शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

हिंगोली जिल्ह्यातील ‘ते’ वाळूघाटही रद्द होण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 00:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क हिंगोली : जिल्ह्यातील २३ पैकी केवळ ४ वाळूघाट लिलावात गेले होते. आता त्यापैकीही तीन घाटांच्या लिलावाची ...

ठळक मुद्देपंधरा दिवसांच्या मुदतीत भरली नाही रक्कम, आणखी संकटे वाढू लागली

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील २३ पैकी केवळ ४ वाळूघाट लिलावात गेले होते. आता त्यापैकीही तीन घाटांच्या लिलावाची रक्कम भरली नसल्याने लिलावच रद्द होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मुदत संपून गेल्यानंतर पैसे भरण्यास कंत्राटदार चकरा मारत आहेत.हिंगोली जिल्ह्यात सध्या शासकीय, खाजगी बांधकामे केवळ वाळू नसल्याने ठप्प झाली आहेत. जिल्ह्यातील एकमेव कसबे धावंडा हा कळमनुरी तालुक्यातील वाळूघाट लिलावात गेला आहे. मात्र या घाटाचाही रस्ता एका भागाकडून ग्रामस्थांनी अडविल्याने कंत्राटदारच अडचणीत आहे. केवळ ट्रॅक्टरद्वारेच वाळू वाहतूक करावी लागत असल्याने त्या तुलनेत पुरवठा करणे शक्य नाही. जिल्ह्यातील इतर तीन घाटांचा मात्र लिलाव झाल्यानंतरही संबंधितांनी वेळेत रक्कम भरली नाही. यासाठी केवळ पंधरा दिवसांची मुदत होती. त्यानंतरही काही दिवस प्रशासनाने रक्कम भरण्याची प्रतीक्षा केली. मात्र तरीही ती भरली गेली नाही. त्यामुळे आता जिल्हाधिकाºयांनी यात रक्कम भरून घेण्यास नकार दिल्याचे सूत्रांनी सांगितले.हिंगोली जिल्ह्यात यंदा कंत्राटदारांनी एकप्रकारे महसूल विभागाशी असहकार पुकारल्याचे चित्र दिसून येत आहे. मोठ्या प्रमाणात होणाºया दंडात्मक कारवाईसह ‘औपचिरकता’ पूर्ण करण्यातच मलाई निघून जात आहे. मूळ भागभांडवलालाच ‘धक्का’ पोहोचू लागल्याने कंत्राटदार धास्तावलेले आहेत. तर वाळूसाठी बांधकाम हाती घेतलेली मंडळी अवैध मार्गाने वाळू आणणाºयांना अव्वाच्या सव्वा दर देत आहे. किमान हे प्रकार तरी बंद झाले पाहिजे. रात्री अकरानंतर शहरात सहा-सात टिप्पर येत असून थंडीत अधिकारी झोपा काढत आहेत.अशीही युक्ती..!सध्या गरजवंत वाळूमाफियांची मनमानी सहन करीत वाट्टेल ते भाव देत आहेत. शिवाय ‘चोरीचा मामला व हळूहळू बोंबला’ची परिस्थिती असल्याचे सांगून माफियाही भीती घालत आहेत. त्यात जिल्ह्यासह बाहेरच्या काही ठिकाणाहून वाळू येथे येत आहे. मात्र त्यासाठी वाळूच्या टिप्परमध्ये वरच्या बाजूला चार ते पाच बोटांचा डस्टचा थर टाकला जात आहे. डस्ट नेली जात असल्याचे समजून त्याला कोणी अडविण्याचाही प्रश्न नाही.यंदा फटका : घाट न घेताच कमाईचा ट्रेंडदरवर्षी ठरावीक वाळूघाटच लिलावात जात असले तरीही सगळीकडूनच वाळूचा वारेमाप उपसा होत आहे. यंदा तर एकही घाट न गेल्याने चित्र दरवर्षीपेक्षा विदारक राहण्याची चिन्हे आहेत. महसूल विभागाने कोट्यवधी रुपये दंडातूनच वसूल केल्याने हे स्पष्टपणेच दिसून येत आहे. मात्र काही ठिकाणी महसूलचीचसाथही भेटत असल्यानेच हा नवा ट्रेंड निर्माण झाल्याचे चित्र आहे. आता पुन्हा १६ डिसेंबरला वाळू घाट लिलाव आहेत. आता जर घाट गेले नाही तर या प्रकारावर शिक्कामोर्तबच होणार आहे. तर महसूल विभागाला मात्र यामुळे कोट्यवधीचा फटका बसणार आहे.