शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

न.प.तील विषय समित्यांसाठी रणनीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 00:47 IST

नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज विरोधक पहिल्यांदाच एकत्र आल्याचे चित्र पहायला मिळाले. त्यानंतर न.प.तील विषय समित्यांची स्थापना करण्यासाठी नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांच्याच दालनात बैठक सुरू होती. बंद दाराआड यात चर्चा झाली. मात्र त्यात काय निष्पन्न झाले हे कळायला मार्ग नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज विरोधक पहिल्यांदाच एकत्र आल्याचे चित्र पहायला मिळाले. त्यानंतर न.प.तील विषय समित्यांची स्थापना करण्यासाठी नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांच्याच दालनात बैठक सुरू होती. बंद दाराआड यात चर्चा झाली. मात्र त्यात काय निष्पन्न झाले हे कळायला मार्ग नाही.नगरपालिकेत एकूण सहा समित्या स्थापन करता येतात. यापैकी दोन समित्या तर अध्यक्ष व उपाध्यक्षांकडेच राहणार आहेत. उर्वरित चार समित्यांसाठी निवड प्रक्रिया राबवावी लागणार आहे. यात संख्याबळ उपयोगी पडणार की नाही, हा प्रश्नच असला तरीही या मनसुब्यांना सुरुंग लावण्यासाठी सायंकाळी उशिरा हालचाली सुरू झाल्या होत्या. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका दोलायमान होण्याची भीती वर्तविली जात आहे. राष्ट्रवादीचे सभागृहात सर्वाधिक १३ नगरसेवक आहेत. तर काँग्रेस-६, शिवसेना-६, भाजप-३, मनसे-२, एमआयएम-१, अपक्ष-१ असे इतर पक्षीयांचे संख्याबळ आहे. संख्याबळाचाच विचार केला तर राष्ट्रवादीकडे दोन, काँग्रेस व सेनेकडे प्रत्येकी एक सभापतीपद येवू शकते. त्यादृष्टिने हालचालीही सुरू आहेत.न.प.त सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याचा मुद्दा मागील काही दिवसांपासून जोरदारपणे चर्चेत आला आहे. त्याला पुष्टी देण्यासाठीच आजच्या सभेतही विरोधकांनी एकत्र येत किल्ला लढविला. अवैध नळ जोडण्यांच्या दंडवसुलीचा मुद्दा चक्क सभागृहाच्या पटलावर आल्यानंतर शिवसेनाही आक्रमक झाल्याचे दिसून आले. त्याचाच फायदा घेत विरोधी मंडळींचे बळ वाढले. उपनगराध्यक्षपद राकाँकडे असल्याने अर्धा सत्ताधारी असलेला हा पक्षही नाराजांनी भरलेला आहे. तर अनेक दिग्गजांचा भरणा असल्याने या पक्षातूनही विषय समित्यांठी अनेक महत्त्वाकांक्षी ऐनवेळी समोर येतील, हेही तेवढेच खरे. शिवाय राकॉं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही तसा आदेश दिला.