शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

शिक्षकांचा ‘प्रभाव’ पुढच्या पिढीपर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 00:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क हिंगोली : ज्याचा वर्ग कोणी चुकवतच नाही, तोच चांगला शिक्षक होय. शिक्षकाचा प्रभाव पुढच्या पिढीपर्यंत असतो. ...

ठळक मुद्देहिंगोली : ‘अक्षरपथ’ प्रकाशन सोहळा थाटात

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : ज्याचा वर्ग कोणी चुकवतच नाही, तोच चांगला शिक्षक होय. शिक्षकाचा प्रभाव पुढच्या पिढीपर्यंत असतो. चांगले शिक्षक बनण्यासाठी फार परिश्रम घ्यावे लागतात, ते प्रत्येकाला जमणे अशक्य आहे, मात्र यासाठी प्रत्येकानी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन स्वारातीमचे माजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे यांनी हिंगोली येथील शिवाजी महाविद्यालयात २१ डिसेंबर रोजी आयोजित ‘अक्षरपथ’ प्रकाशन सोहळ्यात केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक भ. मा. परसवाळे होते. यावेळी शिक्षण सभापती भैय्या देशमुख, जि.प.सदस्य अंकुशराव आहेर, कवी विलास वैद्य, शिक्षणाधिकारी दीपक चवणे, अशोक अर्धापूरकर, मंदाताई पवार यांची उपस्थिती होती. डॉ. वाघमारे यांनी प्रथम शिक्षणाधिकारी शिवाजी पवार यांच्या शैक्षणिक जीवन-कार्याच्या प्रवासाबद्दल माहिती दिली. तसेच अक्षरपथ पुस्तकातील निवडक वाक्यांचे स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, प्रत्येकाची कथा इतिहास असतो, जीवनात ज्या काही चांगल्या गोष्टी असतील त्या आत्मकथेत असायला हव्यात.शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, अनेक महापुरुषांनी शिक्षणाचे महत्त्व समाजासमोर मांडले आहे. महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरूषांचे शिक्षणाबद्दलचे विचार त्यांनी सांगितले. ‘आत्मकथा’ नेमकी कशी असते, त्यात कुठला इतिहास दडलेला असतो, या विषयावर डॉ. वाघमारे यांनी प्रकाश टाकला.