शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीदरम्यानच करणार होते ब्लास्ट, पण...; दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात धक्कादायक खुलासा!
2
गुप्त दौरा... अन डील पक्की...! इस्रायल भारताला दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रे देणार; पाकिस्तान, चीन सगळेच टप्प्यात...
3
Delhi Blast : "मला डिस्टर्ब करू नका, महत्त्वाचं काम करतोय..."; कुटुंबाशी अनेक महिने बोलायचा नाही उमर
4
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
5
३० हजारांपेक्षा कमी आहे सॅलरी तरी, SIP द्वारे बनवू शकता १ कोटींचा फंड; महिन्याला किती करावी लागेल गुंतवणूक?
6
"सकाळी मुलीला शाळेत सोडायला गेली अन् पतीसह एकाने बंधक बनवले, मग..."; IAS पत्नीचा खळबळजनक दावा
7
Accident:पोलीस व्हॅनच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, परिसरात हळहळ!
8
२३ नोव्हेंबरपर्यंत कोकण रेल्वेवर मेगा ब्लॉक; सेवांवर मोठा परिणाम, तुमचं तिकीट याच वेळेत आहे?
9
Samudra Shastra: नुसत्या हसण्यावरून स्वभाव ओळखता येतो? समुद्र शास्त्रात मिळते उत्तर
10
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
11
Groww IPO Listing: केवळ ५% होता GMP, पण कंपनीची धमाकेदार एन्ट्री; पहिल्याच दिवशी 'या' शेअरनं दिला २३% पेक्षा जास्त फायदा
12
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी महत्त्वाची अपडेट, संशयितांना कार विकणारा डीलर ताब्यात!
13
Delhi Blast : २६ जानेवारी, दिवाळीला स्फोट करण्याचा होता प्लॅन, पण...; दिल्ली स्फोट प्रकरणात मुझम्मिलचा मोठा खुलासा
14
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात आणखी एक दहशतवादी डॉक्टर अटकेत; देशभरात छापेमारी सुरू...
15
निवृत्तीनंतरचे जीवन सुरक्षित! एकदाच गुंतवणूक करा आणि आयुष्यभर १ लाखाहून अधिक पेन्शन मिळवा
16
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
17
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
18
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
19
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
20
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन

ज्यांना गावबंदी केली होती त्यांच्यासाठी आता पायघड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:38 IST

वसमत: कोरोना कालावधीत पुणे, मुंबईहून गावात परतणाऱ्यांना गावात येवू न देता गाबाबाहेर राहण्यासाठी भाग पाडले. अशांना आता मतदानासाठी ...

वसमत: कोरोना कालावधीत पुणे, मुंबईहून गावात परतणाऱ्यांना गावात येवू न देता गाबाबाहेर राहण्यासाठी भाग पाडले. अशांना आता मतदानासाठी सन्मानाने बोलावण्याची वेळ आली आहे. कोरोना कालावधीत केलेल्या चांगल्या-वाईट कामाचाही हिशोब देण्याची वेळ ग्रामपंचायत निवडणुकीत आली आहे. जुने वाद उकरुन काढणे, जुन्या भांडणाचा वचपा काढणे, रुसवे-फुगवे, नफा-नुकसान याचा हिशोब देण्याची जागा म्हणजे निवडणूक. त्यातल्या त्यात ग्रामपंचायत निवडणुकीत तर पिढ्यांचा वादही उफाळून येवू शकतो. आता कोरोना कालावधीतही निवडणुकीवर प्रभाव टाकत असल्याचे चित्र समोर येत आहे. निवडणुकीसाठी एक-एक मतदान महत्त्वाचे ठरणार असल्याने बाहेरगावी गेलेल्यांचा संपर्क सुरू झाला आहे. मतदानाच्या दिवशी येवून जा असे निरोप पाठविले जात आहेत. मात्र, नोकरी,धंद्यानिमित बाहेरगावाहून येणाऱ्यांना कोरोना कालावधीत गावात येवू नका, असा निरोप देणारेही आता मतदानाला येवून जा म्हणून विनवण्या करू लागले आहेत.

पुणे, मुंबईहून आलेल्या आपल्याच गावातील रहिवाशांना गावबंदी, गावाबाहेर राहण्याची सक्ती करण्यापर्यंत मजल गेली होती. होम क्वारंटाईन झालेल्यांना तर घराबाहेर दिसले तरी सुनावले जात होते. आता या प्रकाराने दुखावलेले मतदार वचपा काढण्याच्या तयारीत असल्याने उमेदवार धास्तावले आहेत. ‘तो मी नव्हेच’ म्हणत विरोधी पॅनलप्रमुखांवर खापर फोडण्याचे प्रकारही घडत आहेत. तंबाखूसाठी जादा पैसे वसूल करुन आता निवडणुकीनिमित्ताने उभे राहणाऱ्यांना फटका बसत आहे. दहा रुपयांची पुडी शंभर रुपयाला विकून गरजवंताना लुटण्याबद्दल पश्चाताप करण्याची वेळही काही ‘दुकानदार’ उमेदवारावर आली आहे. कोरोना कालावधीत जादा दराने वस्तू विकणारे चोरून दारू विकून पैसा कमावणारे, व्याजबट्टा करणारावरील रागही या निवडणुकीत व्यक्त होण्याची चिन्हे असल्याने आजवर दुखावलेल्यांना ‘खूश’ करण्यासाठी पायघड्या घालण्याची वेळ उमेदवारांवर आली आहे. कोरोना कालावधीत समाजसेवेच्या नावावर चमकोगिरी करणारे व चमकी समाजसेवकही रोषाचे धनी ठरत आहेत. कोरोना कालावधीत ज्यांनी समाजसेवा केली त्यांच्याबद्दल सहानुभूतीसाठी व्यक्त होताना दिसत आहे. एकंदरीत मागील काळातील ‘कमी’ चा हिशोब देण्याची वेळ आल्याने संधीसाधू उमेदवारात चिंतेचे वातावरण आहे.