शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

आजपासून दुकाने उघडणार ; मात्र रात्रीची संचारबंदी कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:28 IST

हिंगोली : जिल्हाभरात कोरोनामुळे १ ते ७ मार्चपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली होती. आता ८ मार्चपासून अत्यावश्यक सेवेतील दुकाने ...

हिंगोली : जिल्हाभरात कोरोनामुळे १ ते ७ मार्चपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली होती. आता ८ मार्चपासून अत्यावश्यक सेवेतील दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. मात्र, त्यासाठी ॲंटीजेन चाचणी अहवाल निगेटिव्ह असणे बंधनकारक केले आहे. तसेच रात्रीची संचारबंदी कायम राहणार असून शाळा, महाविद्यालये, धार्मिक स्थळे, सार्वजनिक कार्यक्रमांना पुढील आदेशापर्यंत बंदी असणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

जिल्हाभरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा उद्रेक थांबविण्यासाठी १ ते ७ मार्चदरम्यान जिल्ह्यात संचारबंदी लागू केली. त्यामुळे जिल्हाभरातील काही दुकाने वगळता पूर्ण बाजारपेठ बंद होती. आता ८ मार्चपासून संचारबंदीच्या नियमांत शिथिलता देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे अटी व नियमांचे पालन करणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील आस्थापना, दुकाने ८ मार्चपासून उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासाठी व्यापारी, दुकानदार व दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा चालू कालावधीतील कोरोना ॲंटीजेन चाचणीचा अहवाल निगेटिव्ह असणे बंधनकारक केले आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, सर्व उपविभागीय अधिकारी यांच्यासह इतर अधिकाऱ्यांची असणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी दिला आहे.

आजपासून सुरू राहणार

- जिल्ह्यातील सर्व किराणा दुकाने, कृषी उत्पन्न बाजार समिती, कृषी दुकाने सकाळी १० ते सायंकाळी ७ या कालावधीत उघडण्यास परवानगी असेल.

- भाजीपाला, फळेविक्री, मांस, मच्छी, मटन, दारू विक्रीची दुकाने सकाळी १० ते दुपारी ३ या कालावधीत उघडण्यास परवानगी असेल.

- दूधविक्रीची दुकाने सकाळी ७ ते १० व सायंकाळी ७ ते रात्री ९ या कालावधीत चालू राहतील.

- सर्व औषधी दुकाने सकाळी ९ ते रात्री ९ या कालावधीत तसेच आवश्यकतेनुसार उघडता येणार आहेत.

- जिल्ह्यातील बँका नागरिकांसाठी सकाळी १० ते दुपारी ३ या कालावधीत चालू राहतील. परंतु, शासकीय कामकाजासाठी बँका कार्यालयीन वेळेत सुरू राहतील.

- एसटी बसेसने पूर्ण क्षमतेने वाहतूक करण्यास परवानगी असेल. परंतु, इतर जिल्ह्यातून येणाऱ्या बसेस शासकीय बसस्थानकाशिवाय इतर कोठेही थांबविता येणार नाहीत.

- बसस्थानकातील कोरोना ॲंटीजेन तपासणी पुढील आदेशापर्यंत चालू राहील. तसेच रेल्वेस्थानकात आरोग्य विभागाच्या वतीने कोरोना ॲंटीजेन तपासणी कॅम्प उभारण्यात येणार आहे.

- ऑटोरिक्षा वाहतुकीस २ १, जीप व या प्रकारातील वाहतुकीस ५ १, तसेच खासगी वाहनास ३ १ अशी परवानगी असणार आहे. दुचाकीवर एकाच व्यक्तीस प्रवास करता येणार आहे

- जिल्ह्यातील शासकीय कार्यालये पूर्णवेळ तर खासगी कार्यालये सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत उघडण्यास परवानगी असेल.

- लग्न व लग्नसंबंधित कार्यक्रमांना केवळ ५० व्यक्तींना परवानगी असेल. मात्र, यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयाची परवानगी बंधनकारक राहणार आहे.

- अंत्ययात्रेस केवळ २० व्यक्तींना परवानगी असणार आहे.

-

काय बंद राहणार

- शाळा, महाविद्यालये, चित्रपटगृहे, लॉन्स, मंगल कार्यालये, जलतरण तलाव उघडण्यास परवानगी नसेल.

- रेस्टॉरंट, हॉटेल्स, बियर व वाईन बार उघडण्यास परवानगी नसेल. परंतु, रेस्टॉरंट आणि हॉटेल यांना पार्सल सुविधेसाठी सकाळी १० ते सायंकाळी ७ या कालावधीत उघडण्यास परवानगी असेल.

- धार्मिक , प्रार्थना स्थळे नागरिकांसाठी बंद राहतील.

- धार्मिक, राजकीय, सामाजिक कार्यक्रमांना व मिरवणुकांना बंदी असेल.

-धरणे, आंदोलने, प्रदर्शने इत्यादींना पुढील आदेशापर्यंत बंदी असेल.