शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

लसच उपाय ; लसीकरणानंतर जिल्ह्यात एकही मृत्यू नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:29 IST

हिंगोली : कोरोना महामारीवर लस लाभदायक असून आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचीच आहे. लसीकरणानंतर जिल्ह्यात एकही मृत्यू झाला नाही, अशी ...

हिंगोली : कोरोना महामारीवर लस लाभदायक असून आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचीच आहे. लसीकरणानंतर जिल्ह्यात एकही मृत्यू झाला नाही, अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.

कोरोना महामारीचे रुग्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढत जात असल्याचे पाहून जिल्हा प्रशासनाने कडक पाऊले उचलली आहेत. नगरपरिषद व पोलीस विभागाच्या वतीने विनाकारण आणि विनामास्क फिरणाऱ्यांची कसून तपासणी ही केली जात आहे. एवढेच काय विनामास्क फिरणाऱ्यांना दंड ही लावला जात आहे. एवढे कडक नियम असतानाही काही जण मात्र रस्त्याने फिरताना दिसत आहेत. कोरोना महामारीचा धोका ओळखून नागरिकांनी बाजारात विनाकारण व विनामास्क फिरु नये, अशा सूचना जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने दिल्या आहेत. लसीचा पहिला डोस आतापर्यंत ५२ हजार १२० जणांनी घेतला आहे. कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन हे दोन्ही डोस आतापर्यंत ८ हजार ६९७ जणांना दिले आहेत.

पहिल्या डोसनंतर जिल्ह्यात कोणीही पॉझिटिव्ह नाही लसीकरणाला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिला डोस आतापर्यंत ५२ हजार १२० जणांनी घेतला आहे. परंतु, कोणीही पॉझिटिव्ह आलेले नाही. लसीकरणानंतर ताप आल्यास आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. लस घेतल्यास ताप येतो पण लगेच उतरुनच जातो. उलट लस ही आरोग्यास लाभदायक आहे. काही शंका आल्यास आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

लस महत्त्वाचीच ; मृत्यूचा धोका कमी

कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन्ही लस महत्त्वाच्या आहेत. यामुळे मृत्यूचा धोका कमीच आहे. दोन्ही लस घेतल्यास आरोग्यासाठी चांगल्या प्रकारे लाभदायक अशा आहेत. तेव्हा नागरिकांनी लस आवश्य घ्यावी.

दोन्ही डोसनंतर जिल्ह्यात केवळ ०.०३ टक्के पॉझिटिव्ह

दोन्ही डोस नंतर जिल्ह्यात ०.०३ टक्के पॉझिटिव्हचे प्रमाण आहे. पण आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षितता ही मोठ्या प्रमाणात आहे. अंग दुखणे, ताप येणे, डोके जड पडणे या समस्या कोणतेही इंजेक्शन घेतल्यानंतर येतच असतात. कोरोना महामारीला दूर सावरणारी लस आहे. लस घेण्यात कोणीही हयगय करु नये.

कोरोनाचे रुग्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. स्वत:ची व इतरांची काळजी करावी. मास्क व सॅनिटायझरचा वापर नित्याने करावा. बाजारात जाणे टाळावे. नागरिकांनी लसीकरण मात्र आवश्य करुन घ्यावे.

-डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक