शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई - जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 00:26 IST

केंद्रीय निवडणूक आयोगाने १० मार्च रोजी आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. २७ मेपर्यंत आचारसंहिता लागू राहणार आहे. यादरम्यान आचारसंहितेचे उल्लघन झाल्यास संबंधितावर कडक कारवाई करणार असल्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी ११ रोजी पत्रकारपरिषदेत सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : केंद्रीय निवडणूक आयोगाने १० मार्च रोजी आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. २७ मेपर्यंत आचारसंहिता लागू राहणार आहे. यादरम्यान आचारसंहितेचे उल्लघन झाल्यास संबंधितावर कडक कारवाई करणार असल्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी ११ रोजी पत्रकारपरिषदेत सांगितले.हिंगोली जिल्ह्याला लागून सहा जिल्ह्यांच्या सीमा आहेत. परजिल्ह्यातील वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी चोवीस तास पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. प्रत्येक वाहनाची तपासणी केली जाणार आहे. अवैधरीत्या दारु, पैसा वाहतूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. देखरेखीसाठी पथकांची नेमणूक केली आहे. सर्व राजकीय पक्षांच्या बैठका घेऊन सर्वांना कडक सूचना करण्यात आल्या आहेत. राजकीय पक्षांच्या विविध परवानग्या पोर्टलवर आॅनलाईन देण्यात येणार आहेत. शासकीय संकेतस्थळावर राजकीय नेत्यांचे फोटो भिंतीवरील पोस्टर, बॅनर्स, राजकीय झेंडे तसेच शासकीय कार्यालयाच्या भिंतीवरील पोस्टर, भिंतीपत्रके काढण्याचे आदेश दिले आहेत. राजकीय नेते निवडणूक प्रचारासाठी शासकीय संपत्तीचा दुरुपयोग करणार नाहीत, या दृष्टीने सर्वतोपरी खबरदारी घेण्यात येणार आहे. तक्रार व देखरेख यंत्रनेची स्थापना केली जाणार आहे. राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन केले जाणार असल्याचे जयवंशी यांनी सांगितले. यावेळी उपजिल्हाधिकारी जगदीश मिनियार, उपविभागीय अधिकारी चोरमारे अ. पोलीस अधीक्षक यशवंत काळे आदी.

टॅग्स :Electionनिवडणूक