शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
7
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
8
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
9
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
10
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
11
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
12
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
13
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
14
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
16
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
17
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
18
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
19
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
20
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी

नांदेड नाक्यावरील पथदिवे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:30 IST

रस्त्यावर पाणी; वाहनचालक त्रस्त हिंगोली: शहरातील पेन्शनपुरा, कापडगल्ली, तोफखाना आदी भागात नाल्यातील पाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे ये-जा करण्यास ...

रस्त्यावर पाणी; वाहनचालक त्रस्त

हिंगोली: शहरातील पेन्शनपुरा, कापडगल्ली, तोफखाना आदी भागात नाल्यातील पाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे ये-जा करण्यास वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना त्रास होत आहे. नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाने वेळीच याची दखल घेऊन या भागातील नाल्यांची साफसफाई करून त्यावर फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

गतिरोधकाची मागणी

हिंगोली: शहरातील रेल्वे उड्डाण पुलावर मागील काही दिवसांपासून वाहनांची वर्दळ वाढली आहे. यामुळे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. रेल्वे उड्डाण पुलावर दुभाजक नसल्यामुळे वाहने अस्ताव्यस्त चालविली जात आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना त्रास होत आहे. संबंधित विभागाने उड्डाण पुलावर गतिरोधक आणि दुभाजक बसवून अपघात टाळावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

वानरे शहरात: वन विभागाचे दुर्लक्ष

हिंगोली: मागील १५ दिवसांपासून अन्न व पाण्याच्या शोधात वानरे शहरात दाखल होत आहेत. शहरातील गंगानगर, शास्त्रीनगर, शिवाजीनगर, कापडगल्ली, मंगळवारा, तोफखाना, जिजामातानगर, वाशिम रोड आदी भागात वानरे घरावरून उड्या मारताना पाहायला मिळत आहेत. अंगणात ठेवलेल्या वस्तूंची नासाडी करीत आहेत. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वन विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे.

विजेच्या लपंडावाला शेतकरी वैतागले

कळमनुरी: शहरासह परिसरातील अनेक गावांमध्ये विजेचा लपंडाव नित्याचाच झाला आहे. अचानक वीज खंडित होत असल्यामुळे विजेवर चालणारी उपकरणे जळून जात आहेत. सद्य:स्थितीत शेतातील विहिरींना पाणी आहे; परंतु वीज खंडित होत असल्यामुळे पिकांना पाणी देता येत नाही. महावितरण कंपनीने याची दखल घेऊन तालुक्यातील वीज पुरवठा सुरळीत करणे गरजेचे झाले आहे.

नाल्या स्वच्छ करण्याची मागणी

हिंगोली: शहरातील जिजामातानगर, नाईकनगर, तोफखाना, शास्त्रीनगर आदी भागातील नाल्या साफ करण्यात आल्या नाहीत. यामुळे या भागात डासांचे प्रमाण वाढले आहे. परिणामी नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाने याची दखल घेऊन शहरात स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

‘बसस्थानकातील धुळीचे प्रमाण कमी करावे’

हिंगोली: शहरातील बसस्थानकातील गिट्टी पूर्णत: निघून गेली असून धुळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. वाढत्या धुळीमुळे प्रवाशांना बसस्थानकात बसणेही कठीण होत आहे. धुळीमुळे प्रवाशांना श्वसनाचे आजार होत आहेत. आगार प्रमुखांनी याची दखल घेऊन बसस्थानकात डांबर मिश्रित गिट्टी टाकून दबाई करून धुळीचा बंदोबस्त करावा व प्रवाशांची गैरसोय दूर करणे गरजेचे आहे.