शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

पीककर्ज वाटपासाठी बँकांना कडक सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:24 IST

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, अग्रणी बँकेचे सावंत यांची उपस्थिती होती. यावेळी खा. ...

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, अग्रणी बँकेचे सावंत यांची उपस्थिती होती. यावेळी खा. पाटील म्हणाले, आता खरीप हंगाम तोंडावर आला. तरीही सात टक्के कर्जवाटप झाले. ही बाब लाजिरवाणी आहे. बँकांनी स्टाफ किंवा इतर अडचणी असतील तर त्या एकत्रितपणे दिल्यास आम्ही वरिष्ठांकडे पाठपुरावा करू. मात्र, कारणे न सांगता पीककर्ज वाटप केले पाहिजे. दलालांमार्फत प्रकरणे करण्याचा प्रकार नजरेस आला तर लाचलुचपतकडे देण्यास सांगितले आहे. त्यामुळे सावधगिरी बाळगा. सौहार्दाने शेतकऱ्यांना सहकार्य करा, असे सांगितले. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सर्वाधिक तक्रारी असल्याचे स्पष्टपणे सांगितले. जर उद्दिष्ट पूर्ण करता येत नसेल तर घेता कशाला? आता हे खपवून न घेता थेट एसएलबीसीला अहवाल देण्याचे निर्देश दिले.

यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी म्हणाले, कर्जमाफीत बँकांना ६०० कोटी मिळाले, तर ५५० कोटींचेच पीककर्ज वाटले. त्यामुळे फार चांगले काम केले असे समजू नका. नियमितपेक्षाही हे कमी वाटप आहे. यात नवीन ग्राहकांना कर्ज दिले जात नाही. ग्राहकांना पीकनिहाय ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे कर्ज दिले जात नाही. या धोरणात बदल झाला पाहिजे.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सूर्यवंशी यांनी बँकांनी आधी पात्र शेतकऱ्यांची संख्या निश्चित करावी, त्यांची कागदपत्रे तयार करावीत, त्यात अडचण असल्यास थेट महसूलची मदत घ्यावी. त्यानंतर नवीन खातेदार शोधून त्यांची प्रकरणे करावीत. यासाठी वेळापत्रक निश्चित करा, तरच पीककर्जाचे उद्दिष्ट गाठता येईल, असे सांगितले.

अशा केल्या प्रमुख सूचना

दर आठवड्याला बँकांची बैठक घेतली जाईल. त्यात अद्ययावत माहिती देऊन सर्व व्यवस्थापकांनी हजेरी लावणे बंधनकारक असेल.

ज्या बँकेत शेतकऱ्यांना यंदा कर्जमाफी झाली त्या बँकेने गाव दत्तक नसल्याचा बहाणा न करता त्या शेतकऱ्यास कर्ज द्यावे.

एक दिवस शेतकऱ्यांसाठी दिला, त्याप्रमाणे शाखांनी गावात जाऊन प्रकरणे करण्यासाठीही स्वतंत्रपणे नियोजन करावे.

गावोगाव कॅम्प घेऊन बँकांत प्रत्यक्ष होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रयत्न करावा.

एखाद्या पिकासाठी ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा कमी कर्ज देणे हा गुन्हा आहे, तसे न करता वाजवी कर्ज मंजूर करावे.

पीक कर्जासंदर्भात लीड बँक व तहसीलदारांच्या अध्यक्षतेत समिती स्थापन करून प्रकरण निकाली काढावे.

यंदा ज्या बँकेचे कर्जवाटप १०० टक्क्यांच्या जवळपास गेले नाही त्या बँकांवर थेट कारवाईचा प्रस्ताव पाठविला जाईल.