शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

स्पेशल रेल्वे रूळावर, पण प्रवाशांच्या खिशाला दुप्पट फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:53 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन करण्यात आला होता. सर्व व्यवहार ठप्प पडले होते. याचा फटका प्रवासी वाहनांना बसला तसा रेल्वे ...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन करण्यात आला होता. सर्व व्यवहार ठप्प पडले होते. याचा फटका प्रवासी वाहनांना बसला तसा रेल्वे विभागालाही बसला आहे. रेल्वे बंद झाल्याने प्रवाशांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागले. अव्वाच्या सव्वा प्रवास भाडे देत खासगी वाहनाने प्रवास करावा लागला. कोरोनाचे संकट टळत असताना शासनाने काही नियम व अटी लागू करत प्रवासी वाहने सुरू केली. रेल्वे विभागाने स्पेशल गाड्या सुरू केल्या. कोरोनापूर्वी हिंगोली रेल्वे स्थानकावरून १६ प्रवासी रेल्वे धावत होत्या. यात १३ एक्स्प्रेस, तर ३ पॅसेंजर रेल्वेगाड्यांचा समावेश होता. आता कोरोनानंतर ६ रेल्वे सुरू करण्यात आल्या आहेत. या सर्व रेल्वे विशेष रेल्वे म्हणून धावत आहेत. यात केवळ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांनाच प्रवास करू दिला जात आहे. यातही प्रवास भाडे जास्त आकारले जात असल्याने प्रवाशांच्या खिशाला फटका बसत आहे.

छोट्या आणि मोठ्या अंतरासाठीच्या भाड्यात वाढ

छोट्या अंतरासाठी

हिंगोली येथून पूर्णा, नांदेड, परभणी, अकोला आदी मार्गावर रेल्वे धावतात. मात्र, कोरोनामुळे या मार्गावरील रेल्वे गाड्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. आता केवळ ६ रेल्वे धावत आहेत. यातही प्रवास दर वाढल्याने हिंगोलीपासून जवळचे अंतर असलेल्या अकोलासाठी १०० रुपये, पूर्णेसाठी १०० रुपये घेतले जात आहेत. कोरोनापूर्वी अकोला येथे जाण्यासाठी एक्स्प्रेस रेल्वेचे तिकीट दर ६० रुपये होते, तर पूर्णा येथे जाण्यासाठी ४५ रुपये तिकीट दर होता.

मोठ्या अंतरासाठी

हिंगोली रेल्वे स्थानकावरून नागपूर, दिल्ली, जयपूर, श्रीगंगानगर, तिरूपती, हैदराबाद, मुंबई, कोल्हापूर आदी लांब पल्ल्याच्या रेल्वे धावतात. सध्या ६ रेल्वे धावत आहेत. लांब पल्ल्याच्या रेल्वेला प्रवासी संख्या जास्त मिळते. मात्र, सध्या जयपूर, सिकंदराबाद, श्रीगंगानगर, तिरूपती, हैदराबाद, नरखेड, काचिगुडा येथे जाण्यासाठी रेल्वे धावत आहेत. मोठ्या अंतरासाठीच्या रेल्वे दरातही मोठी वाढ झाली आहे.

कोरोनापूर्वी

१६ रेल्वे धावायच्या

आता धावतात

६ रेल्वे धावतात

सध्या हिंगोली रेल्वे स्थानकावरून स्पेशल रेल्वे धावत आहेत. यातील बहुतांश रेल्वे छोट्या रेल्वे स्थानकावर थांबत नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय प्रवासभाड्यात वाढ झाल्याने प्रवाशांच्या खिशाला फटका बसत आहे.

-संदीप हराळ

हिंगोली येथून केवळ सहाच रेल्वे धावत आहेत. यातही आरक्षण करूनच प्रवास करावा लागत आहे. अनेक वेळा आरक्षित जागा मिळत नाही. परिणामी जादा पैसे देऊनही इतर प्रवासी वाहनाने प्रवास करावा लागत आहे.

-दीपक कावरखे