शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
3
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
4
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
5
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
6
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
7
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
8
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
9
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
10
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
11
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
13
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
14
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
15
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
16
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
17
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
18
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
19
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
20
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प

नांदेड नाक्यावरील पथदिवे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:30 IST

रस्त्यावर पाणी; वाहनचालक त्रस्त हिंगोली: शहरातील पेन्शनपुरा, कापडगल्ली, तोफखाना आदी भागात नाल्यातील पाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे ये-जा करण्यास ...

रस्त्यावर पाणी; वाहनचालक त्रस्त

हिंगोली: शहरातील पेन्शनपुरा, कापडगल्ली, तोफखाना आदी भागात नाल्यातील पाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे ये-जा करण्यास वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना त्रास होत आहे. नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाने वेळीच याची दखल घेऊन या भागातील नाल्यांची साफसफाई करून त्यावर फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

गतिरोधकाची मागणी

हिंगोली: शहरातील रेल्वे उड्डाण पुलावर मागील काही दिवसांपासून वाहनांची वर्दळ वाढली आहे. यामुळे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. रेल्वे उड्डाण पुलावर दुभाजक नसल्यामुळे वाहने अस्ताव्यस्त चालविली जात आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना त्रास होत आहे. संबंधित विभागाने उड्डाण पुलावर गतिरोधक आणि दुभाजक बसवून अपघात टाळावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

वानरे शहरात: वन विभागाचे दुर्लक्ष

हिंगोली: मागील १५ दिवसांपासून अन्न व पाण्याच्या शोधात वानरे शहरात दाखल होत आहेत. शहरातील गंगानगर, शास्त्रीनगर, शिवाजीनगर, कापडगल्ली, मंगळवारा, तोफखाना, जिजामातानगर, वाशिम रोड आदी भागात वानरे घरावरून उड्या मारताना पाहायला मिळत आहेत. अंगणात ठेवलेल्या वस्तूंची नासाडी करीत आहेत. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वन विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे.

विजेच्या लपंडावाला शेतकरी वैतागले

कळमनुरी: शहरासह परिसरातील अनेक गावांमध्ये विजेचा लपंडाव नित्याचाच झाला आहे. अचानक वीज खंडित होत असल्यामुळे विजेवर चालणारी उपकरणे जळून जात आहेत. सद्य:स्थितीत शेतातील विहिरींना पाणी आहे; परंतु वीज खंडित होत असल्यामुळे पिकांना पाणी देता येत नाही. महावितरण कंपनीने याची दखल घेऊन तालुक्यातील वीज पुरवठा सुरळीत करणे गरजेचे झाले आहे.

नाल्या स्वच्छ करण्याची मागणी

हिंगोली: शहरातील जिजामातानगर, नाईकनगर, तोफखाना, शास्त्रीनगर आदी भागातील नाल्या साफ करण्यात आल्या नाहीत. यामुळे या भागात डासांचे प्रमाण वाढले आहे. परिणामी नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाने याची दखल घेऊन शहरात स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

‘बसस्थानकातील धुळीचे प्रमाण कमी करावे’

हिंगोली: शहरातील बसस्थानकातील गिट्टी पूर्णत: निघून गेली असून धुळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. वाढत्या धुळीमुळे प्रवाशांना बसस्थानकात बसणेही कठीण होत आहे. धुळीमुळे प्रवाशांना श्वसनाचे आजार होत आहेत. आगार प्रमुखांनी याची दखल घेऊन बसस्थानकात डांबर मिश्रित गिट्टी टाकून दबाई करून धुळीचा बंदोबस्त करावा व प्रवाशांची गैरसोय दूर करणे गरजेचे आहे.