शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
2
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
3
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
4
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
5
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
6
IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी
7
कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली...
8
1 डिसेंबरपासून मोबाइल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार, 199 रुपयांचा पॅक किती रुपयांना होणार? मोठा दावा
9
हृदयद्रावक! बॉलिंगनंतर पाणी प्यायला, उलटी होताच बेशुद्ध होऊन खाली पडला, मैदानावरच मृत्यू
10
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
11
Lenskart IPO: लिस्टिंग गेन मिळेल का, केव्हा होणार शेअरचं अलॉटमेंट? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं
12
"या नाटकाचा अविभाज्य घटक असलेली तू...", प्रिया मराठेच्या आठवणीत पुष्कर श्रोत्रीची भावुक पोस्ट
13
भारत इलेक्ट्रॉनिक्स ते पॉलीकॅब... 'या' ५ स्टॉक्सवर ब्रोकरेज 'बुलिश'; आगामी काळात तगडा परतावा देणार?
14
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
15
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
16
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
17
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
18
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
19
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
20
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

स्थायी समितीत गाजली टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 00:29 IST

जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून विविध कामांमध्ये कमालीची उदासीनता दाखविली जात असल्याने अखेर आज कार्यकारी अभियंता भागानगरे यांचा पदभार काढण्याची मागणी सदस्यांनी केली अन् सीईओ एच.पी.तुम्मोड यांनीही त्याला सहमती दर्शविली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून विविध कामांमध्ये कमालीची उदासीनता दाखविली जात असल्याने अखेर आज कार्यकारी अभियंता भागानगरे यांचा पदभार काढण्याची मागणी सदस्यांनी केली अन् सीईओ एच.पी.तुम्मोड यांनीही त्याला सहमती दर्शविली.जि.प.अध्यक्षा शिवराणी नरवाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस सीईओ एच.पी.तुम्मोड, उपाध्यक्ष अनिल पतंगे, सभापती संजय देशमुख, प्रल्हाद राखोंडे, अति.मुकाअ मुकीम देशमुख आदींची उपस्थिती होती. जिल्ह्यातील तिन्ही प्रादेशिक योजनांसाठी शासनाकडून निधी मंजूर झाला आहे.जवळपास आठ कोटी रुपये मंजूर असतानाही या योजनेच्या तांत्रिक मान्यतेचा प्रश्न त्रुटी दूर न केल्याने लटकून पडला आहे. मागील सहा महिन्यांपासून या त्रुटी दूर केल्या जात नसल्याचा सवाल जि.प. सदस्य अंकुशराव आहेर यांनी केला. तेव्हा कालच याबाबतच्या त्रुटी दूर करून प्रस्ताव सादर केल्याचे उत्तर देण्यात आले. त्यानंतर जिल्ह्याच्या पाणीटंचाईचा १८ कोटींचा आराखडा सादर झालेला असताना एकही काम अद्याप सुरू नाही. ३५0 पैकी केवळ ६४ गावांत विंधन विहिरी घेणे शक्य असल्याचे सर्व्हेत आढळल्याचे सांगण्यात आले. मात्र सर्व्हेच वस्तुनिष्ठ होत नसल्याने अनेक गावांना टंचाईच्या झळा सोसाव्या लागत असल्याचा आरोपही आहेर यांनी केला. तर अजित मगर यांनी झरा येथील पाण्याच्या टाकीचे स्ट्रक्चरल आॅडिट होत नसल्याने संताप व्यक्त केला. तसेच कारखान्यांच्या वाहनांमुळे रस्ते खराब होतात. त्यामुळे संबंधित कारखान्यांकडूनच त्यांची दुरुस्ती करून घेण्याची मागणीही त्यांनी केली.कुरुंदा येथील रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणाचा मुद्दा जि.प.सदस्य संजय कावरखे यांनी चांगलाच लावून धरला. या अतिक्रमणामुळे होणारी अडचण त्यांनी मांडली. त्यानंतर येत्या स्थायी समितीच्या बैठकीपूर्वी हा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन सीईओ तुम्मोड यांनी दिले. वाई (धामणगाव) येथे वित्त आयोगात अपहार झाल्याची चौकशी करूनही संबंधितांवर कोणतीच कारवाई झाली नसल्याचा मुद्दा आहेर यांनी मांडला.दुर्धर आजारावर मदतीसाठी वाढीव तरतुदीचा प्रश्न मागील तीन स्थायी समितीच्या बैठकीत गाजल्यानंतरही आज पुन्हा तशी तरतूदच झाली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे उपलब्ध निधीतून आधी १00 जणांना मदतीचे वाटप करण्यास सांगून आणखी १00 जणांचे प्रस्ताव तयार असल्याने त्यासाठी तरतूद उपलब्ध करून देण्यास सांगण्यात आले.मागील बैठकीत वाळूचे लिलाव झाले नसल्याने विविध ठिकाणच्या कामांसाठी वाळू मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित करून यासाठी वाळू उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकाºयांकडे ठराव पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र असा ठराव घेतल्यानंतरही जिल्हाधिकाºयांना मात्र तो पाठविलाच नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अजूनही वाळू मिळत नसल्याने ऐन मार्च एण्डला अनेक कामे ठप्प झाल्यास काय करायचे, असा सवाल सदस्यांनी केला.