शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: नवा किंग कोण ठरणार? बेंगळुरू आणि पंजाब यांच्यात आज रंगणार 'महामुकाबला'
2
आजचे राशीभविष्य : ०३ जून २०२५; हट्टीपणा सोडून द्या, कोणत्याही कामासंबंधी आत्मविश्वासाने त्वरित निर्णय घ्याल
3
अकरावी प्रवेशाचा गोंधळ अजून सुरूच; ५ जूनपर्यंत मुदतवाढ! फ्रेशरचीही रिपीटर म्हणून नोंद
4
सातव्या आयोगातील त्रुटी दूर, पण थकबाकी नाही; सुधारित वेतनश्रेणी १ जूनपासून लागू
5
पडघा, बोरीवलीत ATSचे छापे; १२ ताब्यात; पहाटे २ ते दुपारी ४ पर्यंत सुरु होते कोम्बिंग ऑपरेशन
6
१६ तास जनावरांसारखं 'काम' अन् ३००-४०० रुपये 'दाम'; दिवसभरात एक जोडपे तोडते तब्बल २ टन ऊस
7
सिक्कीममध्ये भूस्खलनात ३ जवानांचा मृत्यू, ६ बेपत्ता; लाचेनमध्ये १०० हून अधिक लोक अडकलेले
8
जास्त गर्दीच्या मेट्रो स्थानकांचा आपत्कालीन प्लॅन तयार करा; आशिष शेलारांचे MMRDAला निर्देश
9
रायगडात 'नॅपकिन'वरून राजकारण तीव्र; भरत गोगावलेंनी पुन्हा सुनील तटकरेंना डिवचले
10
बफर झोनमध्ये बेकायदा इमारती; हजार कोटींच्या घोटाळ्याचा संशय; वॉचडॉग फाउंडेशनकडून चौकशीची मागणी
11
अभिनेता एजाज खानच्या अटकपूर्व जामिनावर उच्च न्यायालयात उन्हाळी सुट्टीनंतर होणार सुनावणी
12
CSMT स्थानकात आता 'दिव्यांग फ्रेंडली' सुविधा; तिकीट काउंटर, पार्किंग, शौचालयांमध्ये सोय
13
रणजित कासलेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयाबाहेर सरकारविरोधात घोषणा
14
परीक्षेहून घरी परतणाऱ्या तरुणांना टिप्परनं उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने पाय गमावला
15
विराटचा षटकार भारी; की श्रेयस अय्यरनं मारलेला चौकार? दोघांसमोरही होता बुमराह (VIDEO)
16
पाकिस्तान काही सुधारणार नाही! पुन्हा भारताची कॉपी केली, शिष्टमंडळ परदेशात पाठवणार
17
IPL 2025 Final : कमालीचा योगायोग! ७ महिन्यांत दुसऱ्यांदा फायनलमध्ये भिडणार अय्यर-पाटीदार
18
भारताशी गद्दारी करणाऱ्या रवी वर्माच्या पाेलीस काेठडीत वाढ; वकिलाचा कोर्टात भलताच दावा
19
रशियाला आणखी एक देश ताकद दाखवणार; १२ अणु पाणबुड्यांची घोषणा
20
पहाटे तीन वाजताच एटीएसची छापेमारी; ISIS चा म्होरक्या साकिब नाचणच्या गावात मोठी कारवाई

शिक्षकांनो, मुख्यालयी राहा अन् जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश पाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:28 IST

काही शिक्षक मुख्यालयी राहत नसल्याचे निदर्शनास आल्यानेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आदेश काढले आहेत. जिल्ह्यात कोरोना आजाराचा संसर्ग वाढतच चालला ...

काही शिक्षक मुख्यालयी राहत नसल्याचे निदर्शनास आल्यानेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आदेश काढले आहेत. जिल्ह्यात कोरोना आजाराचा संसर्ग वाढतच चालला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने संचारबंदीचे आदेश लागू केले आहेत. या काळात शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. त्यामुळे प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या सर्व व्यवस्थापन, माध्यमाच्या शिक्षकांनीही आपले कामकाज ऑनलाइन, वर्क फ्रॉम होम या तत्त्वावर करावे, या काळात शिक्षकांनी मुख्यालय सोडू नये, तसेच कोरोनाकाळात दिलेली जबाबदारी विहित कालावधीत पार पाडाव्यात, संचारबंदी काळात मुख्यालय विनापरवानगी सोडू नये, अत्यावश्यक सेवेसाठी भ्रमणध्वनी बंद करू नये, मुख्याध्यापकांनी यू-डायस, शाळासिद्धी, स्वाध्याय, आधार नोंदणी तसेच वरिष्ठ स्तरावरून निर्देशित, निश्चित केलेली कामे वेळेत पूर्ण करावीत, कोणत्याही परीक्षेबाबत शासनस्तरावरून प्राप्त सूचनांचे पालन कराावे, आवश्यकता असल्यास शाळेत प्रवेश करताना कोरोनाबाबतीत नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, अशा सूचना जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिल्या आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनांमुळे आदेश

जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाकाळात शिक्षकांची मदत व्हावी, यासाठी ग्रामपातळीवर कोरोनाविषयक कामांच्या काही जबाबदाऱ्या शिक्षकांवर सोपविल्या आहेत, मात्र त्याचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले होते. एकतर शिक्षक शाळेतही येण्यास टाळाटाळ करीत असून, दुसरीकडे हा प्रकार घडत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी जि.प.ला याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत हे आदेश काढले आहेत.