शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

आखाडा बाळापुरमध्ये गोवर-रूबेलाची लस घेतलेल्या विद्यार्थ्यांना मळमळ,उलट्यांचा त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 17:53 IST

दहा दिवसांपासून सुरू असलेल्या मोहिमेत बाळापूर परिसरातील 47 विद्यार्थ्यांना असा त्रास झाल्याची माहिती आहे. 

आखाडा बाळापुर ( हिंगोली ) : आखाडा बाळापुर परिसरातील एका विद्यालयातील बालकांना ही लस टोचल्याने मळमळ, उलट्यांचा त्रास झाला. त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचार देण्यात आले. दहा दिवसांपासून सुरू असलेल्या मोहिमेत बाळापूर परिसरातील 47 विद्यार्थ्यांना असा त्रास झाल्याची माहिती आहे. 

परिसरात 27 नोव्हेंबर पासून गोवर-रूबेला लसीकरण मोहीम राबविली जात आहे. शाळा -शाळांवर आरोग्य विभागाचे पथक जाऊन लसीकरण करत आहेत. शुक्रवारी येथील एका विद्यालयात लसीकरण मोहीम राबविण्यात आली. गोवर रुबेलाची लस दिल्यानंतर दहा ते पंधरा विद्यार्थ्यांना डोकेदुखी मळमळ उलटीचा त्रास सुरू झाला. विद्यार्थ्यांना तत्काळ इंजेक्शन देऊन उपचार करण्यात आले. त्यानंतरही काही जणांची डोकेदुखी मळमळ न थांबल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

सना फिरोज पठाण (वर्ग 6 वा,रा.कुपटी), दिपाली शिवाजी कळमकर(वर्ग ६वी), रवी प्रकाश गव्हाणे (वर्ग ९ वा रा.येगाव ), मंजूकोर पांडूसिंग बावरी(वर्ग १०वी), शैलेश किशोर घोंगडे(वर्ग ५वा रा. कान्हेगाव) यांच्यासह आठ विद्यार्थ्यांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक करंडे सर या ठिकाणी प्रत्यक्ष हजर असून वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जाधव त्यांच्यावर उपचार करत आहेत. लसीकरणामुळे त्रास होत असल्याच्या अफवा तेजीत पसरत आहेत. परंतु लसीकरणाच्या वेळी काही कारणामुळे अपवादात्मक ठिकाणी मुलांना त्रास होऊ शकतो .परंतु हा त्रास म्हणजे लसीमुळे झालेले रिॲक्शन नाही असे डॉक्टर जाधव यांनी सांगितले आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या शाळांमधील 47 विद्यार्थ्यांना या लसीमुळे त्रास झाला आहे. 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलHingoliहिंगोलीdoctorडॉक्टर