शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
2
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
3
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
4
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
5
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
6
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
7
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
8
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर
9
रशियाकडून पाकिस्तानला फायटर जेट इंजिनचा पुरवठा? काँग्रेसच्या दाव्यावर भाजपचा पलटवार...
10
आधार अपडेटसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, देशभरातील 6 कोटी मुलांना होणार फायदा
11
गुडन्यूज! ५८व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा झाला अरबाज खान, पत्नी शूराने दिला गोंडस बाळाला जन्म
12
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
13
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
14
पेट्रोलची चिंता मिटली! 2026 मध्ये येणार मारुतीची पहिली फ्लेक्स-फ्युएल कार, जाणून घ्या डिटेल्स...
15
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण
16
Viral Video: दोघे भिडले, लाथा-बुक्क्या मारत एकमेकांवर तुटून पडले; मेट्रोतील राडा व्हायरल
17
Napal Landslide: निसर्ग कोपला! नेपाळमध्ये ढगफुटी, भूस्खलनामुळे २२ जणांचा मृत्यू, विमानतळं महामार्ग बंद
18
केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या
19
विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू
20
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."

सोयाबीन खरेदी केंद्राचा तिढाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 23:27 IST

मोठ्या विश्वासाने शेतीमालाची विक्री करण्यासाठी खरेदी-विक्री संघाकडे नोंदणी केली होती. मात्र आता संघाचे खरेदीचे अधिकार काढलेत. तर नाफेडच्या अधिकाºयाचा अपघात झाल्याने बाजार समितीला खरेदी सुरू करता येत नसल्याचे चित्र आहे. दुसरीकडे शेतकरी मात्र संतापजनक प्रतिक्रिया देत आहेत.

ठळक मुद्देखविसंचे अधिकार काढले : बाजार समितीचे केंद्र बंदच

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मोठ्या विश्वासाने शेतीमालाची विक्री करण्यासाठी खरेदी-विक्री संघाकडे नोंदणी केली होती. मात्र आता संघाचे खरेदीचे अधिकार काढलेत. तर नाफेडच्या अधिकाºयाचा अपघात झाल्याने बाजार समितीला खरेदी सुरू करता येत नसल्याचे चित्र आहे. दुसरीकडे शेतकरी मात्र संतापजनक प्रतिक्रिया देत आहेत.मागील तीन ते चार वर्षांपासून शेतकरी आस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करीत आहेत. त्यातच शेतीमालाला भाव नसल्याने खुल्या बाजारात मातीमोल किंमत मिळत आहे. शासकीय खरेदी केंद्रावर जाचक अटी अन् प्रतीक्षा करण्यात व्यवहार ठप्प झाले आहेत. सलग दोन वर्षांपासून शेतकºयांच्या नशिबी हा दुर्देवाचा फेरा कायम आहे. आधी नाफेडने नडवले नंतर खरेदी विक्री संघातील संचालकांचा बेबनाव व गोंधळ अडचणीत आणणारा ठरला. या नादात पंधरा दिवसांपासून खरेदी-विक्री संघाचे सोयाबीन खरेदी केंद्र बंद पडल्याने हिंगोली तालुक्यातील शेतकºयांना नाईलाजाने खाजगी बाजारात सोयाबीन विकावे लागत आहे. आता हे हमीभाव खरेदी केंद्र चालवण्याचे अधिकार बाजार समितीला दिले आहेत. मात्र हे केंद्र कधी सुरू होईल, याचाही काही नेम नाही. नाफेडच्या ज्या अधिकाºयाच्या हाती हे सगळे आहे, त्याचाच अपघात झाला. अशावेळी इतरांकडे शासनाने पदभार देणे अपेक्षित होते. मात्र तसेही होत नसल्याने शेतकºयांच्या नशिबी मात्र आणखी किती प्रतीक्षा राहील, हे कळयला मार्ग नाही. दोन वर्षांपासून हे दुष्टचक्र कायम आहे.