शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
3
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
4
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
5
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
6
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
7
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
8
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
9
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
10
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
11
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
12
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

हिंगोलीत पालकमंत्र्यांच्या दौ-यात ‘दे धक्का’ची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 23:36 IST

पालकमंत्री दिलीप कांबळे दौ-यावर आले म्हणजे एरवी भाजपकर झाडून-पुसून स्वागताला हजर राहतात. यावेळी परिस्थिती वेगळी होती. पालकमंत्री कुणाला तरी बळ देण्याचे काम करीत असल्याची भावना बळावत चालल्याने आमदारांसह कार्यकर्तेही विश्रामगृहाकडे फिरकले नाहीत.

ठळक मुद्देदुरावा निर्माण होण्याची चिन्हे : एकाला बळ, दुसºयाची नाराजी, भाजपकरही झाले हैराण

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : पालकमंत्री दिलीप कांबळे दौ-यावर आले म्हणजे एरवी भाजपकर झाडून-पुसून स्वागताला हजर राहतात. यावेळी परिस्थिती वेगळी होती. पालकमंत्री कुणाला तरी बळ देण्याचे काम करीत असल्याची भावना बळावत चालल्याने आमदारांसह कार्यकर्तेही विश्रामगृहाकडे फिरकले नाहीत. तर काहींनी हा प्रकार नेमका कशामुळे घडला, याचे रसभरीत वर्णन करीत आज दिवसभर मनोरंजन केले.पालकमंत्री दिलीप कांबळे हे नव्यानेच येथे आले तेव्हा भाजपचे युवा नेते रामरतन शिंदे हे आ.तान्हाजी मुटकुळे यांच्या खास मर्जीतील असल्याने त्यांनी शिंदे यांना चांगलेच फटकारले होते. त्यानंतर शिंदे हे भाजप सोडण्याच्या मानसिकतेत होते. मात्र नंतर त्यांचे पालकमंत्र्यांशी सूर जुळाले. शिंदे यांच्या पत्नी संगीता या जि.प.ला निवडून आल्या अन् पालकमंत्र्यांना शिंदे यांच्या ताकदीचा अंदाजही आला म्हणून की काय ते अधिक विश्वासू बनले. त्याचदरम्यान जिल्ह्यातील इतर पक्षाच्या आमदारांनी पालकमंत्री कांबळे यांच्याविरुद्ध रणशिंग फुंकले. तेव्हा आ.मुटकुळे यांची भूमिका संदिग्ध वाटत असल्याचा संशय कांबळे यांना आला. मात्र कांबळे यांनी मुटकुळे यांच्याशी संबंधात तसूभरही फरक पडू न देता शिंदे यांच्यामागे बळ उभे करण्याची भूमिका घेतली. त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला ते हजेरी लावत आहेत.शिंदे यांनी आयोजित केलेल्या निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमासही मंत्र्यांनी बुधवारी हजेरी लावली. मात्र हिंगोलीत भाजपच्याच नेत्यांच्या पुढाकाराने व आ.तान्हाजी मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित रामराव महाराज ढोक यांच्या रामकथेकडे ते फिरकलेही नाहीत. पालकमंत्र्यांच्या दौºयात ते जवळ्यातील कीर्तनाला हजेरी लावणार असल्याचे नमूद असल्याने इतरांनी ही बाब गांभिर्याने घेतली नाही. मात्र भाजपमधीलच काही जणांनी ही बाब सगळ्यांच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला. यात आमदारांना विरोध करायचाय की शिंदे यांच्या वाढत्या प्रस्थाला सुरुंग लावायची तयारी चाललीय, हे कळायला मार्ग नाही. मात्र शिंदे आगामी विधानसभेच्या मैदानात षड्डू ठोकणार असल्याच्या उडणाºया वावड्यांना यातून पुष्टीच दिली जात आहे. आगामी काळात या प्रकाराचे पडसाद नक्कीच दिसतील. तोपर्यंत मात्र या चर्चांना पूर्णविराम शक्य नाही.थंडीमध्येही भाजपत गरमाहटपालकमंत्र्यांच्या दौºयानंतर सुरू असलेल्या चर्चांमुळे कडाक्याच्या थंडीतही भाजपमधील वातावरणात गरमाहट दिसून येत आहे. जो-तो आपापल्या परीने या घटनेचा अन्वयार्थ मांडत आहे.