शहरं
Join us  
Trending Stories
1
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
2
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
3
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
4
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
5
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
6
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
7
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
8
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
9
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
10
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
11
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
12
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
13
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
14
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
15
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
16
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
17
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
18
Viral Video : प्रवेशद्वारावरील मेटल डिटेक्टरला घंटा समजू लागले लोक; एकाने हात लावल्यावर पुढे काय झाले बघाच!
19
फोडाफोडीचं कारण, पक्षामध्ये खदखद! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत, अमित शाहांची घेणार भेट
20
स्पेशल 26! बंगळुरूमध्ये भरदिवसा लूट; छाप्याच्या नावाखाली तब्बल ७.११ कोटींवर मारला डल्ला
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांकडील सोयाबीन संपल्यानंतर वाढले भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:55 IST

जिल्हाभरात खरीप हंगामात अतिवृष्टी झाली. ऐन सोयाबीन काढणीच्या वेळी पावसाने झोडपल्याने बहुतांश सोयाबीन पिकांचे नुकसान झाले. पाऊस जास्त झाल्याने ...

जिल्हाभरात खरीप हंगामात अतिवृष्टी झाली. ऐन सोयाबीन काढणीच्या वेळी पावसाने झोडपल्याने बहुतांश सोयाबीन पिकांचे नुकसान झाले. पाऊस जास्त झाल्याने सोयाबीनच्या झाडांना जास्त शेंगाच लागल्या नाहीत. तसेच सोयाबीनचे बियाणे बोगस निघाल्याची ओरड काही भागातून झाली. मूग, उडीद या पिकानेही दगा दिल्याने शेतकऱ्यांची मदार सोयाबीनवर होती. मात्र सोयाबीनच्या पिकानेही दगा दिला. उत्पादनात घट झाल्याने भाव वाढतील अशी शक्यता शेतकऱ्यांना होती. मात्र, सुरूवातील सोयाबीनचे दर ३ हजार ५०० ते ३ हजार ९०० रूपये होते. दरात वाढ होईल, या आशेने अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीला काढले नाही. परंतु, दीपावली सण लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीला काढले. बहुतांश शेतकऱ्यांनी ४ हजारांच्या आतच सोयाबीनची विक्री केली. शेतकऱ्यांकडील सोयाबीन संपल्यानंतर आता बाजारपेठेत सोयाबीनचे दर वाढले आहेत. ५ फेब्रुवारी रोजी सोयाबीनचे दर ४ हजार ४८० रूपयांवर होते. भाववाढीचा फायदा केवळ व्यापाऱ्यांनाच होत असल्याचे शेतकऱ्यांतून बोलले जात आहे.

नवीन तूर ६ हजार १०० रूपयांवर

सोयाबीनसह तूर पिकानेही शेतकऱ्याने दगा दिला आहे. सध्या नवीन तुरीचा भाव ६ हजार १०० ते ६ हजार ५०० रूपयांपर्यंत आहे. तसेच हरभरा ४ हजार १०० ते ४ हजार ४०० रूपये प्रति क्विंटल दराने अनेक व्यापाऱ्यांनी खरेदी केला असल्याचे शेतकरी सांगत आहेत.