शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
4
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
5
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
6
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
7
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
8
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
9
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
10
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
11
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
12
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
13
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
14
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
15
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
16
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
17
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
18
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
19
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
20
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
Daily Top 2Weekly Top 5

एप्रिलमध्ये रुग्णालयाचा घेणार आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 00:21 IST

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाचा ढेपाळलेला कारभार काही केल्या सुधारत नसल्याचे चित्र आहे. शेवटी या ठिकाणी एप्रिल महिन्यात आरोग्य विभागाचे संचालक डॉ.संजीव कुमार हे येऊन आढावा घेणार आहेत. तर बेशिस्तीला लगाम घालण्यासाठीही पावले उचलली जाण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाचा ढेपाळलेला कारभार काही केल्या सुधारत नसल्याचे चित्र आहे. शेवटी या ठिकाणी एप्रिल महिन्यात आरोग्य विभागाचे संचालक डॉ.संजीव कुमार हे येऊन आढावा घेणार आहेत. तर बेशिस्तीला लगाम घालण्यासाठीही पावले उचलली जाण्याची शक्यता आहे.मागील काही दिवसांपासून सामान्य रुग्णालयाबाबत सुरू असलेली ओरड खा.राजीव सातव यांच्यापर्यंतही पोहोचली. सातव यांनी याबाबत रुग्णालय प्रशासनालाही सूचना दिल्या आहेत. मात्र यात काही बदल होण्याची चिन्हे दिसत नसल्याने या रुग्णालयाला शिस्त लावण्यासाठी आरोग्य विभागाचे आयुक्त डॉ.संजीव कुमार यांनीच येथे आढावा घ्यावा, असे त्यांनी सुचविले. त्यात एप्रिल महिन्यात हिंगोलीच्या सामान्य रुग्णालयात प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी संजीवकुमार येणार आहेत.येथील रुग्णालयात डॉक्टरांची आधीच असलेली अपुरी संख्या व त्यात पाळले न जाणारे वेळापत्रक ही गंभीर बाब बनली आहे. इमारतीचे काम रखडल्याने प्रत्येक विभागाचा बाह्यरुग्ण विभाग स्वतंत्रपणे कार्यरत नाही. शस्त्रक्रिया कधी होत नाहीत. पूर्वी प्रसूतींचे प्रमाण चांगले होते. आता रेफरिंगकडे कल वाढला आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या रुग्णालयात पाण्याची सुविधाही व्यवस्थित चालत नाही. कधी बंद तर कधी सुरू असते. स्वच्छतेचा व स्वच्छतागृहांचा प्रश्नही सोडविला जात नाही. रुग्णांची गैरसोय तर होतेच शिवाय डॉक्टर व कर्मचाºयांसाठीही स्वच्छतागृहांची व्यवस्था नाही. तर सामान्य रुग्णालयासाठीचे १ कोटी तेथे खर्च होणे शक्य नसेल तर कळमनुरी रुग्णालयाच्या फर्निचरला देण्याची सूचना दिल्याचेही ते म्हणाले.औषधीचा प्रश्न कायमजिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांना लागणाºया साहित्याची उसनवारी करून काम चालविले जात असले तरीही रुग्णांना औषधी मात्र मिळत नसल्याने याची उसनवारी काही केली जात नाही. औषधीही आजूबाजूच्या जिल्ह्यांतून आणली तर किमान रुग्णांना बाहेरून औषध आणण्याची गरज पडणार नाही. मात्र त्या जिल्ह्यांतही हीच परिस्थिती आहे. कारण केंद्रीय पद्धतीने औषधी खरेदी होत नाही. तर शासकीय कंपनी असलेल्या हापकिन्सकडे रक्कम वर्ग करणाºयांना सहा महिन्यांची प्रतीक्षा करूनही अजून औषधी मिळाली नाही, हीच खरी समस्या आहे.उपकेंद्रांना डॉक्टर द्याआरोग्य उपकेंद्रांमध्ये बीएएमएस डॉक्टर द्यावेत, अशी मागणी आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे. हिंगोलीत यासाठी १२५ बीएएमएस डॉक्टरांची पदनिर्मिती करा,यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचेही खा.सातव यांनी सांगितले. यात यश येईल, असा आशावादही व्यक्त केला.