शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

हिंगोली जिल्ह्यातील ‘ते’ वाळूघाटही रद्द होण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 00:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क हिंगोली : जिल्ह्यातील २३ पैकी केवळ ४ वाळूघाट लिलावात गेले होते. आता त्यापैकीही तीन घाटांच्या लिलावाची ...

ठळक मुद्देपंधरा दिवसांच्या मुदतीत भरली नाही रक्कम, आणखी संकटे वाढू लागली

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील २३ पैकी केवळ ४ वाळूघाट लिलावात गेले होते. आता त्यापैकीही तीन घाटांच्या लिलावाची रक्कम भरली नसल्याने लिलावच रद्द होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मुदत संपून गेल्यानंतर पैसे भरण्यास कंत्राटदार चकरा मारत आहेत.हिंगोली जिल्ह्यात सध्या शासकीय, खाजगी बांधकामे केवळ वाळू नसल्याने ठप्प झाली आहेत. जिल्ह्यातील एकमेव कसबे धावंडा हा कळमनुरी तालुक्यातील वाळूघाट लिलावात गेला आहे. मात्र या घाटाचाही रस्ता एका भागाकडून ग्रामस्थांनी अडविल्याने कंत्राटदारच अडचणीत आहे. केवळ ट्रॅक्टरद्वारेच वाळू वाहतूक करावी लागत असल्याने त्या तुलनेत पुरवठा करणे शक्य नाही. जिल्ह्यातील इतर तीन घाटांचा मात्र लिलाव झाल्यानंतरही संबंधितांनी वेळेत रक्कम भरली नाही. यासाठी केवळ पंधरा दिवसांची मुदत होती. त्यानंतरही काही दिवस प्रशासनाने रक्कम भरण्याची प्रतीक्षा केली. मात्र तरीही ती भरली गेली नाही. त्यामुळे आता जिल्हाधिकाºयांनी यात रक्कम भरून घेण्यास नकार दिल्याचे सूत्रांनी सांगितले.हिंगोली जिल्ह्यात यंदा कंत्राटदारांनी एकप्रकारे महसूल विभागाशी असहकार पुकारल्याचे चित्र दिसून येत आहे. मोठ्या प्रमाणात होणाºया दंडात्मक कारवाईसह ‘औपचिरकता’ पूर्ण करण्यातच मलाई निघून जात आहे. मूळ भागभांडवलालाच ‘धक्का’ पोहोचू लागल्याने कंत्राटदार धास्तावलेले आहेत. तर वाळूसाठी बांधकाम हाती घेतलेली मंडळी अवैध मार्गाने वाळू आणणाºयांना अव्वाच्या सव्वा दर देत आहे. किमान हे प्रकार तरी बंद झाले पाहिजे. रात्री अकरानंतर शहरात सहा-सात टिप्पर येत असून थंडीत अधिकारी झोपा काढत आहेत.अशीही युक्ती..!सध्या गरजवंत वाळूमाफियांची मनमानी सहन करीत वाट्टेल ते भाव देत आहेत. शिवाय ‘चोरीचा मामला व हळूहळू बोंबला’ची परिस्थिती असल्याचे सांगून माफियाही भीती घालत आहेत. त्यात जिल्ह्यासह बाहेरच्या काही ठिकाणाहून वाळू येथे येत आहे. मात्र त्यासाठी वाळूच्या टिप्परमध्ये वरच्या बाजूला चार ते पाच बोटांचा डस्टचा थर टाकला जात आहे. डस्ट नेली जात असल्याचे समजून त्याला कोणी अडविण्याचाही प्रश्न नाही.यंदा फटका : घाट न घेताच कमाईचा ट्रेंडदरवर्षी ठरावीक वाळूघाटच लिलावात जात असले तरीही सगळीकडूनच वाळूचा वारेमाप उपसा होत आहे. यंदा तर एकही घाट न गेल्याने चित्र दरवर्षीपेक्षा विदारक राहण्याची चिन्हे आहेत. महसूल विभागाने कोट्यवधी रुपये दंडातूनच वसूल केल्याने हे स्पष्टपणेच दिसून येत आहे. मात्र काही ठिकाणी महसूलचीचसाथही भेटत असल्यानेच हा नवा ट्रेंड निर्माण झाल्याचे चित्र आहे. आता पुन्हा १६ डिसेंबरला वाळू घाट लिलाव आहेत. आता जर घाट गेले नाही तर या प्रकारावर शिक्कामोर्तबच होणार आहे. तर महसूल विभागाला मात्र यामुळे कोट्यवधीचा फटका बसणार आहे.