शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हंटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
4
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
5
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
6
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
7
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
8
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
9
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
10
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
11
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
12
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
13
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
14
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
15
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
16
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
17
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
18
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
19
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?

आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई - जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 00:26 IST

केंद्रीय निवडणूक आयोगाने १० मार्च रोजी आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. २७ मेपर्यंत आचारसंहिता लागू राहणार आहे. यादरम्यान आचारसंहितेचे उल्लघन झाल्यास संबंधितावर कडक कारवाई करणार असल्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी ११ रोजी पत्रकारपरिषदेत सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : केंद्रीय निवडणूक आयोगाने १० मार्च रोजी आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. २७ मेपर्यंत आचारसंहिता लागू राहणार आहे. यादरम्यान आचारसंहितेचे उल्लघन झाल्यास संबंधितावर कडक कारवाई करणार असल्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी ११ रोजी पत्रकारपरिषदेत सांगितले.हिंगोली जिल्ह्याला लागून सहा जिल्ह्यांच्या सीमा आहेत. परजिल्ह्यातील वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी चोवीस तास पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. प्रत्येक वाहनाची तपासणी केली जाणार आहे. अवैधरीत्या दारु, पैसा वाहतूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. देखरेखीसाठी पथकांची नेमणूक केली आहे. सर्व राजकीय पक्षांच्या बैठका घेऊन सर्वांना कडक सूचना करण्यात आल्या आहेत. राजकीय पक्षांच्या विविध परवानग्या पोर्टलवर आॅनलाईन देण्यात येणार आहेत. शासकीय संकेतस्थळावर राजकीय नेत्यांचे फोटो भिंतीवरील पोस्टर, बॅनर्स, राजकीय झेंडे तसेच शासकीय कार्यालयाच्या भिंतीवरील पोस्टर, भिंतीपत्रके काढण्याचे आदेश दिले आहेत. राजकीय नेते निवडणूक प्रचारासाठी शासकीय संपत्तीचा दुरुपयोग करणार नाहीत, या दृष्टीने सर्वतोपरी खबरदारी घेण्यात येणार आहे. तक्रार व देखरेख यंत्रनेची स्थापना केली जाणार आहे. राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन केले जाणार असल्याचे जयवंशी यांनी सांगितले. यावेळी उपजिल्हाधिकारी जगदीश मिनियार, उपविभागीय अधिकारी चोरमारे अ. पोलीस अधीक्षक यशवंत काळे आदी.

टॅग्स :Electionनिवडणूक