शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
3
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
4
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
5
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
6
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
7
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
8
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
9
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
10
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
11
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
12
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
13
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
14
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
15
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
16
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
17
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
18
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
19
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
20
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!

सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:34 IST

हिंगोली : जिल्ह्यात २० ते २२ दिवसांनंतर रविवारी पावसाचा शिडकावा झाला. या पावसाने थोडासा ओलावा निर्माण झाला असला ...

हिंगोली : जिल्ह्यात २० ते २२ दिवसांनंतर रविवारी पावसाचा शिडकावा झाला. या पावसाने थोडासा ओलावा निर्माण झाला असला तरी अजूनही पिके तगतील असा पाऊस झाला नाही. त्यामुळे पिके संकटात सापडली आहेत. शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत ढगाकडे डोळे लावून बसले आहेत.

जिल्ह्यात यावर्षी अद्याप एकदाही सर्वदूर पाऊस झाला नाही. मान्सूनपूर्व पावसावरच शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली. त्यानंतर पाऊस ठिकाण बदलून बरसत होता. एका तालुक्यात पाऊस तर दुसऱ्या तालुक्यात कोरेडे हवामान पहावयास मिळत होते. ठिकाण बदलून पाऊस होत असला तरी पिके जोमात बहरली होती. खरीप हंगामातून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असे वाटत असतानाच पावसाने जुलैच्या मध्यापासून पाठ फिरविली. शेंगा लागण्याच्या काळातच पावसाने पाठ फिरविल्याने सोयाबीन, मूग, उडीद आदी पिकांना चांगलाच फटका बसला आहे. पावसाअभावी फुले गळून जात आहेत. पावसाची अशीच स्थिती राहिली तर बियाणाचा खर्चही निघतो की नाही, याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. रविवारपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहत आहे. रविवारी रात्री काही ठिकाणी पाऊस झाला असला तरी अद्याप पिकांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील पाणी साठवण प्रकल्पातही पाण्याची आवक वाढली नाही. साठवण प्रकल्पही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

तलावांना पावसाची प्रतीक्षाच

हिंगोली तालुक्यातील पारोळा, वडद, सवड, चोरजवळा, हिरडी, पेडगाव, हातगाव, सेनगाव तालुक्यातील सवना, पिंपरी, घोरदरी, बाभूळगाव, औंढा तालुक्यातील वाळकी, औंढा, पूरजळ, वंजारवाडी, पिंपळदरी, सेंदूरसना, काकडधाबा, केळी व कळमनुरी तालुक्यातील कळमनुरी, बोथी, दांडेगाव, देवधरी, तर वसमत तालुक्यातील राजवाडी तलावांना पावसाची प्रतीक्षा आहे.

जवळपास एक महिना होत आहे. आमच्या भागात पावसाने पाठ फिरविली आहे. हा भाग माळरानाचा असल्याने पा्ऊस असेल तरच पिके येतात. आता पिके अखेरची घटका मोजत आहेत.

-आंबाजी इंगोले, शेतकरी

पेरणीनंतर एकही मोठा पाऊस झाला नाही. सध्या पाऊस नसल्याने फुले गळून पडत आहेत. अशीच परिस्थिती राहिल्यास उत्पादनात घट होऊन पेरणीचा खर्चही निघणार नाही.

-शंकर औटे, शेतकरी

पेरणी वाया

जाण्याची शक्यता

सोयाबीन -२५६५८१

कापूस ३०७२२

तूर -४०८२८

मूग- ७९५३

उडीद -५६४३

ज्वारी - ४५२९

(आकडे हेक्टर्समध्ये)