शहरं
Join us  
Trending Stories
1
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
2
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
3
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
4
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
5
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
6
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
7
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
8
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा
9
जवळच्या लोकांच्या उपस्थितीत असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार, कुटुंबाने पूर्ण केली अभिनेत्याची 'ही' इच्छा
10
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
11
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
12
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
13
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
14
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
15
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
16
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
17
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
18
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
19
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
20
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!

लसच उपाय ; लसीकरणानंतर जिल्ह्यात एकही मृत्यू नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:29 IST

हिंगोली : कोरोना महामारीवर लस लाभदायक असून आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचीच आहे. लसीकरणानंतर जिल्ह्यात एकही मृत्यू झाला नाही, अशी ...

हिंगोली : कोरोना महामारीवर लस लाभदायक असून आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचीच आहे. लसीकरणानंतर जिल्ह्यात एकही मृत्यू झाला नाही, अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.

कोरोना महामारीचे रुग्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढत जात असल्याचे पाहून जिल्हा प्रशासनाने कडक पाऊले उचलली आहेत. नगरपरिषद व पोलीस विभागाच्या वतीने विनाकारण आणि विनामास्क फिरणाऱ्यांची कसून तपासणी ही केली जात आहे. एवढेच काय विनामास्क फिरणाऱ्यांना दंड ही लावला जात आहे. एवढे कडक नियम असतानाही काही जण मात्र रस्त्याने फिरताना दिसत आहेत. कोरोना महामारीचा धोका ओळखून नागरिकांनी बाजारात विनाकारण व विनामास्क फिरु नये, अशा सूचना जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने दिल्या आहेत. लसीचा पहिला डोस आतापर्यंत ५२ हजार १२० जणांनी घेतला आहे. कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन हे दोन्ही डोस आतापर्यंत ८ हजार ६९७ जणांना दिले आहेत.

पहिल्या डोसनंतर जिल्ह्यात कोणीही पॉझिटिव्ह नाही लसीकरणाला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिला डोस आतापर्यंत ५२ हजार १२० जणांनी घेतला आहे. परंतु, कोणीही पॉझिटिव्ह आलेले नाही. लसीकरणानंतर ताप आल्यास आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. लस घेतल्यास ताप येतो पण लगेच उतरुनच जातो. उलट लस ही आरोग्यास लाभदायक आहे. काही शंका आल्यास आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

लस महत्त्वाचीच ; मृत्यूचा धोका कमी

कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन्ही लस महत्त्वाच्या आहेत. यामुळे मृत्यूचा धोका कमीच आहे. दोन्ही लस घेतल्यास आरोग्यासाठी चांगल्या प्रकारे लाभदायक अशा आहेत. तेव्हा नागरिकांनी लस आवश्य घ्यावी.

दोन्ही डोसनंतर जिल्ह्यात केवळ ०.०३ टक्के पॉझिटिव्ह

दोन्ही डोस नंतर जिल्ह्यात ०.०३ टक्के पॉझिटिव्हचे प्रमाण आहे. पण आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षितता ही मोठ्या प्रमाणात आहे. अंग दुखणे, ताप येणे, डोके जड पडणे या समस्या कोणतेही इंजेक्शन घेतल्यानंतर येतच असतात. कोरोना महामारीला दूर सावरणारी लस आहे. लस घेण्यात कोणीही हयगय करु नये.

कोरोनाचे रुग्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. स्वत:ची व इतरांची काळजी करावी. मास्क व सॅनिटायझरचा वापर नित्याने करावा. बाजारात जाणे टाळावे. नागरिकांनी लसीकरण मात्र आवश्य करुन घ्यावे.

-डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक