शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
3
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
4
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
7
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
8
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
9
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
10
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
11
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
12
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
13
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
14
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
15
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
16
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
17
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
18
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
19
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
20
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश

यंदा पीकविम्याने तारले; भरले ९५ कोटी, मिळणार १०५ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:28 IST

हिंगोली जिल्ह्यात मागच्या खरीप हंगामात काढणीत असतानाच झालेल्या पावसाने शेतकऱ्यांची दाणादाण झाली. हातातोंडाशी आलेला घास नैसर्गिक आपत्तीत हिरावला गेला. ...

हिंगोली जिल्ह्यात मागच्या खरीप हंगामात काढणीत असतानाच झालेल्या पावसाने शेतकऱ्यांची दाणादाण झाली. हातातोंडाशी आलेला घास नैसर्गिक आपत्तीत हिरावला गेला. त्यातच अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पिकांचा उताराही चांगला आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पीकविम्याची आस होती. शासनानेही अतिवृष्टीग्रस्तांना मदत घोषित केली होती. यंदा पीकविम्यासाठी जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी व कृषी विभागही आग्रही होता. शेतकऱ्यांच्या बाजूने ही सर्व मंडळी उभी राहिल्याचे पहायला मिळाले. त्याचबरोबर पीक कापणीचे वस्तूनिष्ठ प्रयोगही करण्यात आले. त्यात आढळून आलेल्या परिस्थितीमुळे विमा कंपनीला १.२१ लाख शेतकऱ्यांना विमा मंजूर करावा लागला. मागील अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच शेतकरी, राज्य शासन, केंद्र शासन या तिघांनी मिळून भरलेल्या रक्कमेपेक्षा जास्त रक्कम विम्यापोटी शेतकऱ्यांना मिळाली आहे. एचडीएफसी कंपनीकडे हिंगोली जिल्ह्याच्या पीकविम्याची जबाबदारी होती. मागील काही दिवसांपासून टप्प्या टप्प्याने पीकविमा जमा होत असून आतापर्यंत ६५ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले. उर्वरित रक्कमेसाठी प्रक्रिया सुरू आहे. कृषी विभागाकडून त्याचा आढावा घेतला जात आहे.

एकूण मंजूर पीकविमा १०५.१९ कोटी

प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी भरलेली रक्कम १३.१८ कोटी

राज्य सरकारने भरलेली रक्कम ४०.६० कोटी

केंद्र सरकारने भरलेली रक्कम ४०.६० कोटी,

विमा काढणारे शेतकरी ३.०२ लाख

लाभार्थी शेतकरी १.२१ लाख

किती जणांना मिळाला विमा ७० हजार

आतापर्यंत वाटप केलेली रक्कम ६५ कोटी

खरीप हंगाम २०२०-२१

पीकविमा लागवड क्षेत्र

१,४७,००० हेक्टर

एकूण पीकाचे क्षेत्र

३,४०.००० हेक्टर

बहुतांश शेतकऱ्यांना लाभ

पीकविम्याचा लाभ जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना मिळाला आहे अथवा मिळत आहे. यातून सुटलेल्या शेतकऱ्यांची संख्या तुलनेत खुप कमी आहे. पीकविमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या तीन लाख दिसत असली तरीही अनेक शेतकऱ्यांनी तीन तीन पिकांचा विमा भरलेला आहे. त्यामुळे शेतकरी संख्या वाढली आहे. यातील काही पिकांना फटका बसला नाही, त्यामुळे विम्याचाही प्रश्न उरला नाही. तरीही यंदा अनेक शेतकऱ्यांना पीकविमा मंजूर झाल्याने त्या प्रमाणात तक्रारी दिसत नाहीत. शिवाय अजूनही विमा मंजूर होणे चालू असून शेतकऱ्यांचा खात्यावर रक्कम जमा होणे चालू आहे. याबाबत मात्र अनेक शेतकऱ्यांची नाराजी आहे. विम्याची रक्कम मिळणार तरी कधी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

तर बियाणे खरेदी करता येईल

पीकविमा गावातील बहुतांश शेतकऱ्यांना मंजूर झाला आहे. जर शेतकऱ्यांना ही रक्कम पेरणीपूर्वी मिळाली तर बियाणे व खते खरेदी करण्यासाठी त्याचा फायदा होईल. त्यातच आतापर्यंत केवळ ६५ कोटी रुपये खात्यावर जमा झालेले आहेत. आणखी ४० कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळणे बाकी आहे. ज्या शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम मिळाली त्यांनाही ती बँकेतून काढण्यास अडचणी येत आहेत.