शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

हिंगोलीत डिजिटल पद्धतीने स्वच्छतेकडे पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 23:44 IST

नागरिकांच्या मनात नगर पालिकेतर्फे स्वच्छतेचा जागर निर्माण केला जात असून डिजिटल पद्धतीने हिंगोलीकरांचे पाऊल स्वच्छतेकडे पडत आहे. स्वच्छता अ‍ॅपद्वारे दिड महिन्यात ३६२७ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ३३८२ तकारींचा निपटारा पालिकेने केला आहे. तर २६०० जणांनी स्वच्छता अ‍ॅप, डाऊनलोड केले आहे.

ठळक मुद्देहिंगोली : ‘स्वच्छता’ अ‍ॅपवर ३६२७ तक्रारीं

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : नागरिकांच्या मनात नगर पालिकेतर्फे स्वच्छतेचा जागर निर्माण केला जात असून डिजिटल पद्धतीने हिंगोलीकरांचे पाऊल स्वच्छतेकडे पडत आहे. स्वच्छता अ‍ॅपद्वारे दिड महिन्यात ३६२७ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ३३८२ तकारींचा निपटारा पालिकेने केला आहे. तर २६०० जणांनी स्वच्छता अ‍ॅप, डाऊनलोड केले आहे.शहरात स्वच्छ भारत अभियान प्रभाविपणे राबविले जात असून स्वच्छतेसंदर्भात हिंगोली नगरपालिका स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत विविध उपक्रम राबवित आहे. अ‍ॅपवर प्राप्त झालेल्या तक्रारींचा जलदगतीने निपटारा करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून यासाठी पालिकेचे अधिकारी व कर्मचारी धावपळ करीत असून शहर स्वच्छतेचे महत्व पटवून सांगत आहेत. त्यामुळे हिंगोली स्वच्छ व सूंदर शहरचे स्वप्न पुर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे.पालिकेच्या स्वच्छता विभागाकडून शहरातील साफसफाईची कामे योग्यप्रकारे केली जात आहेत. शहर स्वच्छतेसाठी ‘स्वच्छता अ‍ॅपवर’ नागरिक कच-याचे फोटो अपलोड करीत असून अ‍ॅपद्वारे प्राप्त झालेल्या ३६२७ पैकी ३३८२ तक्रारींचा निपटारा करण्यात आला. स्वच्छ सर्वेक्षण -२०१८ साठी अ‍ॅप डाऊनलोडवर पालिकेने भर दिला आहे. पालिकेचे कर्मचारी नागरिकांना अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी आवाहन करत असून, अ‍ॅप डाऊनलोडही करून देत आहेत. व्यापारी वर्ग, रेल्वेस्थानक, महाविद्यालये, शाळा व शहरातील मुख्यालये, वर्दळीच्या ठिकाणी जाऊन पालिकेचे अधिकारी व कर्मचारी अ‍ॅपची माहिती देत आहेत. स्वच्छता मोहीमेस नागरीकही प्रतिसाद देत असून शहरातील अस्वच्छतेची माहिती पालिकेला देत आहेत.अभियान : सोशलमिडियाद्वारे जनजागृतीस्वच्छता अ‍ॅप डाऊलोड कसे करावे, या संदर्भात पालिका सोशल मिडीयाद्वारे प्रचार व प्रसार करीत आहे. प्लेस्टोर मध्ये जाऊन स्वच्छता अ‍ॅप सहजरित्या मोबाईलधारक डाऊनलोड करून शकतो. पालिकेत येणाºया प्रत्येकांना अ‍ॅपचा वापर करण्याचा संदेश अधिकारी व कर्मारी देत आहेत. शहरातील प्रत्येक वार्डमध्ये दररोज पालिकेची घंटागाडी सकाळी कचरा उचलण्यासाठी येत आहे. ओला व सुका कचºयाचे वर्गीकरण केले जात असून त्यापासून खतनिर्मिती केली जात आहे. हिंगोली शहरातील दरदिवशी ५१ मे. टन कचºयाचे व्यवस्थापन करण्यात येते.