गतीरोधक बनले धोकादायक
हिंगोली: शहरातील अकोला बायपास या ठिकाणचे गतीरोधक मागील काही दिवसांपासून धोकादायक बनले असून काही वाहनचालक वाहने गतीरोधकाच्या बाजूने नेत आहेत. त्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. संबंधित विभागाने याची दखल घेऊन गतीरोधक नव्याने बसवावे, अशी मागणी होत आहे.रस्त्यावर पाणी; वाहनचालक त्रस्त
हिंगोली: शहरातील पेन्शनपुरा भागात रस्त्यावर नालीचे पाणी येत असल्यामुळे ये-जा करणाऱ्या वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना त्रास होत आहे. नगर परिषदेने याची दखल घेऊन पाण्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.
खंडित वीजपुरवठ्यास शेतकरी वैतागले
आखाडा बाळापूर: कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर परिसरातील ग्रामीण भागातील वीजपुरवठा मागील दहा दिवसांपासून सतत खंडित होत आहे. त्यामुळे पिकांना पाणी देणे शक्य होत नाही. परिणामी पिके वाळून जात आहेत. महावितरण कंपनीने याच दखल घेऊन वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.