शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘सॅम्पल’च्या नावाने घेतात २ किलो तूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 00:54 IST

नाफेडने सुरु केलेल्या खरेदी केंद्रावर प्रत्येक वेळी नव- नवीन बाबी समोर येत आहेत. आता तर चक्क सॅम्पलच्या नावाखाली १०० ग्रॅमऐवजी २ किलो तुरी काढून घेण्यात येत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : नाफेडने सुरु केलेल्या खरेदी केंद्रावर प्रत्येक वेळी नव- नवीन बाबी समोर येत आहेत. आता तर चक्क सॅम्पलच्या नावाखाली १०० ग्रॅमऐवजी २ किलो तुरी काढून घेण्यात येत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून येत आहेत.नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर प्रत्येक वेळी वेगवेगळे फंडे वापरुन शेतकºयांची आर्थिक लूट करण्याचा प्रकार सुरु आहे. पूर्वी खरेदी विक्री संघाकडे तूर खरेदी असतानाही गोंधळ होता. आता बाजार समितीकडे खरेदी आली तर एवढ्या दिवसांनंतर पुन्हा ओरड सुरू झाली. तूर खरेदी करत असलेल्या बारदान्याचे वजन ६०० ते ६५० ग्रॅम असल्याने ५० किलो तुरीच्या कट्यामागे ६०० किंवा ६५० ग्रॅम तूर घेणे गरजेचे असते; परंतु येथे सर्रासपणे ५० किलो ९०० ग्रॅम घेण्याचा सपाटा सुरु आहे. एका कट्ट्यामागे शेतक-यांची जवळपास २०० ते २५० ग्रॅम तूर जास्त घेतली जात आहे. अशी एका दिवसातून जेवढे क्ंिवटल तूर खरेदी होते, तेवढ्यात प्रतिक्ंिवटल अर्धाकिलो तरी जास्त माल जातो. बाजार समितीला प्रतिक्विंटल तूर खरेदीमागे एक ते दिड रुपये कमिशन नियमाने दिले जाते. याच कमिशनमधून सर्व खर्चाचे नियोजन करणे अपेक्षित असते. मात्र येथे तसे न होता तूर जास्तीची तूर घेवून शेतकºयांवरच हा भार टाकला जात असल्याचा आरोप होत आहे. शिवाय या ठिकाणी हमाली व मापाईच्या नावाखाली ३० रुपये घेतले जात आहेत. यात हमाली १८ ते २० रुपये दिली जाते तर मापाई प्रतिक्विंटलला साडेतीन रुपये. यातून सर्व खर्च वगळता प्रतिक्विंटल ६ ते ७ रुपये जास्त घेतले जात असल्याचे म्हणने आहे. तर मुख्य बाब म्हणजे येथे ३० जानेवारी ते ७ फेब्रुवारीपर्यंतच आॅनलाईन नोंदणी झालेली असली तरीही नंतर कागदपत्रे घेऊन आलेल्या शेतकºयांची नोंदणीच झालेली नसल्याचे समोर आले. अजून ८०० ते ९०० शेतकºयांची नोंद बाकी आहे.हिंगोली : आॅनलाईन नोंदणीही वाºयावरहिंगोलीतील बाजार समितीमध्ये तूर विक्री करण्यासाठी शेतकºयांना सर्व प्रथम आॅनलाईन नोंदणी करणे बंधनकारक आहे. नोंदणी असेल तरच त्या शेतकºयाची तूर खरेदी केली जात आहे. त्यामुळेच नियमाने तूर खरेदी करण्यासाठी शेतकरी कागदपत्रे घेऊन नोंदणी कक्षाजवळ जात आहेत. तर तेथेकोणीच हजर राहत नाही. राहिलेच तर कागदपत्रे घेऊन नोंदणीविना फेकून दिले जात आहेत. त्यामुळे नोंदणी न झालेल्या शेतकºयांना पुन्हा नोंदणी करणे अडचणीचे ठरणार आहे. यावर वरिष्ठांचा अंकुशच नसल्याने हे प्रकार घडत आहेत.वखार महामंडळाच्या गोदामात तूर नेल्यानंतर अडचण निर्माण होऊ नये म्हणून तूर खरेदी करताना तुरीचे १०० ग्रॅम सॅम्पल घेतले जाते. मात्र जास्तीचे घेतल्याची तक्रार असल्यास चौकशी करू, असे सचिव पाटील यांनी सांगितले.