शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

जि.प.त अजूनही वातावरण गरमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 00:10 IST

जिल्हा परिषदेत काँग्रेस व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांतील वादामुळे वातावरण अजूनही तापलेलेच आहे. आज दोन आमदारांच्या उपस्थितीत काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सदस्यांची बैठक झाली. तर शिवसेनेकडून आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा परिषदेत काँग्रेस व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांतील वादामुळे वातावरण अजूनही तापलेलेच आहे. आज दोन आमदारांच्या उपस्थितीत काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सदस्यांची बैठक झाली. तर शिवसेनेकडून आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली.शेवाळा येथे काँग्रेस व शिवसेनेचा गेल्या अनेक वर्षांचा वाद आहे. त्यामुळे या दोन गटांत कायम कुरबूर सुरू असते. दोन्ही गट राजकीयदृष्ट्या प्रबळ असल्याने विकास कामांतही एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी हस्तक्षेप सुरू असतो. मात्र आतापर्यंत चालत आलेल्या या वादाला आता वरच्या स्तरावर फारसे महत्त्व नव्हते.काँग्रेसचे आ.संतोष टारफे यांच्या स्वीयसहायकावर झालेल्या हल्ल्यानंतर जि.प.त अचानक राजकीय धुमश्चक्री सुरु झाली. गावातील वाद वरच्या स्तरापर्यंत पोहोचला.कधी नव्हे, ते आ.टारफे यावेळी आक्रमकपणे समोर आले. त्यांनी या प्रकरणात संबंधितांवर कारवाईची मागणी लावून धरली होती. शिवाय त्यांच्या स्वीयसहायकाने यात गुन्हाही दाखल केला. त्यामुळे शिवसेनेचे कळमनुरीचे पं.स. उपसभापती गोपू पाटील व इतरांची नावे यात आली. तर दुसरीकडे गावातील वादाच्या प्रकरणामुळे याच गावच्या असलेल्या जि.प.अध्यक्षा शिवराणी नरवाडे यांनीही जातीवाचक शिवीगाळ व धमकावल्याचा गुन्हा आमदाराचे स्वीयसहायक श्रीनिवास नितनवरे, अभय सावंत आदींवर दाखल केला. मागील दोन दिवसांपासून या प्रकरणावरून वातावरण तापलेलेच आहे. काल दोन्ही बाजूंनी निषेधाची निवेदनेही आली. आज पुन्हा जि.प. अध्यक्षांना शिवीगाळ करणाºयांना तत्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी नंदू खिल्लारे, प्रकाश नरवाडे यांच्यासह शिष्टमंडळ जिल्हाधिकाºयांना भेटले.दरम्यान, जि.प.तील या वादावरून राजकारणाचा स्तर घसरत चालल्याच्या प्रतिक्रिया देत अनेकांनी हा विषय थांबण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.बैठक : सदस्यांची मते जाणून घेतलीयाबाबत आज आ.संतोष टारफे, आ.रामराव वडकुते यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सदस्यांची बैठक जि.प.उपाध्यक्ष अनिल पतंगे यांच्या दालनात घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलताना या दोघांनीही सावध भूमिका घेतली. वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. तर यापुढे असे प्रकार घडूच नयेत, असा बंदोबस्त केला जाईल, असेही ते म्हणाले. तर ही माहिती माजी आ.जयप्रकाश दांडेगावकर, माजी आ.भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्याशी चर्चा केल्यानंतरच सांगितली जाईल, असेही म्हणाले.जिल्हा परिषदेत विरोधी पक्षाच्या भूमिकेत असलेल्या भाजपची भूमिका काय असेल असे विचारले असता आ.तान्हाजी मुटकुळे यांनी सध्या तरी वेट अ‍ॅण्ड वॉच हीच भूमिका असल्याचे सांगितले.

टॅग्स :Hingoli z pहिंगोली जिल्हा परिषदPoliticsराजकारण