शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

ज्यांना गावबंदी केली होती त्यांच्यासाठी आता पायघड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:38 IST

वसमत: कोरोना कालावधीत पुणे, मुंबईहून गावात परतणाऱ्यांना गावात येवू न देता गाबाबाहेर राहण्यासाठी भाग पाडले. अशांना आता मतदानासाठी ...

वसमत: कोरोना कालावधीत पुणे, मुंबईहून गावात परतणाऱ्यांना गावात येवू न देता गाबाबाहेर राहण्यासाठी भाग पाडले. अशांना आता मतदानासाठी सन्मानाने बोलावण्याची वेळ आली आहे. कोरोना कालावधीत केलेल्या चांगल्या-वाईट कामाचाही हिशोब देण्याची वेळ ग्रामपंचायत निवडणुकीत आली आहे. जुने वाद उकरुन काढणे, जुन्या भांडणाचा वचपा काढणे, रुसवे-फुगवे, नफा-नुकसान याचा हिशोब देण्याची जागा म्हणजे निवडणूक. त्यातल्या त्यात ग्रामपंचायत निवडणुकीत तर पिढ्यांचा वादही उफाळून येवू शकतो. आता कोरोना कालावधीतही निवडणुकीवर प्रभाव टाकत असल्याचे चित्र समोर येत आहे. निवडणुकीसाठी एक-एक मतदान महत्त्वाचे ठरणार असल्याने बाहेरगावी गेलेल्यांचा संपर्क सुरू झाला आहे. मतदानाच्या दिवशी येवून जा असे निरोप पाठविले जात आहेत. मात्र, नोकरी,धंद्यानिमित बाहेरगावाहून येणाऱ्यांना कोरोना कालावधीत गावात येवू नका, असा निरोप देणारेही आता मतदानाला येवून जा म्हणून विनवण्या करू लागले आहेत.

पुणे, मुंबईहून आलेल्या आपल्याच गावातील रहिवाशांना गावबंदी, गावाबाहेर राहण्याची सक्ती करण्यापर्यंत मजल गेली होती. होम क्वारंटाईन झालेल्यांना तर घराबाहेर दिसले तरी सुनावले जात होते. आता या प्रकाराने दुखावलेले मतदार वचपा काढण्याच्या तयारीत असल्याने उमेदवार धास्तावले आहेत. ‘तो मी नव्हेच’ म्हणत विरोधी पॅनलप्रमुखांवर खापर फोडण्याचे प्रकारही घडत आहेत. तंबाखूसाठी जादा पैसे वसूल करुन आता निवडणुकीनिमित्ताने उभे राहणाऱ्यांना फटका बसत आहे. दहा रुपयांची पुडी शंभर रुपयाला विकून गरजवंताना लुटण्याबद्दल पश्चाताप करण्याची वेळही काही ‘दुकानदार’ उमेदवारावर आली आहे. कोरोना कालावधीत जादा दराने वस्तू विकणारे चोरून दारू विकून पैसा कमावणारे, व्याजबट्टा करणारावरील रागही या निवडणुकीत व्यक्त होण्याची चिन्हे असल्याने आजवर दुखावलेल्यांना ‘खूश’ करण्यासाठी पायघड्या घालण्याची वेळ उमेदवारांवर आली आहे. कोरोना कालावधीत समाजसेवेच्या नावावर चमकोगिरी करणारे व चमकी समाजसेवकही रोषाचे धनी ठरत आहेत. कोरोना कालावधीत ज्यांनी समाजसेवा केली त्यांच्याबद्दल सहानुभूतीसाठी व्यक्त होताना दिसत आहे. एकंदरीत मागील काळातील ‘कमी’ चा हिशोब देण्याची वेळ आल्याने संधीसाधू उमेदवारात चिंतेचे वातावरण आहे.