शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

‘...तर राममंदिरासाठी तुफान उठेल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 00:33 IST

देशामध्ये आतंकवाद्यासाठी न्यायालयाचे दरवाजे रात्री १२ वाजता उघडतात. मात्र, सर्वोच्च न्यायालय राम मंदिर खटल्यात ‘तारीख पे तारीख’ देत आहे. सध्या भाजपचे सरकार असून संसदेत प्रस्ताव आणून कायदा करावा अन्यथा तुफान उठेल, असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रीय मंत्री शंकर गायकर यांनी ३ डिसेंबर रोजी हिंगोलीत रामलीला मैदान येथे आयोजित हुंकार सभेत दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : देशामध्ये आतंकवाद्यासाठी न्यायालयाचे दरवाजे रात्री १२ वाजता उघडतात. मात्र, सर्वोच्च न्यायालय राम मंदिर खटल्यात ‘तारीख पे तारीख’ देत आहे. सध्या भाजपचे सरकार असून संसदेत प्रस्ताव आणून कायदा करावा अन्यथा तुफान उठेल, असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रीय मंत्री शंकर गायकर यांनी ३ डिसेंबर रोजी हिंगोलीत रामलीला मैदान येथे आयोजित हुंकार सभेत दिला.यावेळी दिगंबर शिवाचार्य महाराज, विष्णू गिरी महाराज, कान्हेराज बाबा पारसकर, सुभाष गिरी महाराज, धोंडीराम पाठक, खुशालचंद्र महाराज, विभाग संघचालक शिलचंद्र देशमुख, विहिंपचे जिल्हाध्यक्ष मुरलीधर तोष्णीवाल आदींची उपस्थिती होती. गायकर म्हणाले, देशात पुन्हा निजाम निर्माण करण्याचे षडयंत्र ओवेसी रचत असून हिंदूंनी राम मंदिर निर्माणासाठी पेटून उठावे. देशातील कोट्यवधीे हिंदूंचा आत्मा असलेल्या रामासाठी न्यायालय चालढकल करत आहे. न्यायाधीश हे राम आणि देशापेक्षा मोठे आहेत काय? १९९२ मध्ये राम मंदिरासाठी राम भक्तांनी दिलेले बलिदान व्यर्थ जाणार नाही. राम हे या देशाचे व भूमिचे प्राण आणि अस्तित्व आहेत. सर्वोच्च न्यायालयाला ९ हजार पानांचे पुरावे ५० हजार दस्ताऐवज, पुरातन संस्कृतीचे पुरावे सादर केले आहेत. हिंदू समाज सहिष्णू असला तरीही राम मंदिर निर्माणासाठी आता संकल्प करावा लागेल, असेही गायकर यांनी सांगितले.शरयूच्या तिरावर १९९२ ला हिंदू बांधवांनी दिलेले बलिदान व्यर्थ जाणार नाही. बलिदान दिलेल्या या राम भक्तांचे स्मरण करुन हिंदुंनी पेटून उठावे, असे आवाहनही त्यांनी केले. प्रभू रामचंद्र भारताचे श्रद्धास्थान आहे. यासाठी संसदेत कायदा करुन राम मंदिराचे निर्माण व्हावे, अशी मागणीही त्यांनी केली.

टॅग्स :PoliticsराजकारणRam Mandirराम मंदिर