शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

शेतकऱ्यांकडील सोयाबीन संपल्यानंतर वाढले भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:55 IST

जिल्हाभरात खरीप हंगामात अतिवृष्टी झाली. ऐन सोयाबीन काढणीच्या वेळी पावसाने झोडपल्याने बहुतांश सोयाबीन पिकांचे नुकसान झाले. पाऊस जास्त झाल्याने ...

जिल्हाभरात खरीप हंगामात अतिवृष्टी झाली. ऐन सोयाबीन काढणीच्या वेळी पावसाने झोडपल्याने बहुतांश सोयाबीन पिकांचे नुकसान झाले. पाऊस जास्त झाल्याने सोयाबीनच्या झाडांना जास्त शेंगाच लागल्या नाहीत. तसेच सोयाबीनचे बियाणे बोगस निघाल्याची ओरड काही भागातून झाली. मूग, उडीद या पिकानेही दगा दिल्याने शेतकऱ्यांची मदार सोयाबीनवर होती. मात्र सोयाबीनच्या पिकानेही दगा दिला. उत्पादनात घट झाल्याने भाव वाढतील अशी शक्यता शेतकऱ्यांना होती. मात्र, सुरूवातील सोयाबीनचे दर ३ हजार ५०० ते ३ हजार ९०० रूपये होते. दरात वाढ होईल, या आशेने अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीला काढले नाही. परंतु, दीपावली सण लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीला काढले. बहुतांश शेतकऱ्यांनी ४ हजारांच्या आतच सोयाबीनची विक्री केली. शेतकऱ्यांकडील सोयाबीन संपल्यानंतर आता बाजारपेठेत सोयाबीनचे दर वाढले आहेत. ५ फेब्रुवारी रोजी सोयाबीनचे दर ४ हजार ४८० रूपयांवर होते. भाववाढीचा फायदा केवळ व्यापाऱ्यांनाच होत असल्याचे शेतकऱ्यांतून बोलले जात आहे.

नवीन तूर ६ हजार १०० रूपयांवर

सोयाबीनसह तूर पिकानेही शेतकऱ्याने दगा दिला आहे. सध्या नवीन तुरीचा भाव ६ हजार १०० ते ६ हजार ५०० रूपयांपर्यंत आहे. तसेच हरभरा ४ हजार १०० ते ४ हजार ४०० रूपये प्रति क्विंटल दराने अनेक व्यापाऱ्यांनी खरेदी केला असल्याचे शेतकरी सांगत आहेत.