शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

पीककर्ज वाटपासाठी बँकांना कडक सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:24 IST

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, अग्रणी बँकेचे सावंत यांची उपस्थिती होती. यावेळी खा. ...

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, अग्रणी बँकेचे सावंत यांची उपस्थिती होती. यावेळी खा. पाटील म्हणाले, आता खरीप हंगाम तोंडावर आला. तरीही सात टक्के कर्जवाटप झाले. ही बाब लाजिरवाणी आहे. बँकांनी स्टाफ किंवा इतर अडचणी असतील तर त्या एकत्रितपणे दिल्यास आम्ही वरिष्ठांकडे पाठपुरावा करू. मात्र, कारणे न सांगता पीककर्ज वाटप केले पाहिजे. दलालांमार्फत प्रकरणे करण्याचा प्रकार नजरेस आला तर लाचलुचपतकडे देण्यास सांगितले आहे. त्यामुळे सावधगिरी बाळगा. सौहार्दाने शेतकऱ्यांना सहकार्य करा, असे सांगितले. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सर्वाधिक तक्रारी असल्याचे स्पष्टपणे सांगितले. जर उद्दिष्ट पूर्ण करता येत नसेल तर घेता कशाला? आता हे खपवून न घेता थेट एसएलबीसीला अहवाल देण्याचे निर्देश दिले.

यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी म्हणाले, कर्जमाफीत बँकांना ६०० कोटी मिळाले, तर ५५० कोटींचेच पीककर्ज वाटले. त्यामुळे फार चांगले काम केले असे समजू नका. नियमितपेक्षाही हे कमी वाटप आहे. यात नवीन ग्राहकांना कर्ज दिले जात नाही. ग्राहकांना पीकनिहाय ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे कर्ज दिले जात नाही. या धोरणात बदल झाला पाहिजे.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सूर्यवंशी यांनी बँकांनी आधी पात्र शेतकऱ्यांची संख्या निश्चित करावी, त्यांची कागदपत्रे तयार करावीत, त्यात अडचण असल्यास थेट महसूलची मदत घ्यावी. त्यानंतर नवीन खातेदार शोधून त्यांची प्रकरणे करावीत. यासाठी वेळापत्रक निश्चित करा, तरच पीककर्जाचे उद्दिष्ट गाठता येईल, असे सांगितले.

अशा केल्या प्रमुख सूचना

दर आठवड्याला बँकांची बैठक घेतली जाईल. त्यात अद्ययावत माहिती देऊन सर्व व्यवस्थापकांनी हजेरी लावणे बंधनकारक असेल.

ज्या बँकेत शेतकऱ्यांना यंदा कर्जमाफी झाली त्या बँकेने गाव दत्तक नसल्याचा बहाणा न करता त्या शेतकऱ्यास कर्ज द्यावे.

एक दिवस शेतकऱ्यांसाठी दिला, त्याप्रमाणे शाखांनी गावात जाऊन प्रकरणे करण्यासाठीही स्वतंत्रपणे नियोजन करावे.

गावोगाव कॅम्प घेऊन बँकांत प्रत्यक्ष होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रयत्न करावा.

एखाद्या पिकासाठी ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा कमी कर्ज देणे हा गुन्हा आहे, तसे न करता वाजवी कर्ज मंजूर करावे.

पीक कर्जासंदर्भात लीड बँक व तहसीलदारांच्या अध्यक्षतेत समिती स्थापन करून प्रकरण निकाली काढावे.

यंदा ज्या बँकेचे कर्जवाटप १०० टक्क्यांच्या जवळपास गेले नाही त्या बँकांवर थेट कारवाईचा प्रस्ताव पाठविला जाईल.