शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

यंदा पीकविम्याने तारले; भरले ९५ कोटी, मिळणार १०५ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:28 IST

हिंगोली जिल्ह्यात मागच्या खरीप हंगामात काढणीत असतानाच झालेल्या पावसाने शेतकऱ्यांची दाणादाण झाली. हातातोंडाशी आलेला घास नैसर्गिक आपत्तीत हिरावला गेला. ...

हिंगोली जिल्ह्यात मागच्या खरीप हंगामात काढणीत असतानाच झालेल्या पावसाने शेतकऱ्यांची दाणादाण झाली. हातातोंडाशी आलेला घास नैसर्गिक आपत्तीत हिरावला गेला. त्यातच अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पिकांचा उताराही चांगला आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पीकविम्याची आस होती. शासनानेही अतिवृष्टीग्रस्तांना मदत घोषित केली होती. यंदा पीकविम्यासाठी जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी व कृषी विभागही आग्रही होता. शेतकऱ्यांच्या बाजूने ही सर्व मंडळी उभी राहिल्याचे पहायला मिळाले. त्याचबरोबर पीक कापणीचे वस्तूनिष्ठ प्रयोगही करण्यात आले. त्यात आढळून आलेल्या परिस्थितीमुळे विमा कंपनीला १.२१ लाख शेतकऱ्यांना विमा मंजूर करावा लागला. मागील अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच शेतकरी, राज्य शासन, केंद्र शासन या तिघांनी मिळून भरलेल्या रक्कमेपेक्षा जास्त रक्कम विम्यापोटी शेतकऱ्यांना मिळाली आहे. एचडीएफसी कंपनीकडे हिंगोली जिल्ह्याच्या पीकविम्याची जबाबदारी होती. मागील काही दिवसांपासून टप्प्या टप्प्याने पीकविमा जमा होत असून आतापर्यंत ६५ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले. उर्वरित रक्कमेसाठी प्रक्रिया सुरू आहे. कृषी विभागाकडून त्याचा आढावा घेतला जात आहे.

एकूण मंजूर पीकविमा १०५.१९ कोटी

प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी भरलेली रक्कम १३.१८ कोटी

राज्य सरकारने भरलेली रक्कम ४०.६० कोटी

केंद्र सरकारने भरलेली रक्कम ४०.६० कोटी,

विमा काढणारे शेतकरी ३.०२ लाख

लाभार्थी शेतकरी १.२१ लाख

किती जणांना मिळाला विमा ७० हजार

आतापर्यंत वाटप केलेली रक्कम ६५ कोटी

खरीप हंगाम २०२०-२१

पीकविमा लागवड क्षेत्र

१,४७,००० हेक्टर

एकूण पीकाचे क्षेत्र

३,४०.००० हेक्टर

बहुतांश शेतकऱ्यांना लाभ

पीकविम्याचा लाभ जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना मिळाला आहे अथवा मिळत आहे. यातून सुटलेल्या शेतकऱ्यांची संख्या तुलनेत खुप कमी आहे. पीकविमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या तीन लाख दिसत असली तरीही अनेक शेतकऱ्यांनी तीन तीन पिकांचा विमा भरलेला आहे. त्यामुळे शेतकरी संख्या वाढली आहे. यातील काही पिकांना फटका बसला नाही, त्यामुळे विम्याचाही प्रश्न उरला नाही. तरीही यंदा अनेक शेतकऱ्यांना पीकविमा मंजूर झाल्याने त्या प्रमाणात तक्रारी दिसत नाहीत. शिवाय अजूनही विमा मंजूर होणे चालू असून शेतकऱ्यांचा खात्यावर रक्कम जमा होणे चालू आहे. याबाबत मात्र अनेक शेतकऱ्यांची नाराजी आहे. विम्याची रक्कम मिळणार तरी कधी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

तर बियाणे खरेदी करता येईल

पीकविमा गावातील बहुतांश शेतकऱ्यांना मंजूर झाला आहे. जर शेतकऱ्यांना ही रक्कम पेरणीपूर्वी मिळाली तर बियाणे व खते खरेदी करण्यासाठी त्याचा फायदा होईल. त्यातच आतापर्यंत केवळ ६५ कोटी रुपये खात्यावर जमा झालेले आहेत. आणखी ४० कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळणे बाकी आहे. ज्या शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम मिळाली त्यांनाही ती बँकेतून काढण्यास अडचणी येत आहेत.