शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
7
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
8
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
9
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
10
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
11
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
12
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
13
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
14
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
15
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
16
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
17
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
18
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
19
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
20
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:34 IST

हिंगोली : जिल्ह्यात २० ते २२ दिवसांनंतर रविवारी पावसाचा शिडकावा झाला. या पावसाने थोडासा ओलावा निर्माण झाला असला ...

हिंगोली : जिल्ह्यात २० ते २२ दिवसांनंतर रविवारी पावसाचा शिडकावा झाला. या पावसाने थोडासा ओलावा निर्माण झाला असला तरी अजूनही पिके तगतील असा पाऊस झाला नाही. त्यामुळे पिके संकटात सापडली आहेत. शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत ढगाकडे डोळे लावून बसले आहेत.

जिल्ह्यात यावर्षी अद्याप एकदाही सर्वदूर पाऊस झाला नाही. मान्सूनपूर्व पावसावरच शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली. त्यानंतर पाऊस ठिकाण बदलून बरसत होता. एका तालुक्यात पाऊस तर दुसऱ्या तालुक्यात कोरेडे हवामान पहावयास मिळत होते. ठिकाण बदलून पाऊस होत असला तरी पिके जोमात बहरली होती. खरीप हंगामातून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असे वाटत असतानाच पावसाने जुलैच्या मध्यापासून पाठ फिरविली. शेंगा लागण्याच्या काळातच पावसाने पाठ फिरविल्याने सोयाबीन, मूग, उडीद आदी पिकांना चांगलाच फटका बसला आहे. पावसाअभावी फुले गळून जात आहेत. पावसाची अशीच स्थिती राहिली तर बियाणाचा खर्चही निघतो की नाही, याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. रविवारपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहत आहे. रविवारी रात्री काही ठिकाणी पाऊस झाला असला तरी अद्याप पिकांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील पाणी साठवण प्रकल्पातही पाण्याची आवक वाढली नाही. साठवण प्रकल्पही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

तलावांना पावसाची प्रतीक्षाच

हिंगोली तालुक्यातील पारोळा, वडद, सवड, चोरजवळा, हिरडी, पेडगाव, हातगाव, सेनगाव तालुक्यातील सवना, पिंपरी, घोरदरी, बाभूळगाव, औंढा तालुक्यातील वाळकी, औंढा, पूरजळ, वंजारवाडी, पिंपळदरी, सेंदूरसना, काकडधाबा, केळी व कळमनुरी तालुक्यातील कळमनुरी, बोथी, दांडेगाव, देवधरी, तर वसमत तालुक्यातील राजवाडी तलावांना पावसाची प्रतीक्षा आहे.

जवळपास एक महिना होत आहे. आमच्या भागात पावसाने पाठ फिरविली आहे. हा भाग माळरानाचा असल्याने पा्ऊस असेल तरच पिके येतात. आता पिके अखेरची घटका मोजत आहेत.

-आंबाजी इंगोले, शेतकरी

पेरणीनंतर एकही मोठा पाऊस झाला नाही. सध्या पाऊस नसल्याने फुले गळून पडत आहेत. अशीच परिस्थिती राहिल्यास उत्पादनात घट होऊन पेरणीचा खर्चही निघणार नाही.

-शंकर औटे, शेतकरी

पेरणी वाया

जाण्याची शक्यता

सोयाबीन -२५६५८१

कापूस ३०७२२

तूर -४०८२८

मूग- ७९५३

उडीद -५६४३

ज्वारी - ४५२९

(आकडे हेक्टर्समध्ये)