शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

लसच उपाय ; लसीकरणानंतर जिल्ह्यात एकही मृत्यू नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:29 IST

हिंगोली : कोरोना महामारीवर लस लाभदायक असून आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचीच आहे. लसीकरणानंतर जिल्ह्यात एकही मृत्यू झाला नाही, अशी ...

हिंगोली : कोरोना महामारीवर लस लाभदायक असून आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचीच आहे. लसीकरणानंतर जिल्ह्यात एकही मृत्यू झाला नाही, अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.

कोरोना महामारीचे रुग्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढत जात असल्याचे पाहून जिल्हा प्रशासनाने कडक पाऊले उचलली आहेत. नगरपरिषद व पोलीस विभागाच्या वतीने विनाकारण आणि विनामास्क फिरणाऱ्यांची कसून तपासणी ही केली जात आहे. एवढेच काय विनामास्क फिरणाऱ्यांना दंड ही लावला जात आहे. एवढे कडक नियम असतानाही काही जण मात्र रस्त्याने फिरताना दिसत आहेत. कोरोना महामारीचा धोका ओळखून नागरिकांनी बाजारात विनाकारण व विनामास्क फिरु नये, अशा सूचना जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने दिल्या आहेत. लसीचा पहिला डोस आतापर्यंत ५२ हजार १२० जणांनी घेतला आहे. कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन हे दोन्ही डोस आतापर्यंत ८ हजार ६९७ जणांना दिले आहेत.

पहिल्या डोसनंतर जिल्ह्यात कोणीही पॉझिटिव्ह नाही लसीकरणाला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिला डोस आतापर्यंत ५२ हजार १२० जणांनी घेतला आहे. परंतु, कोणीही पॉझिटिव्ह आलेले नाही. लसीकरणानंतर ताप आल्यास आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. लस घेतल्यास ताप येतो पण लगेच उतरुनच जातो. उलट लस ही आरोग्यास लाभदायक आहे. काही शंका आल्यास आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

लस महत्त्वाचीच ; मृत्यूचा धोका कमी

कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन्ही लस महत्त्वाच्या आहेत. यामुळे मृत्यूचा धोका कमीच आहे. दोन्ही लस घेतल्यास आरोग्यासाठी चांगल्या प्रकारे लाभदायक अशा आहेत. तेव्हा नागरिकांनी लस आवश्य घ्यावी.

दोन्ही डोसनंतर जिल्ह्यात केवळ ०.०३ टक्के पॉझिटिव्ह

दोन्ही डोस नंतर जिल्ह्यात ०.०३ टक्के पॉझिटिव्हचे प्रमाण आहे. पण आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षितता ही मोठ्या प्रमाणात आहे. अंग दुखणे, ताप येणे, डोके जड पडणे या समस्या कोणतेही इंजेक्शन घेतल्यानंतर येतच असतात. कोरोना महामारीला दूर सावरणारी लस आहे. लस घेण्यात कोणीही हयगय करु नये.

कोरोनाचे रुग्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. स्वत:ची व इतरांची काळजी करावी. मास्क व सॅनिटायझरचा वापर नित्याने करावा. बाजारात जाणे टाळावे. नागरिकांनी लसीकरण मात्र आवश्य करुन घ्यावे.

-डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक