शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जि.प.त अजूनही वातावरण गरमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 00:10 IST

जिल्हा परिषदेत काँग्रेस व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांतील वादामुळे वातावरण अजूनही तापलेलेच आहे. आज दोन आमदारांच्या उपस्थितीत काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सदस्यांची बैठक झाली. तर शिवसेनेकडून आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा परिषदेत काँग्रेस व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांतील वादामुळे वातावरण अजूनही तापलेलेच आहे. आज दोन आमदारांच्या उपस्थितीत काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सदस्यांची बैठक झाली. तर शिवसेनेकडून आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली.शेवाळा येथे काँग्रेस व शिवसेनेचा गेल्या अनेक वर्षांचा वाद आहे. त्यामुळे या दोन गटांत कायम कुरबूर सुरू असते. दोन्ही गट राजकीयदृष्ट्या प्रबळ असल्याने विकास कामांतही एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी हस्तक्षेप सुरू असतो. मात्र आतापर्यंत चालत आलेल्या या वादाला आता वरच्या स्तरावर फारसे महत्त्व नव्हते.काँग्रेसचे आ.संतोष टारफे यांच्या स्वीयसहायकावर झालेल्या हल्ल्यानंतर जि.प.त अचानक राजकीय धुमश्चक्री सुरु झाली. गावातील वाद वरच्या स्तरापर्यंत पोहोचला.कधी नव्हे, ते आ.टारफे यावेळी आक्रमकपणे समोर आले. त्यांनी या प्रकरणात संबंधितांवर कारवाईची मागणी लावून धरली होती. शिवाय त्यांच्या स्वीयसहायकाने यात गुन्हाही दाखल केला. त्यामुळे शिवसेनेचे कळमनुरीचे पं.स. उपसभापती गोपू पाटील व इतरांची नावे यात आली. तर दुसरीकडे गावातील वादाच्या प्रकरणामुळे याच गावच्या असलेल्या जि.प.अध्यक्षा शिवराणी नरवाडे यांनीही जातीवाचक शिवीगाळ व धमकावल्याचा गुन्हा आमदाराचे स्वीयसहायक श्रीनिवास नितनवरे, अभय सावंत आदींवर दाखल केला. मागील दोन दिवसांपासून या प्रकरणावरून वातावरण तापलेलेच आहे. काल दोन्ही बाजूंनी निषेधाची निवेदनेही आली. आज पुन्हा जि.प. अध्यक्षांना शिवीगाळ करणाºयांना तत्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी नंदू खिल्लारे, प्रकाश नरवाडे यांच्यासह शिष्टमंडळ जिल्हाधिकाºयांना भेटले.दरम्यान, जि.प.तील या वादावरून राजकारणाचा स्तर घसरत चालल्याच्या प्रतिक्रिया देत अनेकांनी हा विषय थांबण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.बैठक : सदस्यांची मते जाणून घेतलीयाबाबत आज आ.संतोष टारफे, आ.रामराव वडकुते यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सदस्यांची बैठक जि.प.उपाध्यक्ष अनिल पतंगे यांच्या दालनात घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलताना या दोघांनीही सावध भूमिका घेतली. वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. तर यापुढे असे प्रकार घडूच नयेत, असा बंदोबस्त केला जाईल, असेही ते म्हणाले. तर ही माहिती माजी आ.जयप्रकाश दांडेगावकर, माजी आ.भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्याशी चर्चा केल्यानंतरच सांगितली जाईल, असेही म्हणाले.जिल्हा परिषदेत विरोधी पक्षाच्या भूमिकेत असलेल्या भाजपची भूमिका काय असेल असे विचारले असता आ.तान्हाजी मुटकुळे यांनी सध्या तरी वेट अ‍ॅण्ड वॉच हीच भूमिका असल्याचे सांगितले.

टॅग्स :Hingoli z pहिंगोली जिल्हा परिषदPoliticsराजकारण