शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

जिल्ह्यात एसटीच्या सहा बसेस विजेवर धावतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:03 IST

१२ ऑगस्ट रोजी मुंबई येथील एस. टी. महामंडळाच्या वाहतूक विभागाच्या महाव्यवस्थापकांनी पत्र काढले आहे. यासंदर्भात सर्व आगारांकडून माहिती मागविणे ...

१२ ऑगस्ट रोजी मुंबई येथील एस. टी. महामंडळाच्या वाहतूक विभागाच्या महाव्यवस्थापकांनी पत्र काढले आहे. यासंदर्भात सर्व आगारांकडून माहिती मागविणे सुरू केले आहे. प्रारंभी जिल्ह्यासाठी सहा बसेस पाठवतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मार्ग कोणता ते अजून निश्चित नाही

मुंबई येथील एस. टी. महामंडळाच्या महाव्यवस्थापकांनी सर्वच आगारांना पत्र पाठविले आहे. विद्युत बस ३०० किलोमीटर चालल्यानंतर त्याचे चार्जिंग करणे बंधनकारक राहणार आहे. ही बाब लक्षात घेता मार्गाची लांबी ३००पेक्षा अधिक नसावी, असेही नमूद केले आहे.

यंत्रणा उभारावी लागणार

nविद्युत बसच्या चार्जिंगकरिता आवश्यक ती यंत्रणा उभारावी लागणार आहे. या सेवेची नियते सुरू केल्यानंतर अन्य मार्गावर वर्ग करणे, सेवा बंद करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही.

nनियते तयार जिल्हा ते जिल्हा, तालुका ते तालुका, मध्यम, लांब पल्ला, शटल, विनावाहक अशा सेवांना प्राधान्य दिले जाईल.

खर्चात होणार बचत

सद्यस्थितीत डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे एस. टी. महामंडळाला बसेसचा मेंटेनन्स परवडेना झाला आहे. विजेवर चालणारी बस लवकर जिल्ह्यात आली तर एस. टी. महामंडळाचा अनाठायी होणारा खर्च वाचणार आहे. विशेष म्हणजे तीनशे किलोमीटर झाल्यावर किमान तीन तासांचा व त्या प्रमाणात कालावधी चार्जिंगसाठी आवश्यक आहे. हा कालावधी चार्जिंगसाठी राखीव ठेवून नियते तयार करावीत, अशा मार्गदर्शक सूचनाही मुंबई येथील महाव्यवस्थापकांनी पत्रात दिल्या आहेत.

विजेवर चालणारी बस लवकरच सुरू

मुंबई येथील एस. टी. महामंडळाच्या महाव्यवस्थापकांनी परभणी विभागाला विजेवरील बसेसबाबत पत्र पाठविले असून, माहिती गोळा करणे सुरू आहे. याबाबत वरिष्ठस्तरावर हा निर्णय लवकरच घेतला जाईल.

-सिद्धार्थ आझादे,

पर्यवेक्षक, यांत्रिक विभाग, हिंगोली आगार