शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
2
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
3
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
4
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
5
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
6
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
7
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
8
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
9
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
10
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
11
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
12
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
13
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
14
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
15
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
16
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
17
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
18
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
19
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत डिजिटल पद्धतीने स्वच्छतेकडे पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 23:44 IST

नागरिकांच्या मनात नगर पालिकेतर्फे स्वच्छतेचा जागर निर्माण केला जात असून डिजिटल पद्धतीने हिंगोलीकरांचे पाऊल स्वच्छतेकडे पडत आहे. स्वच्छता अ‍ॅपद्वारे दिड महिन्यात ३६२७ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ३३८२ तकारींचा निपटारा पालिकेने केला आहे. तर २६०० जणांनी स्वच्छता अ‍ॅप, डाऊनलोड केले आहे.

ठळक मुद्देहिंगोली : ‘स्वच्छता’ अ‍ॅपवर ३६२७ तक्रारीं

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : नागरिकांच्या मनात नगर पालिकेतर्फे स्वच्छतेचा जागर निर्माण केला जात असून डिजिटल पद्धतीने हिंगोलीकरांचे पाऊल स्वच्छतेकडे पडत आहे. स्वच्छता अ‍ॅपद्वारे दिड महिन्यात ३६२७ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ३३८२ तकारींचा निपटारा पालिकेने केला आहे. तर २६०० जणांनी स्वच्छता अ‍ॅप, डाऊनलोड केले आहे.शहरात स्वच्छ भारत अभियान प्रभाविपणे राबविले जात असून स्वच्छतेसंदर्भात हिंगोली नगरपालिका स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत विविध उपक्रम राबवित आहे. अ‍ॅपवर प्राप्त झालेल्या तक्रारींचा जलदगतीने निपटारा करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून यासाठी पालिकेचे अधिकारी व कर्मचारी धावपळ करीत असून शहर स्वच्छतेचे महत्व पटवून सांगत आहेत. त्यामुळे हिंगोली स्वच्छ व सूंदर शहरचे स्वप्न पुर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे.पालिकेच्या स्वच्छता विभागाकडून शहरातील साफसफाईची कामे योग्यप्रकारे केली जात आहेत. शहर स्वच्छतेसाठी ‘स्वच्छता अ‍ॅपवर’ नागरिक कच-याचे फोटो अपलोड करीत असून अ‍ॅपद्वारे प्राप्त झालेल्या ३६२७ पैकी ३३८२ तक्रारींचा निपटारा करण्यात आला. स्वच्छ सर्वेक्षण -२०१८ साठी अ‍ॅप डाऊनलोडवर पालिकेने भर दिला आहे. पालिकेचे कर्मचारी नागरिकांना अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी आवाहन करत असून, अ‍ॅप डाऊनलोडही करून देत आहेत. व्यापारी वर्ग, रेल्वेस्थानक, महाविद्यालये, शाळा व शहरातील मुख्यालये, वर्दळीच्या ठिकाणी जाऊन पालिकेचे अधिकारी व कर्मचारी अ‍ॅपची माहिती देत आहेत. स्वच्छता मोहीमेस नागरीकही प्रतिसाद देत असून शहरातील अस्वच्छतेची माहिती पालिकेला देत आहेत.अभियान : सोशलमिडियाद्वारे जनजागृतीस्वच्छता अ‍ॅप डाऊलोड कसे करावे, या संदर्भात पालिका सोशल मिडीयाद्वारे प्रचार व प्रसार करीत आहे. प्लेस्टोर मध्ये जाऊन स्वच्छता अ‍ॅप सहजरित्या मोबाईलधारक डाऊनलोड करून शकतो. पालिकेत येणाºया प्रत्येकांना अ‍ॅपचा वापर करण्याचा संदेश अधिकारी व कर्मारी देत आहेत. शहरातील प्रत्येक वार्डमध्ये दररोज पालिकेची घंटागाडी सकाळी कचरा उचलण्यासाठी येत आहे. ओला व सुका कचºयाचे वर्गीकरण केले जात असून त्यापासून खतनिर्मिती केली जात आहे. हिंगोली शहरातील दरदिवशी ५१ मे. टन कचºयाचे व्यवस्थापन करण्यात येते.