवावी लागली. यात अनेक शाळांचा वेळ गेला. काहींनी अंतर्गत गुणांवरूनच सरासरीत गुण दिले.

मुख्याध्यापक म्हणतात...

बऱ्याच जणांच्या गुणांच्या नोंदी ऑनलाईनमुळे सहज मिळाल्या. काहीबाबतीत अडचणी आल्या, तर त्या प्रत्यक्ष संपर्क साधून गुण मिळविले. बोर्डाशीही समन्वय ठेवून ऑनलाईन निकाल सादर केला. आता निकालाची प्रतीक्षा आहे.

- के. के. गांजवे, मुख्याध्यापक

नियमित चाचण्या घेतल्या असल्याने दहावीच्या विद्यार्थ्यांना गुणदान करताना काही अडचणीचे गेले नाही. प्रत्येक शिक्षकाने आपली जबाबदारी उचलली. त्यामुळे वेळेत ऑनलाईन केले. आता निकालाची प्रतीक्षा आहे.

- एस. जी. पारणकर, शिक्षक

सर्व शाळांनी मूल्यांकन भरले

हिंगोली जिल्ह्यातील सर्व शाळांनी दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. अडचणी असल्यास त्या सोडविण्यात आल्या. त्यामुळे १०० टक्के काम पूर्ण झाले आहे. निकालाची तारीख जाहीर होणे बाकी आहे.

- पी. बी. पावसे