शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
4
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
5
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
6
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
7
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
8
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
9
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
10
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
11
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
12
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
13
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
14
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
15
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
16
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?
17
सॅल्यूट! अ‍ॅसिड हल्ल्याने गेली दृष्टी, मानली नाही हार; बारावीत मिळवले ९५%, IAS होण्याचं स्वप्न
18
"तुम्हा सर्वांना सलाम..."; तेजस्वी यादव यांचा शहीद जवान रामबाबू सिंह यांच्या भावाला Video कॉल
19
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
20
अबब! तब्बल ४ लाखांची पोपटाची पर्स घेऊन 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये पोहोचली उर्वशी रौतेला, सर्वजण पाहतच राहिले

५५ हजार ८४३ हेक्टरवर रब्बी पिकांचा पेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:52 IST

कळमनुरी : तालुक्यात रब्बीची पेरणी १५२.२४ टक्के झाली आहे. या वर्षी हिवाळ्यात थंडी कमी झाल्यामुळे रब्बीच्या उत्पादनात २० ...

कळमनुरी : तालुक्यात रब्बीची पेरणी १५२.२४ टक्के झाली आहे. या वर्षी हिवाळ्यात थंडी कमी झाल्यामुळे रब्बीच्या उत्पादनात २० ते २५ टक्के घट होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. तालुक्यात रब्बीचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र ३६ हजार ६८० हेक्टर असून, या वर्षी ५५ हजार ८४३ हेक्टरवर रब्बीचा पेरा झाला आहे. रब्बीच्या पेरणीची टक्केवारी १५२.२४ टक्के झाली आहे.

कळमनुरी तालुक्‍यात रब्बी ज्वारीचे

सर्वसाधारण पेरणीक्षेत्र ५४२ हेक्टर असून, या वर्षी १ हजार ५८ हेक्टरवर रब्बी ज्वारीची पेरणी झाली. ही टक्केवारी १९५.२० टक्के आहे. तालुक्यात गव्हाचे सर्वसाधारण पेरणीक्षेत्र ११ हजार ७७४ हेक्टर असून, १३ हजार २१ हेक्टरवर म्हणजेच ११०.५९ टक्के पेरणी झाली आहे. मक्याचे सर्वसाधारण पेरणीक्षेत्र ९४ हेक्‍टर असून, ४०० हेक्टरवर मक्‍याची पेरणी झाली आहे, हरभऱ्याचे सर्वसाधारण पेरणीक्षेत्र २० हजार ३८३ हेक्टर असून, ४० हजार ६५६ हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी झाली आहे. ही टक्केवारी १९९.४६ टक्के आहे.

करडईचे सर्वसाधारण पेरणीक्षेत्र २ हजार ९४१ हेक्टर असून, १०४ हेक्टरवर पेरणी झाली. ही टक्केवारी ३.५४ टक्के आहे. हरभरा सध्या फुल व घाट्याच्या अवस्थेत आहे, तर गहू पोटरी व ओंबीच्या अवस्थेत आहे. या वर्षी हिवाळ्यात जोरदार थंडी पडली नाही. फक्त एक महिना भरच थंडी होती. रब्बीच्या पिकांना थंडी आवश्यक असल्याने ही थंडी या वर्षी पडली नाही, त्यामुळे रब्बीच्या उत्पादनात २० ते २५ टक्के घट येण्याची शक्‍यता आहे. मध्यंतरी ढगाळ वातावरण असल्यामुळे गहू व हरभऱ्यावर रोग पसरलेला होता. हरभऱ्यावर घाटेअळीचा प्रादुर्भाव झाला होता. शेतकऱ्यांनी कीटकनाशकाची फवारणी केली होती.

मागील तीन ते चार वर्षांपासून करडईची पेरणी तालुक्यात झालेली नाही. या वर्षी गोडतेलाचे भाव वाढल्यामुळे ३.५४ टक्के करडईची पेरणी झाली. तालुक्‍यात रब्बी तीळ, सूर्यफुल, जवस या गळीत धान्याचा पेरा झालेला नाही. या वर्षी दमदार पाऊस पडल्यामुळे जलस्तर वाढले आहे. जलस्तर वाढल्यामुळे रब्बीचा पेरा या वर्षी मोठ्या प्रमाणावर झाला आहे, परंतु हिवाळ्यामध्ये म्हणावी तशी थंडी पडली नसल्यामुळे रब्बीच्या उत्पादनात घट येण्याची शक्‍यता कृषी विभागाकडून वर्तविली गेली. या पावसाळ्यात तीन ते चार वेळा अतिवृष्टी झालेली आहे. त्यामुळे सध्या जलस्तर वाढलेले आहे.

तालुक्यात पानी फाउंडेशनच्या वतीने मागील दोन वर्षांपासून जलसंधारणाची मोठ्या प्रमाणावर कामे झाल्यामुळे जलस्रोत वाढलेले आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाणीही झिरपले आहे. त्यामुळे एकंदरीत तालुक्याची जलस्रोत वाढल्यामुळे रब्बीचा पेरा वाढला आहे. या वर्षी थंडीच नसल्यामुळे रब्बी पिकांची वाढ जोमाने झाली नाही. ही वाढ झाली नसल्यामुळे उत्पादनात घट येण्याची शक्‍यता आहे.