शहरं
Join us  
Trending Stories
1
घरातील सर्वांचा विरोध; तरीही वैष्णवीचा लव मॅरेजसाठी हट्ट, मामाने सगळा घटनाक्रम सांगितला..
2
Vaishnavi Hagwane Case : 'वैष्णवीचे बाळ आणायला गेलो,आम्हाला बंदूक दाखवली'; मामांनी सगळंच सांगितलं
3
 काश्मीरमधील किश्तवाड येथील चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान, दोघांना लष्कराने घेरले 
4
हेरगिरी प्रकरणात ज्योती मल्होत्राला दिलासा नाही, पोलिस कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ; बँक खात्याची चौकशी सुरूच
5
पाकिस्तानने स्वतः युद्धविरामाची चर्चा केली, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेच्या मध्यस्थीचा दावा फेटाळला!
6
मानवतेचा महामेरु! पत्नी कॅन्सरने गेली, इतर रुग्णांची पैशांअभावी वणवण पाहता पतीची २० लाखांची देगणी
7
आधी वैभव सूर्यवंशीसोबत खोटा फोटो, आता प्रीती झिंटाची थेट कोर्टात धाव, नेमकं प्रकरण काय?
8
Corona Virus : बूस्टर डोस घ्यावा लागेल का? चीन आणि भारतासह ५ देशांमध्ये कोरोनाच्या नव्या लाटेचा धोका
9
जयंत पाटलांची लागणार होती वर्णी, भाजपासोबतची बोलणी अडली; अखेर छगन भुजबळांनी संधी साधली!
10
“मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा; जागावाटपाची चर्चा नको, मित्रपक्षांवर टीका टाळा”
11
नवऱ्याच्या सिनेमाच्या स्क्रीनिंगला पोहोचली अमृता खानविलकर, हिमांशुच्या 'त्या' कृतीवर खिळल्या नजरा
12
'ग्रोव'चा सामान्य गुंतवणूकदारांना धक्का? छोटे व्यवहारही होणार महाग, ब्रोकरेज शुल्क इतक्या पटींनी वाढणार
13
दिल्ली उद्ध्वस्त करण्याची योजना, रावळपिंडीत ट्रेनिंग घेतलं! आयएसआयचे दोन हेर पोलिसांच्या ताब्यात
14
Vaishnavi Hagawane Death Case : 'दाल मे कुछ काला है'; शरद पवार गटाची रूपाली चाकणकर, चित्रा वाघ यांच्यावर खरमरीत टीका
15
मोठी बातमी! अथिया शेट्टीने बॉलिवूडला ठोकला रामराम, आई झाल्यानंतर घेतला निर्णय! चाहत्यांना धक्का
16
अनिल गोटेंनी टाळे ठोकलेल्या खोलीत पैशांचे घबाड सापडले; कुलूप तोडून पोलीस आत गेले... 
17
जगभर विनाश होईल, आर्थिक मंदी येईल...; बाबा वेंगाची भयानक भाकितं, जगाचा अंतही सांगून टाकला!
18
"पती निर्दोष, दोनदा पाकिस्तानला गेला कारण..."; शहजादला अटक होताच ढसाढसा रडली रझिया
19
दीपिका पादुकोणचे नखरेच जास्त! मानधन अन् अटी ऐकून दिग्दर्शकाने 'या' सिनेमातून काढलं
20
माझे लग्न पाकिस्तानात करून द्या, ज्योती मल्होत्राची विनंती; चॅटिंग आणि डायरीच्या नोंदीतील माहिती

स्पेशल रेल्वे रूळावर, पण प्रवाशांच्या खिशाला दुप्पट फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:53 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन करण्यात आला होता. सर्व व्यवहार ठप्प पडले होते. याचा फटका प्रवासी वाहनांना बसला तसा रेल्वे ...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन करण्यात आला होता. सर्व व्यवहार ठप्प पडले होते. याचा फटका प्रवासी वाहनांना बसला तसा रेल्वे विभागालाही बसला आहे. रेल्वे बंद झाल्याने प्रवाशांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागले. अव्वाच्या सव्वा प्रवास भाडे देत खासगी वाहनाने प्रवास करावा लागला. कोरोनाचे संकट टळत असताना शासनाने काही नियम व अटी लागू करत प्रवासी वाहने सुरू केली. रेल्वे विभागाने स्पेशल गाड्या सुरू केल्या. कोरोनापूर्वी हिंगोली रेल्वे स्थानकावरून १६ प्रवासी रेल्वे धावत होत्या. यात १३ एक्स्प्रेस, तर ३ पॅसेंजर रेल्वेगाड्यांचा समावेश होता. आता कोरोनानंतर ६ रेल्वे सुरू करण्यात आल्या आहेत. या सर्व रेल्वे विशेष रेल्वे म्हणून धावत आहेत. यात केवळ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांनाच प्रवास करू दिला जात आहे. यातही प्रवास भाडे जास्त आकारले जात असल्याने प्रवाशांच्या खिशाला फटका बसत आहे.

छोट्या आणि मोठ्या अंतरासाठीच्या भाड्यात वाढ

छोट्या अंतरासाठी

हिंगोली येथून पूर्णा, नांदेड, परभणी, अकोला आदी मार्गावर रेल्वे धावतात. मात्र, कोरोनामुळे या मार्गावरील रेल्वे गाड्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. आता केवळ ६ रेल्वे धावत आहेत. यातही प्रवास दर वाढल्याने हिंगोलीपासून जवळचे अंतर असलेल्या अकोलासाठी १०० रुपये, पूर्णेसाठी १०० रुपये घेतले जात आहेत. कोरोनापूर्वी अकोला येथे जाण्यासाठी एक्स्प्रेस रेल्वेचे तिकीट दर ६० रुपये होते, तर पूर्णा येथे जाण्यासाठी ४५ रुपये तिकीट दर होता.

मोठ्या अंतरासाठी

हिंगोली रेल्वे स्थानकावरून नागपूर, दिल्ली, जयपूर, श्रीगंगानगर, तिरूपती, हैदराबाद, मुंबई, कोल्हापूर आदी लांब पल्ल्याच्या रेल्वे धावतात. सध्या ६ रेल्वे धावत आहेत. लांब पल्ल्याच्या रेल्वेला प्रवासी संख्या जास्त मिळते. मात्र, सध्या जयपूर, सिकंदराबाद, श्रीगंगानगर, तिरूपती, हैदराबाद, नरखेड, काचिगुडा येथे जाण्यासाठी रेल्वे धावत आहेत. मोठ्या अंतरासाठीच्या रेल्वे दरातही मोठी वाढ झाली आहे.

कोरोनापूर्वी

१६ रेल्वे धावायच्या

आता धावतात

६ रेल्वे धावतात

सध्या हिंगोली रेल्वे स्थानकावरून स्पेशल रेल्वे धावत आहेत. यातील बहुतांश रेल्वे छोट्या रेल्वे स्थानकावर थांबत नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय प्रवासभाड्यात वाढ झाल्याने प्रवाशांच्या खिशाला फटका बसत आहे.

-संदीप हराळ

हिंगोली येथून केवळ सहाच रेल्वे धावत आहेत. यातही आरक्षण करूनच प्रवास करावा लागत आहे. अनेक वेळा आरक्षित जागा मिळत नाही. परिणामी जादा पैसे देऊनही इतर प्रवासी वाहनाने प्रवास करावा लागत आहे.

-दीपक कावरखे