शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

५५ हजार ८४३ हेक्टरवर रब्बी पिकांचा पेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:52 IST

कळमनुरी : तालुक्यात रब्बीची पेरणी १५२.२४ टक्के झाली आहे. या वर्षी हिवाळ्यात थंडी कमी झाल्यामुळे रब्बीच्या उत्पादनात २० ...

कळमनुरी : तालुक्यात रब्बीची पेरणी १५२.२४ टक्के झाली आहे. या वर्षी हिवाळ्यात थंडी कमी झाल्यामुळे रब्बीच्या उत्पादनात २० ते २५ टक्के घट होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. तालुक्यात रब्बीचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र ३६ हजार ६८० हेक्टर असून, या वर्षी ५५ हजार ८४३ हेक्टरवर रब्बीचा पेरा झाला आहे. रब्बीच्या पेरणीची टक्केवारी १५२.२४ टक्के झाली आहे.

कळमनुरी तालुक्‍यात रब्बी ज्वारीचे

सर्वसाधारण पेरणीक्षेत्र ५४२ हेक्टर असून, या वर्षी १ हजार ५८ हेक्टरवर रब्बी ज्वारीची पेरणी झाली. ही टक्केवारी १९५.२० टक्के आहे. तालुक्यात गव्हाचे सर्वसाधारण पेरणीक्षेत्र ११ हजार ७७४ हेक्टर असून, १३ हजार २१ हेक्टरवर म्हणजेच ११०.५९ टक्के पेरणी झाली आहे. मक्याचे सर्वसाधारण पेरणीक्षेत्र ९४ हेक्‍टर असून, ४०० हेक्टरवर मक्‍याची पेरणी झाली आहे, हरभऱ्याचे सर्वसाधारण पेरणीक्षेत्र २० हजार ३८३ हेक्टर असून, ४० हजार ६५६ हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी झाली आहे. ही टक्केवारी १९९.४६ टक्के आहे.

करडईचे सर्वसाधारण पेरणीक्षेत्र २ हजार ९४१ हेक्टर असून, १०४ हेक्टरवर पेरणी झाली. ही टक्केवारी ३.५४ टक्के आहे. हरभरा सध्या फुल व घाट्याच्या अवस्थेत आहे, तर गहू पोटरी व ओंबीच्या अवस्थेत आहे. या वर्षी हिवाळ्यात जोरदार थंडी पडली नाही. फक्त एक महिना भरच थंडी होती. रब्बीच्या पिकांना थंडी आवश्यक असल्याने ही थंडी या वर्षी पडली नाही, त्यामुळे रब्बीच्या उत्पादनात २० ते २५ टक्के घट येण्याची शक्‍यता आहे. मध्यंतरी ढगाळ वातावरण असल्यामुळे गहू व हरभऱ्यावर रोग पसरलेला होता. हरभऱ्यावर घाटेअळीचा प्रादुर्भाव झाला होता. शेतकऱ्यांनी कीटकनाशकाची फवारणी केली होती.

मागील तीन ते चार वर्षांपासून करडईची पेरणी तालुक्यात झालेली नाही. या वर्षी गोडतेलाचे भाव वाढल्यामुळे ३.५४ टक्के करडईची पेरणी झाली. तालुक्‍यात रब्बी तीळ, सूर्यफुल, जवस या गळीत धान्याचा पेरा झालेला नाही. या वर्षी दमदार पाऊस पडल्यामुळे जलस्तर वाढले आहे. जलस्तर वाढल्यामुळे रब्बीचा पेरा या वर्षी मोठ्या प्रमाणावर झाला आहे, परंतु हिवाळ्यामध्ये म्हणावी तशी थंडी पडली नसल्यामुळे रब्बीच्या उत्पादनात घट येण्याची शक्‍यता कृषी विभागाकडून वर्तविली गेली. या पावसाळ्यात तीन ते चार वेळा अतिवृष्टी झालेली आहे. त्यामुळे सध्या जलस्तर वाढलेले आहे.

तालुक्यात पानी फाउंडेशनच्या वतीने मागील दोन वर्षांपासून जलसंधारणाची मोठ्या प्रमाणावर कामे झाल्यामुळे जलस्रोत वाढलेले आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाणीही झिरपले आहे. त्यामुळे एकंदरीत तालुक्याची जलस्रोत वाढल्यामुळे रब्बीचा पेरा वाढला आहे. या वर्षी थंडीच नसल्यामुळे रब्बी पिकांची वाढ जोमाने झाली नाही. ही वाढ झाली नसल्यामुळे उत्पादनात घट येण्याची शक्‍यता आहे.