शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी अवस्था हा जीवनाचा पाया होय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:53 IST

सेनगाव : मानवी जीवनात विद्यार्थी अवस्था ही पूर्वांग आहे. ही अवस्था चांगली आणि कर्तव्यदक्ष रितीने पार पाडली तरच आयुष्याच्या ...

सेनगाव : मानवी जीवनात विद्यार्थी अवस्था ही पूर्वांग आहे. ही अवस्था चांगली आणि कर्तव्यदक्ष रितीने पार पाडली तरच आयुष्याच्या उत्तरंगात सुख, समाधान आणि आनंद प्राप्त होतो. विद्यार्थी अवस्था खऱ्या अर्थाने जीवनाचा पाया असल्याने हा पाया अधिक भक्कम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन प. पू. मुनिश्री १०८ अक्षयसागर महाराज यांनी केले.

महाविर दिगंबर जैन मंदिर शिलान्यास दोन दिवसीय कार्यक्रमासाठी २७ जानेवारी रोजी प. पू. अक्षयसागर महाराज आले असता, भाविकांच्या प्रवचन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी विद्यार्थी जीवन आणि व्यक्तिमत्व विकास या विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी मुनिश्री अक्षयसागर म्हणाले, प्रत्येक मनुष्याची ओळख ही त्याचातील गुणांद्वारे केली जाते. विद्यार्थांकडे जिज्ञासू वृत्ती असली पाहिजे. गुरूविषयी निष्ठा असावी, जिज्ञासा, आत्मविश्वास व दृढ संकल्प या तीन गोष्टी विद्यार्थ्यांना यशस्वी करतात. शिक्षण आमचे साध्य नाही ते साधन आहे. ज्या शिक्षणामुळे आम्ही चारित्र्यवान बनू शकतो. तेच खरे शिक्षण आहे. मातृभाषेत शिक्षणाची आवश्यकता आहे. भाषा शिकविण्यासाठी आपल्या मुलांचे बालपण हरवून घेणे हे कितपत योग्य आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थितांना केला. तसेच आधुनिक समृद्ध आणि शक्तीशाली राष्ट्राच्या उभाणीत मातृभाषेची कोणती भूमिका असू शकते, यांची जाणीव आज नसल्याचे दिसून येते. स्वातंत्र्याच्या ६५ वर्षांनंतरसुध्दा आमची शिक्षणपद्धती, नोकरशाही, राजकारण, प्रसिद्धी, माध्यमे, न्यायालये आणि संसदेतही इंंग्रजीचे वर्चस्व निर्माण झाले आहे. त्यामुळे देशाचे प्रंचड नुकसान झाले असल्याचे मत व्यक्त केले. याबद्दल गांभीर्याने चिंतन होऊन आवश्यक ते बदल होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

फोटो नं. १९