शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
5
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
6
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
7
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
8
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
9
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
10
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
11
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
12
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
13
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
14
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
15
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
16
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
17
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
18
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
19
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
20
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले

स्थायी समितीत गाजली टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 00:29 IST

जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून विविध कामांमध्ये कमालीची उदासीनता दाखविली जात असल्याने अखेर आज कार्यकारी अभियंता भागानगरे यांचा पदभार काढण्याची मागणी सदस्यांनी केली अन् सीईओ एच.पी.तुम्मोड यांनीही त्याला सहमती दर्शविली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून विविध कामांमध्ये कमालीची उदासीनता दाखविली जात असल्याने अखेर आज कार्यकारी अभियंता भागानगरे यांचा पदभार काढण्याची मागणी सदस्यांनी केली अन् सीईओ एच.पी.तुम्मोड यांनीही त्याला सहमती दर्शविली.जि.प.अध्यक्षा शिवराणी नरवाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस सीईओ एच.पी.तुम्मोड, उपाध्यक्ष अनिल पतंगे, सभापती संजय देशमुख, प्रल्हाद राखोंडे, अति.मुकाअ मुकीम देशमुख आदींची उपस्थिती होती. जिल्ह्यातील तिन्ही प्रादेशिक योजनांसाठी शासनाकडून निधी मंजूर झाला आहे.जवळपास आठ कोटी रुपये मंजूर असतानाही या योजनेच्या तांत्रिक मान्यतेचा प्रश्न त्रुटी दूर न केल्याने लटकून पडला आहे. मागील सहा महिन्यांपासून या त्रुटी दूर केल्या जात नसल्याचा सवाल जि.प. सदस्य अंकुशराव आहेर यांनी केला. तेव्हा कालच याबाबतच्या त्रुटी दूर करून प्रस्ताव सादर केल्याचे उत्तर देण्यात आले. त्यानंतर जिल्ह्याच्या पाणीटंचाईचा १८ कोटींचा आराखडा सादर झालेला असताना एकही काम अद्याप सुरू नाही. ३५0 पैकी केवळ ६४ गावांत विंधन विहिरी घेणे शक्य असल्याचे सर्व्हेत आढळल्याचे सांगण्यात आले. मात्र सर्व्हेच वस्तुनिष्ठ होत नसल्याने अनेक गावांना टंचाईच्या झळा सोसाव्या लागत असल्याचा आरोपही आहेर यांनी केला. तर अजित मगर यांनी झरा येथील पाण्याच्या टाकीचे स्ट्रक्चरल आॅडिट होत नसल्याने संताप व्यक्त केला. तसेच कारखान्यांच्या वाहनांमुळे रस्ते खराब होतात. त्यामुळे संबंधित कारखान्यांकडूनच त्यांची दुरुस्ती करून घेण्याची मागणीही त्यांनी केली.कुरुंदा येथील रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणाचा मुद्दा जि.प.सदस्य संजय कावरखे यांनी चांगलाच लावून धरला. या अतिक्रमणामुळे होणारी अडचण त्यांनी मांडली. त्यानंतर येत्या स्थायी समितीच्या बैठकीपूर्वी हा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन सीईओ तुम्मोड यांनी दिले. वाई (धामणगाव) येथे वित्त आयोगात अपहार झाल्याची चौकशी करूनही संबंधितांवर कोणतीच कारवाई झाली नसल्याचा मुद्दा आहेर यांनी मांडला.दुर्धर आजारावर मदतीसाठी वाढीव तरतुदीचा प्रश्न मागील तीन स्थायी समितीच्या बैठकीत गाजल्यानंतरही आज पुन्हा तशी तरतूदच झाली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे उपलब्ध निधीतून आधी १00 जणांना मदतीचे वाटप करण्यास सांगून आणखी १00 जणांचे प्रस्ताव तयार असल्याने त्यासाठी तरतूद उपलब्ध करून देण्यास सांगण्यात आले.मागील बैठकीत वाळूचे लिलाव झाले नसल्याने विविध ठिकाणच्या कामांसाठी वाळू मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित करून यासाठी वाळू उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकाºयांकडे ठराव पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र असा ठराव घेतल्यानंतरही जिल्हाधिकाºयांना मात्र तो पाठविलाच नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अजूनही वाळू मिळत नसल्याने ऐन मार्च एण्डला अनेक कामे ठप्प झाल्यास काय करायचे, असा सवाल सदस्यांनी केला.